Letest News
निमगाव को-हाळे बायपासवर भीषण अपघात — कातोरे वस्ती हादरली! काका कोयटे हजर हो! SID ची नोटीस-समता पतसंस्थेत १००+ बोगस खाती? सावकारीच्या जाळ्यात अडकलेले शिर्डी? खरात अटकेत-मोठ्या नावांची धास्ती!” “पोलीसांचा मोठा फटका! अशोक खर... शिर्डीची लेक ठरली उज्ज्वल यशाची प्रेरणा — डॉ. सृष्टी सोनवणे यांचे एमबीबीएसमध्ये उच्च श्रेणीने यश शिर्डीला जोडणाऱ्या रस्त्यासाठी २१३ कोटी रुपयांची तरतूद “कायदा राखणारेच झाले लाचखोर!” — पाथर्डीत पोलीसांचा काळा चेहरा उघड “१० हजारांत पोटातील भविष्य विक्रीला!” — राहाता तालुक्यात गर्भलिंग निदानाचा काळाबाजार उघड जबरदस्ती धर्मांतराचा आरोप —आरोपी ताब्यात-विविध कलमांन्वये गुन्हा दाखल- शिर्डीत खळबळ- मुंबईच्या झोपडपट्टी दादाची शिर्डीत पेट्रोल पंपावर दादागिरी -शिर्डी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल “९ नाण्यांचा वाद” पुन्हा पेटला — शिर्डीत संतापाची लाट-“भीती संपली म्हणून धंदा?” — ग्रामस्थांचा थेट स...
अ.नगर

नगर मनमाड रस्त्याचे काम संथ गतीने सुरु आजून किती बळी घेणार हा रस्ता नागरिकांचा सवाल 

शिर्डी प्रतिनिधी

sai nirman
जाहिरात

गेल्या पाच ते सहा वर्षांपासून नगर मनमाड या राष्ट्रीय महामार्गाचे काम कासवगतीने सुरु असून यामुळे अनेक अपघात घडले असून शेकडो निष्पाप नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. या पाच वर्षात दोनही माजी खासदारांनी या रस्त्यासाठी केंद्रातून शेकडो कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणल्याचा दावा केला होता तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सुद्धा हा रस्ता लवकरच पूर्ण होईल असे आश्वासन दिले होते मात्र या सर्वांच्या घोषणा आणि आश्वासने हवेतच विरळून गेले आहे असा अनुभव आजरोजी आला आहे. त्यातच आजपर्यंत या रस्त्याच्या कामाचे टेंडर घेणारा एकही ठेकेदार टिकला नसून काहीजण तर चक्क काम सोडून पळून गेले आहे, त्याच कारण गुलदस्त्यात जरी असलं तरी केवळ टक्केवारी आणि कमिशन या दोन कारणानेच कोणताही ठेकेदार टिकत नाही अशी दबक्या आवाजात नागरिकांमध्ये चर्चा सुरु आहे. मंग ही टक्केवारी लोकप्रतिनिधी मागतात कि शासकीय अधिकारी हे शोधणे कठीण नसले तरी राज्यातील सर्वात महत्वाच्या रस्त्याची झालेली दुरावस्था नेत्यांना का दिसत नाही हाच महत्वाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. कोपरगावचे आमदार आशुतोष काळे, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री प्राजक्त तनपुरे, आमदार संग्राम जगताप, नवनिर्वाचित खासदार निलेश लंके व खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या मतदार संघातील गावांशी संबंधित हा राष्ट्रीय माहामार्ग आहे. शेतकरी, विदयार्थी, छोटे मोठे व्यावसायिक, उद्योजक, साखर कारखाने यासंह श्रीक्षेत्र साईंची शिर्डी व श्रीक्षेत्र शनिशिंगाणापूर याठिकाणी दररोज येणारे लाखो भाविक यांच्यासाठी हा रस्ता महत्वाचा असला तरी आजरोजी वरील सर्वाना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत आहे. अपघात, वाहनांचे नुकसान, जोखामीचा प्रवास, शालेय विदयार्थ्यांना होणारा विलंब अशा महत्वाच्या बाबींचा सर्वच लोकप्रतिनिधींना विसर पडला आहे कि, ते जाणून बुजून दुर्लक्ष करत आहे हे मात्र अजूनही समजलेलं नाही. मात्र हेच लोकप्रतिनिधी निवडणुकीच्या काळात नगर मनमाड रस्त्याचं भांडवल करून राजकारण करताना लोकांनी अनुभवलं असून लोकांचा संयम सुटला असून नेत्यांवर विश्वासही राहिला नाही. याचा फार मोठा फरक येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पडू शकतो असा राजकीय तज्ञांचा अंदाज आहे. मात्र नगर मनमाड रस्त्याला लागलेलं ग्रहणातून नागरिकांना कधी सुटका मिळेल? आणि ह्या रस्त्याचे काम कधी पूर्ण होणार? याचं उत्तर मात्र आजरोजी कुणाकडेही नाही हेच खरं दुर्दैव्य म्हणावं लागेल.

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button