Letest News
गुरुपौर्णिमेच्या मुख्य दिवशी शिर्डीत भक्तीचा महासागर-लाखो साईभक्तांनी घेतले समाधीचे दर्शन अढळ श्रद्धेचा सुवर्णमुकुट! आंध्रच्या साईभक्ताकडून श्री साईबाबांच्या चरणी ८२.३९ लाखांचा सुवर्ण मुकुट ... साईचरणी नतमस्तक झाले अभिनेते सोनू सूद-गुरुपौर्णिमेनिमित्त घेतले समाधीचे दर्शन गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वावर ११३ साईभक्तांचे महादान रक्तदानातून मानवतेची खरी सेवा परवाना की गैरवापर? माजी उपसरपंचांशी संबंधित असल्याची चर्चा असलेल्या क्लबवर पोलिसांची कारवाई शिर्डीजवळील रिंगरोडवर बाभळीच्या झाडाला गळफास-बुलढाण्यातील ३६ वर्षीय तरुणाची आत्महत्या-परिसरात खळबळ साईभक्ताच्या प्रामाणिकपणाला सलाम! १५४१० ची हरवलेली पर्स मालकाला सुखरूप परत रणजीत गलांडे यांच्या नेतृत्वाखाली शिर्डी पोलिसांची मोठी कामगिरी चेन स्नॅचिंग टोळ्या जेरबंद "तलाठी भरती (२०२३) घोटाळ्यात विखे पाटलांचा राजीनामा घ्यायला काय हरकत आहे?"रोहित पवारांचा सरकारवर हल्... जबलपूरच्या साईभक्ताकडून ६.२८ लाखांचा सुवर्ण मुकुट तर वडोदऱ्याच्या भक्ताकडून ३.३४ लाखांचे सुवर्ण 'ॐ' ...
अ.नगरशिर्डी

सूर्य कुमार यादव नंतर आकाश अंबानी यांनी घेतले साईबाबांचे दर्शन!

शिर्डी( प्रतिनिधी) मुंबई इंडियन्स क्रिकेट संघ बुधवारी झालेल्या दिल्लीबरोबरच्या क्रिकेट आयपीएल स्पर्धेमध्ये मोठ्या फरकाने विजयी झाला आहे. विशेष म्हणजे मुंबई इंडियन्सचे मालक आकाश अंबानी हे मंगळवारी शिर्डीत येऊन त्यांनी साईबाबांचे दर्शन घेत मनोमन साईबाबांना मुंबई इंडियन्स संघ या क्रिकेट मॅच मध्ये विजयी होऊ दे असे साकडे घातले होते.व त्यांचे प्रार्थना साईबाबांनी सफल केली आहे. बुधवारी झालेल्या मॅच मध्ये मुंबई इंडियन्स संघ विजयी झाला. व मुंबई इंडियन्स संघ आता प्ले ऑफ मध्ये दाखल झाला आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


मुंबईतील वानखेडेच्या घरच्या मैदानात मुंबई इंडियन्सचा हा दमदार विजय सर्वांनाच या मोसमातील आयपीएलचा टॉप विनर होईलच असे एक प्रकारे सांगून गेला आहे. सूर्यकुमार यादवने संथ खेळपट्टीवर धडाकेबाज फटकेबाजी केली. सूर्याच्या नाबाद ७३ धावांच्या खेळीवर मुंबईच्या संघाला १८० धावांचा डोंगर उभारता आला होता. दिल्लीचा संघ आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला खरा. पण मुंबईच्या गोलंदाजांनी दिल्लीच्या फलंदाजांना आपल्या तालावर नाचवले आणि ५९ धावांनी दणदणीत विजय साकारला.


वानखेडेची खेळपट्टी संथ होत चालली होती. त्यामुळे रोहित शर्मा, तिलक वर्मा आणि हार्दिक पंड्या या नामांकित फलंदाजांना जास्त धावा करता आल्या नाहीत. हे तिघेही अपयशी ठरले असले तरी सूर्याने मात्र धमाकेदार फटकेबाजी केली. सूर्याने खेळपट्टीवर सेट होण्याचा निर्णय घेतला आणि त्यामध्ये तो यशस्वी ठरला.

सूर्याने सुरुवातीला आपले अर्धशतक झळकावले आणि अखेरच्या दोन षटकांत त्याने नमन धीरच्या साथीने दिल्लीच्या गोलंदाजांना आपल्यापुढे लोटांगण घालायला भाग पाडले. सूर्या आणि नमन यांनी अखेरच्या दोन षटकांत ४८ धावांचा पाऊस पाडला. या अखेरच्या दोन षटकांत मुंबईच्या बाजूने सामना मुंबईच्या बाजूने फिरल्याचे पाहायला मिळाले. सूर्याने यावेळी ४३ चेंडूंत ७ चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर ७३ धावांची महत्वपूर्ण खेळी साकारली.

नमन धीर यावेळी चांगलाच आक्रमक फलंदाजी करत होता. नमनने यावेळी फक्त ८ चेंडूंत दोन चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर नाबाद २४ धावांची खेळी केली. त्यामुळेच मुंबईच्या संघाला १८० धावा करता आल्या.दिल्ली संघ हा फलंदाजीसाठी उतरला खरा, पण मुंबईच्या गोलंदाजांनी यावेळी त्यांना आपल्या तालावर नाचवले.

