Letest News
कर्करोग रुग्णांसाठी शिर्डीत मोफत हाडांची तपासणी श्री साईनाथ रुग्णालयात १५ ऑगस्टला विशेष शिबिर कमरेला १० इंची कोयता-लोकरे जेरबंद-शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल-वृंदावन हॉटेल येथे शिर्डी पोलिसांच... नगर–मनमाड रोडवरील बिअर शॉपी पुन्हा चर्चेत; बिअरची बाटली डोक्यात फोडली! चावडी-द्वारकामाईच्या मार्गासाठी दिशादर्शक फलकांची मागणी साईभक्त संतोष कोते यांचे संस्थानच्या कार्यका... पुणतांब्यात चांगदेव महाराजांच्या दर्शनासाठी दीड लाख भाविकांचा जनसागर! समृद्धी महामार्गावर आगीचा तांडव!मालट्रक-कंटेनरचे टायर फुटल्याने भीषण अपघात- वाहनाने घेतला पेट= एकाचा... पालखी सोहळ्यात दोन भाविक महिलांच्या सोनसाखळ्या लंपास! अयोध्या राममंदिरातील दानपेटी प्रकरणाच्या निषेधार्थ कोपरगावात शिवसेनेचे आंदोलन महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय-शिर्डी नगरपरिषदेला मिळाला परिविक्षाधीन मुख्याधिकारी! तीन किलोमीटर दूर श्रीराम मंदिर कशासाठी? साईभक्त डॉ. एस. बी. गोंदकर पाटील यांचा प्रांजळ आग्रह
अ.नगरक्राईम

दस्तऐवजांमध्ये फेरफार उघड-कोपरगावात वतन जमिनीवर फसवणूक!-शेकडो महार कुटुंबे बेघर —

कोपरगाव तालुक्यातील महार समाजाच्या वतन जमिनीवर झालेल्या फसवणुकीमुळे शेकडो कुटुंबे बेघर झाल्याची गंभीर बाब समोर आली आहे. या प्रकरणी सकल आंबेडकरी समाजाचे तालुका अध्यक्ष प्रकाश दुशिंग यांनी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाकडे तक्रार दाखल केली असून, न्याय मिळेपर्यंत सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


📜 दस्तऐवजांमध्ये फेरफार उघड

सर्व्हे नं. ५ ते ९ चे रूपांतर नविन सि.स.नं. १९३५ अ मध्ये

उपविभागीय अधिकारी यांच्या पत्र क्र. कावि/मिन-२२८/इ/228/७०६५९०२/२०२ दिनांक ८ ऑक्टोबर २०२५ नुसार, २५ सप्टेंबर २०२५ रोजी अपर जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली होती. बैठकीत प्राप्त कागदपत्रांचे परीक्षण करताना मौजे कोपरगाव येथील जुने सर्व्हे क्रमांक ५, ६, ७, ८, ९ या जमिनींचे रूपांतर नविन सर्व्हे नं. १९३५ अ मध्ये झाले असल्याचे स्पष्ट झाले. या पार्श्वभूमीवर उपअधिक्षक (भूमी अभिलेख) यांना स्थळनिरीक्षण, पंचनामा आणि चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले गेले आहेत.


🗣️ “राजकीय नव्हे, कायदेशीर लढा” — प्रकाश दुशिंग

तक्रारदार प्रकाश दुशिंग यांनी सांगितले की, “गावातील मूळ जमिनदारांच्या हक्कांवर गदा आणत काही व्यक्तींनी कागदपत्रांमध्ये फेरफार करून जमिनी बळकावल्या. त्यामुळे अनेक मागासवर्गीय कुटुंबांची उपजीविका उद्ध्वस्त झाली आहे. आम्ही कोणतीही राजकीय बाजू न घेता, कायदेशीर मार्गाने न्याय मिळवण्यासाठी लढत आहोत.”


📢 निष्पक्ष चौकशी व पुनर्वसनाची मागणी

ग्रामस्थ आणि तक्रारदारांची मागणी आहे की —

तातडीने निष्पक्ष चौकशी करण्यात यावी

ज्यांची घरे आणि जमिनी गमावल्या आहेत त्यांचे पुनर्वसन करण्यात यावे

स्थानिक प्रशासन, भूमी अभिलेख विभाग आणि पोलीस यांनी मिळून पीडितांना संरक्षण द्यावे

तहसिल कार्यालयाने स्पष्ट केले आहे की उपअधिक्षक (भूमी अभिलेख) यांनी सूचक चौकशी, सर्व्हे नोंदींचे परीक्षण आणि तांत्रिक तपासणी सुरू केली असून, प्राप्त अहवालानुसार पुढील कायदेशीर पावले उचलली जाणार आहेत.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button