Letest News
शिर्डीत १३ ते २१ ऑगस्टदरम्यान साईसच्चरित पारायण सोहळा! धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल मंत्र्यांचे राजकारण वाढले-मंत्र्यांच्या तिसऱ्या पिढ्या सत्तेत-२० वर्षे रस्त्याची वाट लागली-मंत्री-मह... कर्करोग रुग्णांसाठी शिर्डीत मोफत हाडांची तपासणी श्री साईनाथ रुग्णालयात १५ ऑगस्टला विशेष शिबिर कमरेला १० इंची कोयता-लोकरे जेरबंद-शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल-वृंदावन हॉटेल येथे शिर्डी पोलिसांच... नगर–मनमाड रोडवरील बिअर शॉपी पुन्हा चर्चेत; बिअरची बाटली डोक्यात फोडली! चावडी-द्वारकामाईच्या मार्गासाठी दिशादर्शक फलकांची मागणी साईभक्त संतोष कोते यांचे संस्थानच्या कार्यका... पुणतांब्यात चांगदेव महाराजांच्या दर्शनासाठी दीड लाख भाविकांचा जनसागर! समृद्धी महामार्गावर आगीचा तांडव!मालट्रक-कंटेनरचे टायर फुटल्याने भीषण अपघात- वाहनाने घेतला पेट= एकाचा... पालखी सोहळ्यात दोन भाविक महिलांच्या सोनसाखळ्या लंपास! अयोध्या राममंदिरातील दानपेटी प्रकरणाच्या निषेधार्थ कोपरगावात शिवसेनेचे आंदोलन
राजकीयशिर्डी

अजितदादांच्या अकाली निधनाने महाराष्ट्राची अपूरणीय हानी-डॉ. राजेंद्र पिपाडा यांची भावपूर्ण श्रद्धांजली

२००३ साली दुष्काळग्रस्त भागाच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा व्हावी यासाठी उपमुख्यमंत्री असताना अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत निळवंडे कालव्याच्या दुष्काळी परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेचे आयोजन भाजपाचे ज्येष्ठ नेते डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी केले होते. त्या काळात काही नेत्यांचा या कार्यक्रमाला विरोध असतानाही अजितदादांनी दिलेला शब्द पाळत सकाळी ठीक ८.३० वाजता कार्यक्रमस्थळी हजेरी लावली, अशी आठवण डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी काढली.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


या दुष्काळी परिषदेसह प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. ममता पिपाडा यांच्या कार्यकाळात राहाता नगरपालिकेअंतर्गत करण्यात आलेल्या विविध विकासकामांचे उद्घाटनही मा. अजितदादा पवार यांच्या हस्ते करण्यात आले होते. उद्घाटनापुरते मर्यादित न राहता अजितदादांनी प्रत्येक कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. काम योग्य दर्जाचे झाले आहे की नाही, स्वच्छता व निटनेटकेपणा राखला आहे का, याची काटेकोर तपासणी करून आढळणाऱ्या त्रुटी त्यांनी स्पष्ट शब्दांत मांडल्या, असे डॉ. पिपाडा यांनी सांगितले.


अजितदादा हे अत्यंत दिलखुलास, परखड आणि प्रशासनावर मजबूत पकड असलेले नेते होते. निर्णयक्षमता, वेळेचे काटेकोर नियोजन आणि कामाबाबत कोणतीही तडजोड न करणारी त्यांची कार्यशैली सर्वांसाठी आदर्शवत होती, असेही त्यांनी नमूद केले.
अजितदादांच्या अकाली निधनाने महाराष्ट्र राज्याची फार मोठी हानी झाली असून, ही पोकळी कधीही भरून न निघणारी आहे. दादांचे कार्य, शिस्त आणि नेतृत्व सदैव स्मरणात राहील, अशा शब्दांत डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित केली.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button