Letest News
समान काम-समान वेतनासाठी संदीप सोनवणे यांचा एल्गार-साई संस्थानातील आऊटसोर्स कर्मचाऱ्यांवर अन्याय-सुवि... लहामगे व खाबिया ह्या गुटखा माफियांना नेमके कोणाचे अभय? शिर्डीत संतप्त सवाल बंदी असूनही गुटखा विक्री दीड लाखांचे दागिने सापडूनही मोह टाळला-स्वच्छता कर्मचाऱ्याने जपला साईसेवेचा मान दारूबंदी विभाग सुस्त-नगर परिषद मस्त-पोलिसांची सुरू आहे गस्त! शिर्डीत दारू धंदे सुरू आहे बिनधास्त वाढदिवसानिमित्त समाजसेवेचा अनोखा संकल्प-स्वराचा मुख्यमंत्री सहायता निधीस खारीचा वाटा-तांबे कुटुंबाच्... संविधान डोक्यावर घेऊन अशोक लोंढे यांची श्रीरामपूर ते शिर्डी पदयात्रा-तुकाराम मुंडे यांच्या कार्याला ... श्री साईचरणी २९ लाखांचा सुवर्ण मुकुट ५.४० लाखांचा सोन्याचा ब्रोचही अर्पण न्यायासनावरील दरारा-मनात साईभक्ती-राजेश गुप्ता साहेबांना भावपूर्ण निरोप हिरोज ऑफ अहिल्यानगर २०२६ पुरस्काराने अशोकलाल (काका) लोढा यांचा गौरव मंगळसूत्र सापडले पण परत न करता खिशात टाकले-शिर्डीत चोरीचा गुन्हा दाखल
राजकीयशिर्डी

साई आश्रम व मंदिर गाभाऱ्यातील सुरक्षा रक्षकांचा प्रामाणिकपणा हरवलेली बॅग व रोख रक्कम साईभक्ताला परत

शिर्डी | प्रतिनिधी
श्री साईबाबा संस्थानच्या साई आश्रम परिसरात कार्यरत सुरक्षा रक्षकांनी आपल्या प्रामाणिकपणाचा आदर्श घालून देत साईभक्ताची हरवलेली बॅग व त्यातील रोख रक्कम सुरक्षितपणे परत करून मानवतेचा आणि सेवाभावाचा उत्तम नमुना सादर केला आहे.
दि. 03 जून 2026 रोजी साई आश्रम येथील प्रसादालय परिसरात सुरक्षा रक्षक श्री. सोमनाथ कसबे हे नियमित गस्त घालत असताना त्यांना एक बेवारस बॅग आढळून आली. सदर बॅगची तपासणी केली असता त्यामध्ये OPPO कंपनीचा मोबाईल फोन व रोख रक्कम 11 हजार 750 रुपये असल्याचे निदर्शनास आले.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


श्री. कसबे यांनी कोणताही मोह न बाळगता सदर बॅग तत्काळ संरक्षण कार्यालयात जमा केली. त्यानंतर संरक्षण विभागाने चौकशी करून बॅगधारक साईभक्त अमरजीत कुमार भारती (रा. झारखंड) यांचा शोध घेतला. खात्री करून मोबाईल फोन व रोख रक्कम त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. हरवलेले साहित्य परत मिळाल्याने साईभक्तांनी संस्थान प्रशासन व सुरक्षा कर्मचाऱ्यांचे आभार मानले.


याच दिवशी आणखी एक प्रामाणिकपणाची घटना घडली. साईबाबा समाधी मंदिराच्या गाभाऱ्यात सुरक्षा कर्मचारी श्री. जालिंदर बोर्डे यांना 4 हजार 200 रुपये रोख रक्कम सापडली. त्यांनीही तत्काळ ती रक्कम कार्यालयात जमा करून आपले कर्तव्यनिष्ठ व प्रामाणिक वर्तन दाखवून दिले.
साईनगरीत दररोज लाखो भाविक ये-जा करत असताना सुरक्षा विभागातील कर्मचाऱ्यांकडून दाखविण्यात आलेला हा प्रामाणिकपणा भाविकांच्या विश्वासाला अधिक बळ देणारा ठरला आहे. सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या या कर्तव्यदक्षतेचे आणि प्रामाणिकपणाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button