Letest News
शिर्डीत मजुरांच्या खोलीत घरफोडी चार मोबाईलसह ₹65 हजारांचा ऐवज लंपास शिर्डीत रिक्षातून वृद्ध शेतकऱ्याची लूट- सराईत शंकर चौधरी ऊर्फ रहीम पठाण जेरबंद डॉ. मीरा ढास यांनी स्वीकारला शिर्डी येथील माहिती अधिकारी पदाचा कार्यभार मोहरा अटकेत… पण सूत्रधारापर्यंत तपास कधी?व्यवस्थापकाला बेड्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्... साईचरणी प्रामाणिकतेचा आदर्श! गाभाऱ्यात सापडलेले ३४९० भाविक महिलेला सुखरूप परत दिवसाढवळ्या घरफोडी कुलूप तोडून घरातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला कोपरगावात स्थानिक गुन्हे शाखेचे धडक सत्रपाच ठिकाणी छापे ११ आरोपींवर ५ गुन्हे २.१४ लाखांचा मुद्देमाल ... विजयराव कोते पाटील यांचा सेवासंकल्प साईबाबांच्या पालखीसह अखेरची ऐतिहासिक तीर्थयात्रा सेवेतून साईभक्तीचा साक्षात्कार तीन दिवस १० हजार भाविकांना महाप्रसादअन्नदान हीच खरी साईसेवा-अय्यर परि... समता पतसंस्था प्रकरण : व्यवस्थापक मिलिंद बनकर व अध्यक्ष काका कोयटे यांना अटक करण्याची मागणी
राजकीयशिर्डी

लोकक्रांती सेना पुरस्कृत स्वाभिमानी शिर्डी आघाडी कडून प्रभाग ६ (अ) मध्ये ताराचंद नाना शेजवळांची दमदार एन्ट्री — बदलाचा बिगुल वाजला!

प्रभाग क्रमांक ६ (अ) मधून लोकक्रांती सेना पुरस्कृत स्वाभिमानी शिर्डी आघाडी कडून ताराचंद नाना शेजवळ यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून त्यांनी प्रभागातील वर्षानुवर्षे रखडलेल्या समस्यांना प्राधान्य देत व्यापक बदल घडवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

sai nirman
जाहिरात

ताराचंद नाना म्हणाले, “रस्ते, पाणी, गटार, लाईट आणि स्वच्छता—या मूलभूत सुविधांची अवस्था बिकट आहे. बदलाची गरज लोकांनी अनेक वर्षे अनुभवली, आता हा बदल करून दाखवण्याची जबाबदारी मी स्विकारली आहे.”

प्रभागातील असमान पाणीपुरवठा, गटारव्यवस्थेचा ऱ्हास आणि जीर्ण रस्ते या तातडीच्या समस्यांवर ते पहिल्या १०० दिवसांत ठोस कामे करण्याच्या भूमिकेत आहेत. सर्व रस्त्यांचे डांबरीकरण, गटारलाइनचा संपूर्ण बदल व स्वच्छतेसाठी कडक यंत्रणा उभारणे हा त्यांचा पहिला कार्यक्रम असेल.

DN SPORTS

स्वाभिमानी शिर्डी आघाडीची निवड का करावी, यावर बोलताना त्यांनी सांगितले, “ही आघाडी सत्तेच्या राजकारणापेक्षा जनतेला केंद्रस्थानी ठेवते. जेष्ठ नेते बाबूजी पुरोहित यांचे मार्गदर्शन आणि युवा नेतृत्वामुळे पारदर्शी व गटबाजीविरहित प्रशासन शक्य आहे.”

तरुणांसाठी क्रीडा व कौशल्यविकास सुविधा, महिलांसाठी सुरक्षा आणि स्वयं-सहायता गटांना पाठबळ तसेच प्रभागातील स्वच्छता मोहिमेला गती देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

“मी निवडून आलो तर माझे दार नागरिकांसाठी नेहमी खुले असेल. मी ऑफिसमध्ये बसणारा नव्हे तर लोकांमध्ये फिरून तक्रारी तत्काळ सोडवणारा प्रतिनिधी असेन,” असे ते म्हणाले.

शेवटी ताराचंद नाना शेजवळ यांनी नागरिकांना आवाहन करत म्हटले, “मी वचन नव्हे—काम देण्याच्या भूमिकेत आलो आहे. प्रभाग ६ (अ) चा सर्वांगीण विकास हेच माझे ध्येय आहे.”

kamlakar

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button