Letest News
भोंदू बाबाशी नाव जोडल्याने केसरकर संतापले ‘राजकीय कट’ असल्याचा थेट आरोप!” “ओळख मान्य पण संबंध नाकारल... शिर्डी गॅस टंचाईप्रकरणी पुरवठा अधिकाऱ्यांना निवेदन 24 तासांचा अल्टिमेटम समीर वीर आक्रमक शिर्डीत भव्य नेत्र तपासणी शिबिर- १५० रुग्णांना दिलासा मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत शिर्डीत ‘भोंदू बाबाचा’ काळा साम्राज्य उघड! श्रद्धा अश्लील व्हिडिओ-खंडणी आणि बलात्काराचा थरारक गुन्हे... महिलांचे नाव उघड करू नये-कोपरगावात गुन्हा दाखल पोलिसांचे आवाहन: पिडीतांची ओळख जाहीर केल्यास कठोर कार... अहिल्यानगरमध्ये सुट्या पेट्रोल-डिझेल विक्रीवर बंदी जिल्हाधिकाऱ्यांचे कडक आदेश गॅस साठी हवालदिल शिर्डी-24 तासांत व्यवस्था सुधारा अन्यथा आमरण उपोषण – समीर विर यांचा एल्गार शिर्डीत ‘गणेश गॅस एजन्सी’चा काळाबाजार उफाळला रांगेत श्रीमंतांना मागच्या दाराने सिलेंडर – प्रशासन झोप... मध्यरात्री दरोड्याने थरकाप-अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या पथकाची दमदार कामगिरी – आंतरजिल... शिर्डीत ‘जमीन सौदा’ बॉम्ब फुटणार? भोंदू बाबा कॅप्टन अशोक खरातच्या ५० कोटींच्या व्यवहारावर पोलिसांची ...
अ.नगरराजकीय

गांधी भारताचे नव्हे तर पाकिस्तानचे राष्ट्रपिता भट्टाचार्य

अभिजित भट्टाचार्य सध्या एका वेगल्या कारणामुळे चर्चेत आले आहेत. त्यांनी महात्मा गांधी हे भारताचे नव्हे तर पाकिस्तानचे राष्ट्रपिता आहेत, अशा आशयाचं विधान केलं आहे.
अभिजित भट्टाचार्य हे यूट्यबवरील एका पॉडकस्टमध्ये बोलत होते. यावेळी बोलताना अभिजित भट्टाचार्य यांनी महात्मा गांधी तसेच भारत आणि पाकिस्तान यावर भाष्य केलं.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

महात्मा गांधी यांच्यापेक्षाही पंचमदा (आर. डी. बर्मन) मोठे होते. पंचमदा हे संगितातील राष्ट्रपिता होते. महात्मा गांधी हे भारतासाठी नव्हे तर पाकिस्तानसाठी राष्ट्रपिता होते. भरत हा देश पहिल्यापासूनच होता. पाकिस्तानची निर्मिती करण्यात आली. त्यामुळे चुकून महात्मा गांधी यांनी भारताचे राष्ट्रपिता असल्याचं सांगण्यात येतं, असं अभिजित भट्टाचार्य म्हणाले.

त्यांच्या या विधानानंतर संपूर्ण जग महात्मा गांधी यांच्यापुढे झुकतं ते का? असं विचारण्यात आलं. त्यावर बोलताना आगामी 10 वर्षांनंतर तुम्ही अशा प्रकारचे प्रश्न विचारणारही नाहीत, असं उत्तर अभिजित भट्टाचार्य यांनी केलं. अभिजित भट्टाचार्य यांच्या या विधानाचा व्हिडीओ सध्या सगळीकडे व्हायरल होत आहे. त्यामुळे त्यांच्या या विधानानंतर नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

दरम्यान, अभिजित भट्टाचार्य काही दिवसांपूर्वी एका अनोख्या कारणामुळे चर्चेत आले होते. मुंबईत जगप्रसिद्ध गायक दुआ लिपा हिचा एक लाईव्ह कॉन्सर्ट झाला होता. या लाईव्ह् कॉन्सर्टदरम्यान अभिजित भट्टाचार्य यांच्या गाण्यावर दुआ लिपा चांगलीच थिरकली होती. त्यानंतर अभिजित भट्टाचार्य नव्याने चर्चेत आले होते.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button