Letest News
साई संस्थान मधील माजी सैनिकांची पडताळणी त्यात अनेक माजी सैनिक बोगस निष्पन्न प्रा.राम शिंदे यांच्या अहिल्यानगर दौऱ्याप्रसंगी सुरक्षा व राजशिष्टाचाराबाबत गंभीर त्रुटीसंदर्भात दोष... आणीबाणीमध्ये कारावास भोगलेल्या संघर्षयात्रींचा उपजिल्हाधिकारी गिते यांच्या हस्ते गौरव संस्थानतर्फे एमएचटी-सीईटी परीक्षेसाठी स्मार्ट डिजिटल लर्निंग क्लास व कोचिंग सुविधा उपलब्ध हॉटेलमधील मोबाईल चोरी व पितळी भांडे चोरीचे गुन्हे शिर्डी पोलीसांनी उघड केले चक्क ड्युटीवर असताना सर्वांसमक्ष,न भीता कोणास हा महाभाग गांजा ओढतो ! आसिफ शेख याने औरंगजेबची स्तुती केल्याने त्यावर व अबू आझमीवर गुन्हा दाखल करावा वंदे मातरम संघटना शिर्डीतील २ तरुणांकडे पोलिसांना धारधार शस्त्र सापडले दोघे अटकेत रेखा जरे हत्याकांडातील मुख्य आरोपी सागर भिंगारदिवे यास जमीन मिळताच जल्लोष साजरा करणे पडले महागात राहाता आणी कोपरगांव मध्ये गर्भनिदान करणाऱ्यांचे फुटले पेव ! राजरोसपणे गर्भनिदान करी यांना राहिलेना क...
Blog

श्री साई संस्थांनच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी विनाकारण खाजगी कामासाठी आपले कामाचे ठिकाण कामाच्या वेळेत सोडू नये!

शिर्डी ( प्रतिनिधी) श्री साईबाबा संस्थान मधील अधिकारी व‌ कर्मचारी यांनी आपल्या कामाच्या वेळेत आपल्याला नेमून दिलेल्या कामाची जागा सोडून बाहेर कोणत्याही खासगी कामासाठी जाऊ नये जर काही संस्थांचे महत्त्वाचे काम असेल अशा गरजेच्या जातेवेळी गेटपास घेऊनच बाहेर जावे व तशी जाताना येताना आपल्या विभागातील अधिकाऱ्यांशी चर्चा व नोंद करावी. असे परिपत्रक श्री साई बाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवशंकर यांनी संस्थांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी काढले आहे. त्यामुळे विनाकारण खाजगी कामासाठी आपले कामाचे ठिकाण सोडून फिरणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर मोठी वचक त्यामुळे निर्माण झाली आहे.
श्री साईबाबा संस्थान
जा.नं. एसएसएस/साप्रशा/आस्था/६१३/२०२३ दि. १४ जुन २०२३ रोजीचा आदेशानुसार
परिपत्रक काढले आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS


या परिपत्रकात म्हटले आहे की,श्री साईबाबा संस्थान शिर्डी अधिनस्त अधिकारी व कर्मचारी यांना काही खाजगी व आकस्मिक प्रसंगी विहीत
वेळेपूर्वी कार्यालय सोडावे लागल्यास त्याची नोंद हालचाल रजिस्टरमध्ये करुन, पूर्व परवानगीने कार्यालय
सोडणेबाबत तसेच अशा प्रकारची सवलत महिन्यातुन एकापेक्षा जास्त वेळ घेता येणार नाही असे आदेशीत करणेत
आलेले आहे.
तथापी, असे निदर्शनास येते की, वरिल निर्देशाचे पालन न करता, संस्थानचे कायम / कंत्राटी / मानधनावरील /
आऊटसोर्स कर्मचारी हे वैयक्तीक कामासाठी कामाची जागा सोडून बाहेर जातात. सदर बाब कार्यालयीन शिस्तीस धरुन्
नाही. सबब पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी,
वरील उपस्थितीत कर्मचा-यांना त्या त्या विभागातील अधिक्षक / विभाग प्रमुख यांनी गेटपास देणेत यावेत. सदर
गेटपास सुरक्षा रक्षकानी गेटवर जमा करून घेऊन त्यावर अधिकारी व कर्मचारी यांची बाहेर जाण्याची व परत आल्याची वेळ
नमूद करावी. सुरक्षा
रक्षकाने देखील त्यावर आपली स्वाक्षरी व नाव नमूद करुन सदरचे गेटपास संरक्षण विभागात जमाकरावेत. संरक्षण विभागाने सदर गेटपासची दरमहा पडताळणी करून, अधिकारी / कर्मचा-याचे नाव, बाहेर गेल्याचा दिनांक,वेळ परत आल्याची वेळ यानुसार विभागवार अहवाल तयार करुन सदर अहवाल रजा विभाग, प्रशासन शाखेकडे सादर
करावा. रजा विभागाने सर्व अहवाल तपासून खाडे तक्त्यासोबत पगार बील विभागास सादर करावे,
मासिक वेतनाची / मानधनाची परिगणना करताना दैनंदिन बायोमेट्रीक / फेस रिडींग रिपोर्ट (कामावर आगमन
निर्गमन वेळ) याबरोबरच संरक्षण विभागाकडील अहवालानुसार कर्मचारी यांचे कामाची जागा सोडून गेल्याचे व परत
आल्याच्या वेळही विचारात घेण्यात यावी.
सदर परिपत्रकाची अंमलबजावणी त्वरीत करणेत यावी. असे या परिपत्रकात श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री पी. शिवशंकर यांनी म्हटले आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button