Letest News
साईभक्ताची सापडलेली पर्स संस्थान कर्मचारी यांनी केली परत संस्थान कडून त्या कर्मचारीचे सन्मान साई संस्थान मधील माजी सैनिकांची पडताळणी त्यात अनेक माजी सैनिक बोगस निष्पन्न प्रा.राम शिंदे यांच्या अहिल्यानगर दौऱ्याप्रसंगी सुरक्षा व राजशिष्टाचाराबाबत गंभीर त्रुटीसंदर्भात दोष... आणीबाणीमध्ये कारावास भोगलेल्या संघर्षयात्रींचा उपजिल्हाधिकारी गिते यांच्या हस्ते गौरव संस्थानतर्फे एमएचटी-सीईटी परीक्षेसाठी स्मार्ट डिजिटल लर्निंग क्लास व कोचिंग सुविधा उपलब्ध हॉटेलमधील मोबाईल चोरी व पितळी भांडे चोरीचे गुन्हे शिर्डी पोलीसांनी उघड केले चक्क ड्युटीवर असताना सर्वांसमक्ष,न भीता कोणास हा महाभाग गांजा ओढतो ! आसिफ शेख याने औरंगजेबची स्तुती केल्याने त्यावर व अबू आझमीवर गुन्हा दाखल करावा वंदे मातरम संघटना शिर्डीतील २ तरुणांकडे पोलिसांना धारधार शस्त्र सापडले दोघे अटकेत रेखा जरे हत्याकांडातील मुख्य आरोपी सागर भिंगारदिवे यास जमीन मिळताच जल्लोष साजरा करणे पडले महागात
अ.नगरराजकीय

राज्यात कोरोनाचा वाढता प्रभाव परंतु घाबरून जाऊ नये दक्षता घेणे गरजेचे प्रशासना कडून आवाहन

भारतात करोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या 30 मे 2025 च्या आकडेवारीनुसार, देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 2,710 वर पोहोचली आहे.देशात सर्वाधिक सक्रिय कोविड-१ चे रुग्ण केरळमध्ये आहेत. तिथे 1,147 लोकांना लागण झाली आहे. त्यानंतर महाराष्ट्रात 467, दिल्लीत 294 आणि गुजरातमध्ये 223 रुग्ण आहेत.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

महाराष्ट्रात 84 नवे रुग्ण आढळले
महाराष्ट्राच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात कोविड-19 चे 84 नवीन रुग्ण आढळले आहेत. 84 रुग्णांपैकी 32 रुग्ण मुंबईत आढळले.

ठाणे महापालिका क्षेत्रात 14 रुग्ण, ठाणे ग्रामीण 2 रुग्ण, नवी मुंबई, कल्याण डोंबिवलीत 1, रायगडमध्ये 2 रुग्ण, नाशकात 1 रुग्ण, 19रुग्ण पुणे महापालिका क्षेत्रात साताऱ्यात दोन रुग्ण, कोल्हापूरात 2 रुग्ण, सांगलीत 3 रुग्ण इत्यादींचा समावेश आहे.

त्यामुळे यावर्षी राज्यात करोनामुळे बाधित झालेल्या लोकांची संख्या 681 झाली आहे. सध्या राज्यात 467 सक्रिय रुग्ण आहेत.WHO च्या माजी मुख्य वैज्ञानिक सौम्या स्वामीनाथन यांनी करोनाच्या वाढत्या रुग्णांवर प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, “यामुळे घाबरण्याची गरज नाही.

करोना व्हायरस भविष्यातही आपल्यासोबतच राहणार आहे. काही महिन्यांच्या अंतराने कोविड-१९ च्या रुग्णांमध्ये वाढ होईल. आपल्याकडे चांगली रोगप्रतिकारशक्ती आहे. लसीकरणामुळे आपल्याला अधिक संरक्षण मिळते. त्यामुळे करोनामुळे होणारा संसर्ग आता खूप सौम्य आहे.”

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button