Letest News
समता पतसंस्थेच्या बोगस खात्याप्रकरणी आरोपी अशोक खरात न्यायालयीन कोठडीत भाविकांच्या कथित आर्थिक फसवणुकीच्या तक्रारीनंतर दुकान सील मात्र गुन्हा दाखल न झाल्याने संताप शिर्डी पोलिसांची दमदार कामगिरी!मंदिर परिसरातून बेपत्ता झालेली १२ वर्षीय चिमुरडी काही तासांत सुखरूप आ... शिर्डीत हॉटेल व्यावसायिकाला मारहाण तक्रार दिल्याचा राग मनात धरून जीवे मारण्याची धमकी पालकमंत्र्यांच्या बैठकीकडे भाजप पदाधिकाऱ्यांची पाठ; विखे यांना कर्जतमध्येच धक्का? शिर्डीतील 'झिंग्या'वर एमपीडीएचा बुलडोझर- खून-अपहरण-मारहाण करणाऱ्या सराईत गुन्हेगाराची थेट नाशिक कारा... लेंडीबागेत नव्हे तर आरक्षित जागेवर उभारा भव्य श्रीराम-श्रीकृष्ण मंदिर! शिर्डी ग्रामस्थांचे साई संस्थ... शिर्डीत हॉटेल व्यावसायिकाला मारहाण तक्रार दिल्याचा राग मनात धरून जीवे मारण्याची धमकी शिर्डी गुटखा प्रकरण दाबण्याचा प्रयत्न? थेट लोकायुक्त- एसीबी आणि आयुक्तांकडे धडक-एफडीए अधिकाऱ्यांच्या... शिर्डीचा विकास थांबवणारे नेमके कोण? — ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र बनकर यांचा परखड सवाल
क्राईमशिर्डी

शिर्डी हत्याकांड प्रकरणी डॉ.राजेंद्र पिपाडा यांच्याकडुन मृतांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट!

शिर्डी (प्रतिनिधी) वेगवेगळे ड्रग्स तसेच व्यसनाधीनतेचे साहित्य पुरवुन तरुणांची व्यसनाधीन पिढी बनविण्याचे व गुन्हेगार बनविण्याचे काम चालु असुन त्यामुळे हे व्यसनाचे साहीत्य पुरविणारे व विकणारे यांच्यावर कारवाई व्हावी .यासाठी आपण मुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेणार आहोत अशी भावना डॉ.राजेंद्र पिपाडा यांनी व्यक्त केली. यावेळी दिलीपराव वाघमारे,निखील पिपाडा आदी उपस्थित होते.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


शिर्डी येथे संस्थानच्या कामगारांचे खुन झाले या प्रसंगी डॉ.राजेंद्र पिपाडा यांनी संस्थान कामगारांच्या कुटुंबियांची भेट घेवुन सांत्वन केले व याप्रकरणाचा पाठपुरावा करुन आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. शिर्डी सध्या व्यसन करुन गुन्हेगारी कऱण्याचे प्रमाण वाढले असुन असे प्रकार रोखण्याची गरज आहे. या गुन्हेगारी मुळे सामान्य लोकांचे बळी जात आहे. शिर्डीतील कामगारांचे खुन हि घटना अत्यंत संतापजनक आहे. शिर्डीत गुन्हेगारांच्या टोळ्या वाढवल्या आहेत. त्यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.


शिर्डीत येणारे साईभक्तही सुरक्षित नाहीत. चैन स्नॅकींग ,पाकीटमारी या गोष्टीही थांबविणे गरजेचे आहे. आजची घटना अतिषय दुर्दैवी आहे संस्थानमध्ये काम करणा-या कामगारांचे वेळापत्रकही बदलणे गरजेचे असुन रात्री काम करीत असलेल्या कामगारांना सकाळी 7 वाजे पर्यंतची वेळ ठेवुन पुढील शिफ्ट त्यानंतर सुरु केली पाहिजे. यासाठीही आपण लक्ष घालणार आहोत. असे यावेळी डॉक्टर राजेंद्र पिपाडा म्हणाले आहेत.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button