Letest News
साईदरबारात सोन्यापेक्षा प्रामाणिकपणाला किंमत!४५ हजारांची सोन्याची अंगठी सापडली कर्मचाऱ्याने क्षणाचाह... शिर्डी पोलिसांचा दणका! अट्टल मोटारसायकल चोरट्याच्या मुसक्या आवळल्या श्रेय घ्यायचं असेल तर मृत्यूची जबाबदारीही घ्या!’ पिपाडांचा विखेंवर घणाघाती हल्लाबोल वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’चा सवाल एलसीबीचा हातोडा! ३०.४० लाखांचा मुद्देमाल जप्त शिर्डीतील आरोपीसह तिघे... शिर्डीत १७ सप्टेंबरला विशेष आधार व डाक सेवा शिबिरसन्मित्र युवक मंडळ व पोस्ट ऑफिस शिर्डीचा संयुक्त उप... श्री साईबाबा हॉस्पिटलला न्यूरोसर्जरीसाठी ४९ लाखांचे अत्याधुनिक उपकरण ‘साई ज्योत’ पेटली अन् पाकिटांचा धूर निघाला! चेअरमन विठ्ठल पवारांचा विरोधकांवर घणाघाती हल्ला शिर्डीतील वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’च्या वृत्तानंतरही कारवाई नाही! पोलिसांच्या कथित संगनमताची नागरिकां... ज्येष्ठ प्रगतिशील शेतकरी ज्ञानदेव (आबा) गोंदकर यांचे निधन साई समाधी मंदिरात नव्या चांदीच्या नंदीची विधिवत प्रतिष्ठापना
राजकीयशिर्डी

नारायण राणेंचा घणाघात..पुढच्या निवडणुकीपर्यंत उद्धव ठाकरे यांचा पक्षच राहणार नाही

विकास समृद्धी हे उद्धव ठाकरेचे काम नाही. विरोधकांना शिव्या घालणे अन चांगल्या कामात विघ्न आणण्याचे काम उद्धव ठाकरे करत असल्याची घणाघात टीका भाजपा खासदार नारायण राणे यांनी शिर्डीत केलीय. पुढच्या निवडणूकी पर्यंत उद्धव ठाकरे यांचा पक्षा राहणार नाही असा खळबळजनक दावा नारायण राणे यांनी यावेळी केलाय.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

भाजपाचे खासदार नारायण राणे यांनी आज श्रीरामनवमी निमित्ताने सहपत्नीक शिर्डीत येऊन साईबाबांच्या समाधीचे मनोभावे दर्शन घेतले आहे. साई दर्शनानंतर माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांचा चांगलाच समाचार घेतलाय. विधायक सामाजिक विकास कामांची विचार सारणी उद्धव ठाकरे यांची नाही. 39 वर्षा मी उद्धव ठाकरे बरोबर कायम केलेय. बाळासाहेब ठाकरे होते त्यावेळी पक्षा होता. साहेब गेले आणि शिवसेना संपली असल्याचही नारायण राणे म्हणाले आहे.

संजय राऊत सकाळी उठल्यावर घरा बाहेर मीडियाला बोलून दुकाना चालवतो. संजय राऊतने आपले कर्तव्य सांगावे देशासाठी राज्यासाठी आणि स्वतःचा गावासाठी काय योगदान आहे. संजय राऊतचा कुठल्याही भाष्याला मी उत्तर देणार नाही. संजय राऊताला मूर्ख माणूस समजत असल्याचही राणे यावेळी म्हणाले आहे. संजय राऊतचे प्रत्येक वक्तव्य वाद निर्माण करणारे आहे.

कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांना बद्दल केलेल्या व्यक्तव्यावर बोलतांना , कोकाटे यांनी शेतकऱ्यांना बदल व्यक्त केले मत चुकीचे आहे. असेही राणे म्हणाले आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button