कर्करोगाला खचुन न जाता सामोरे जाण्याची गरजडॉ मुकुल घरोटे

शिर्डी प्रतिनिधी/ जेवण उलटी पोट दुखणे वजन कमी होणे या त्रासामुळे गेल्या तीन वर्षापासून कोपरगाव शहरातील महिला चंचल राजू गाडे वय ४० या त्रस्त होत्या केलेल्या वैद्यकीय तपासणीत त्यांना जठराचा कर्करोग असल्याचे लक्षणे दिसुन आले होते आजार उपचार व मार्गदर्शन यामुळे बरे वाटत असल्याने महिने उपचार बंद केले
मात्र पुन्हा त्रास सुरू झाल्यानंतर शिर्डी येथील साईबाबा संस्थानच्या सुपर हाॅस्पिटल मधील कर्करोग तज्ञ डॉक्टर मुकुंल घरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा औषध उपचार करण्यात आले औषध उपचार नंतर बरे झाल्यानंतर सदर महिलेचा नुकताच साईबाबा संस्थानचे वैद्यकीय संचालक डॉक्टर प्रीतम वडगावे कॅन्सर रोग तज्ञ डॉक्टर मुकुंल घरोटे यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला
घरोटे म्हणाले की कर्करोगाचे निदान झाले तरी खचुन न जाता वेळेवर औषध उपचार व तपासणी आदी केल्या पाहिजेत तसेच कुटुंबातील लोकांनी देखील रुग्णांना मानसिक आधार दिला
तर सहजपणे या आजारातून रुग्ण बरा होतो असे मत व्यक्त केले
त्यावेळी बोलताना रुग्ण चंचल राजु गाडे म्हणाल्या की साईबाबांचा आशीर्वाद व शिर्डी येथील साईबाबा सुपर हॉस्पिटलमध्ये मिळालेले उपचार मार्गदर्शन यामुळे आपल्याला जीवनदान मिळाले असल्याचे सांगितले
साईबाबा संस्थानने कर्करोग रुग्णांसाठी वैद्यकीय सुविधा उपलब्ध केल्यामुळे रुग्णानमधून समाधान व्यक्त होत आहे साईनाथ हाॅस्पिटल व साईबाबा सुपर हॉस्पिटलमध्ये महाराष्ट्र सह लगतच्या अतिदुर्गम भागातील रुग्ण मोठ्या प्रमाणावर रुग्णसेवेचा लाभ घेत असतात