Letest News
नगर-मनमाड महामार्गाची साडेसाती संपणार कधी? सहा वर्षांत तीन कंत्राटदार बदलले तरी लोकप्रतिनिधींचे मौन ... तोतया पत्रकारांची धाड की खंडणीचा डाव? महिलेकडे मागितले तब्बल एक लाख! ग्रामपंचायत अधिकाऱ्याची १० हजारांची लाच मागणी ५ हजार घेताना ACBच्या जाळ्यात! साईबाबांच्या बदनामीकारक व्हिडीओंना चाप बसणार! दिल्ली उच्च न्यायालयाचे GAC ला दणका शिर्डीत १३ ते २१ ऑगस्टदरम्यान साईसच्चरित पारायण सोहळा! धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल मंत्र्यांचे राजकारण वाढले-मंत्र्यांच्या तिसऱ्या पिढ्या सत्तेत-२० वर्षे रस्त्याची वाट लागली-मंत्री-मह... कर्करोग रुग्णांसाठी शिर्डीत मोफत हाडांची तपासणी श्री साईनाथ रुग्णालयात १५ ऑगस्टला विशेष शिबिर कमरेला १० इंची कोयता-लोकरे जेरबंद-शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल-वृंदावन हॉटेल येथे शिर्डी पोलिसांच... नगर–मनमाड रोडवरील बिअर शॉपी पुन्हा चर्चेत; बिअरची बाटली डोक्यात फोडली! चावडी-द्वारकामाईच्या मार्गासाठी दिशादर्शक फलकांची मागणी साईभक्त संतोष कोते यांचे संस्थानच्या कार्यका...
अ.नगरक्राईम

समता पतसंस्थेच्या “मॅनेजरच्या सांगण्यावरूनच पैसे टाकले” भोंदू खरातची न्यायालयात धक्कादायक कबुली

ईडी च्या ताब्यात असलेल्या भोंदू खरातने अखेर मौन सोडत विशेष न्यायालयात मोठा खुलासा केला आहे. “समता पतसंस्थेच्या मॅनेजरच्या सांगण्यावरूनच विविध खात्यांमध्ये पैसे जमा केले,” अशी धक्कादायक कबुली खरातने न्यायालयासमोर दिल्याने संपूर्ण प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. मात्र, खात्यांवरील नॉमिनीबाबत आपल्याला काहीही माहिती नसल्याचे सांगत खरातने हात वर केले.
दि. २० रोजी मुंबई येथील विशेष पीएमएलए न्यायालयात खरातला हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायाधीशांनी “तुमच्यावर नेमके काय आरोप आहेत, हे तुम्हाला समजतेय का?” असा प्रश्न विचारला असता, आतापर्यंत शांत असलेल्या खरातने प्रथमच भूमिका मांडली.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


“माझ्याकडे आलेले पैसे मी समता पतसंस्थेच्या मॅनेजरला दाखवले होते. ही सहकारी बँक असून येथे ९ टक्के व्याज मिळते, असे सांगून त्यांनीच मला विविध अकाऊंटमध्ये पैसे ठेवण्याचा सल्ला दिला,” असे खरातने न्यायालयात सांगितले. त्यानुसारच आपण वेगवेगळ्या खात्यांमध्ये पैसे जमा केल्याचे त्याने स्पष्ट केले.मात्र, न्यायालयाने “जर सर्व व्यवहार नियमानुसार होते, तर या खात्यांना वारसदार (नॉमिनी) करण्यामागचे कारण काय?” असा सवाल उपस्थित करताच खरातने “त्याबाबत मला काहीच माहिती नाही,” असे उत्तर दिले. “आता तपास झाला आहे. मी आणि आवारे जेलमध्ये आहोत, एवढेच मला माहिती आहे,” असे सांगत त्याने जबाब झटकण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा न्यायालयीन वर्तुळात सुरू आहे.


दरम्यान, खरातची ईडी कोठडी मंगळवारी (दि. २६) संपत असल्याने त्याला पुन्हा विशेष न्यायालयात हजर केले जाणार आहे. यावेळी ईडी आणखी कोठडीची मागणी करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या संपूर्ण प्रकरणात ईडी ने मोठी कारवाई करत दि. १३, १४, १७, २३ एप्रिल तसेच ५ आणि १८ मे रोजी शिर्डी, राहाता, नाशिक, पुणे यांसह तब्बल १३ ठिकाणी छापे टाकले होते. या कारवाईत १३.९२ कोटी रुपयांची रोख रक्कम, ५००० अमेरिकी डॉलर, १.१२ कोटींचे दागिने जप्त करण्यात आले होते. तसेच २.२५ कोटींची बँक खाती गोठविण्यात आली आहेत.
या व्यवहारांमध्ये मोठ्या प्रमाणात मनी लॉडरिंग झाल्याची शक्यता व्यक्त करण्या

त येत असून, ईडी त्या दिशेने सखोल तपास करत आहे. खरातच्या कबुलीनंतर आता समता पतसंस्थेतील नेमके कोण-कोण रडारवर येणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button