दुसऱ्या षटकात मुंबईने फॅफ ड्यु प्लेसिसला ६ धावा करता आल्या. केएल राहुलला ११ धावांवर यावेळी समाधान मानावे लागले. हे दोघे बाद झाले आणि त्यावेळीच दिल्लीचा संघ पराभूत होईल, हे जवळपास स्पष्टच झाले होते. मुंबईच्या गोलंदाजांनी त्यानंतर तिखट मारा केला आणि त्यापुढे दिल्लीच्या सघाचा निभाव लागला नाही.

त्यामुळेच मुंबईच्या संघाला यावेळी दमदार विजय मिळवता आला.
दोन्ही संघांसाठी हा सामना महत्वाचा होता. कारण जो संघ जिंकेल त्यांना प्ले ऑफमध्ये आपले स्थान भक्कम करण्याची संधी होती. यामध्ये मुंबईचा संघ यशस्वी ठरला आहे. विशेष म्हणजे मुंबई इंडियन्स क्रिकेट संघाचे मालक आकाश अंबानी हे मंगळवारी शिर्डीत आले होते त्यांनी साई दर्शन घेतले. साईबाबांना मनोमन प्रार्थना केली होती.

ही प्रार्थना सफल झाली आहे. भारत पाकिस्तान युद्ध परिस्थिती शांत झाल्यानंतर परत या मोसमातील आयपीएलचे सीजन सुरू होण्या अगोदर आदल्या दिवशी मुंबई इंडियन्सचा प्रसिद्ध क्रिकेट खेळाडू सूर्यकुमार यादव हा आपल्या पत्नीसह शिर्डीत आला होता त्यांनीही साई दर्शन घेऊन मनोमन साईंकडे विजयासाठी प्रार्थना केली होती. आणि बुधवारी झालेल्या मुंबईतील क्रिकेट मॅच मध्ये सूर्यकुमार यादवने फटकेबाजी करत दमदार नाबाद 73 धावा केल्या.

एक प्रकारे सूर्य कुमार यादव व आकाश अंबानी यांची मनोकामना साईबाबांनी बुधवारी मुंबई झालेल्या क्रिकेट मॅच च्या विजयामुळे जणू पूर्ण केली. या मोसमातील आयपीएल क्रिकेट स्पर्धा सुरू झाल्यानंतर प्रथम मुंबई इंडियन्स संघ सर्व मॅच पराजित होत होता. त्यामुळे साईभक्त असणाऱ्या मुंबई इंडियन संघाच्या मालकिन नीता अंबानी ह्या मुंबई इंडियन्स खेळाडू रोहित शर्मा बरोबर शिर्डीत दर्शनाला आल्या.

त्यांनी साईबाबांचे दर्शन घेतले व त्यानंतर मुंबई इंडियन्सचा पहिला विजय या मोसमातील आयपीएल क्रिकेट स्पर्धेत झाला. त्यानंतर आकाश अंबानी हे सूर्यकुमार यादव यांच्याबरोबर शिर्डीत येऊन त्यांनी साई दर्शन घेतले व दुसऱ्याच दिवशी पार पडलेल्या क्रिकेट मॅच मध्ये मुंबई इंडियन्स संघ दुसऱ्यांदा विजयी झाला होता. त्यानंतर परत आकाश अंबानी हे मुंबई इंडियन्सच्या क्रिकेट मॅच अगोदर शिर्डीत आले.

त्यांनी साई दर्शन घेतले व त्यानंतरही झालेल्या मॅच मध्ये मुंबई इंडियन्स संघ विजयी झाला . मात्र मुंबई इंडियन्स संघ व गुजरात यांच्या स्पर्धेवेळी नीता अंबानी ,आकाश अंबानी किंवा मुंबई इंडियन्स खेळाडू साई दर्शनाला शिर्डीत आले नव्हते. आणि योगायोग म्हणा की विशेष म्हणा गुजरात विरुद्ध च्या क्रिकेट सामन्यात मुंबई इंडियन्स संघ पराभूत झाला. भारत पाक युद्धसदृश्य परिस्थितीमुळे काही दिवस आयपीएल क्रिकेट स्पर्धा बंद ठेवण्यात आल्या होत्या.

या स्पर्धा युद्ध परिस्थिती शांत झाल्यानंतर सुरू होण्याची घोषणा झाली व सूर्यकुमार यादव पत्नीसह शिर्डीत आला व त्याने साई दर्शन घेतले. त्यानंतर मंगळवार 20 मे 2025 रोजी आकाश अंबानी शिर्डीत आले त्यांनीही साई दर्शन घेतले. मुंबई इंडियन्स विजया साठी दोघांनीही साई चरणी प्रार्थना केली.

व आज मुंबई इंडियन्स संघ दिल्ली विरुद्ध दमदार खेळी करून दमदार विजय मिळवत प्ले ऑफ मध्ये दाखल झाला आहे. त्याचप्रमाणे सूर्य कुमार यादवनेही दमदार खेळी केली आहे. सूर्यकुमार यादव, आकाश अंबानी यांनी मनोमन साईबांबाचे धन्यवाद मानले आहेत. श्री साईबाबांचा हा एक चमत्कारच आहे .असे साई भक्तांकडून सध्या बोलले जात आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button