Letest News
सचिन गोंदकर यांच्या अकाली निधनाने शिर्डीत हळहळ डॉ. एकनाथ काका गोंदकर यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर “कुठे ट्रम्प कुठे गल्लीतील फिरणारे तुम्ही?” पिपाडांचा सुजय विखेंवर घणाघात! बेकायदेशीर भंगार दुकानांवर पोलिसांचा दणका! विनापरवाना वाहने तोडणाऱ्या दोन भंगार दुकानदारांवर गुन्हे ... शांत, संयमी पण कायद्याच्या अंमलबजावणीत दबंग अधिकारी रणजीत गलांडे यांचा वाढदिवस साईबाबांची सायंकाळची आरती आता साडेसहा वाजता सूर्यास्ताच्या वेळेनुसार आरतीच्या वेळेत बदल १० सप्टेंबरप... साईबाबांच्या समाधी मंदिरातील दर्शन वेळेत बदल१० सप्टेंबरपासून रात्री ९.३० वाजता दर्शन प्रक्रिया सुरू नुसते फोटो काढून श्रेय घेता येत नाही पत्रव्यवहार दाखवा!” — खासदार निलेश लंके यांचा सुजय विखेंना घणाघ... साईचरणी पुण्याच्या साईभक्ताची अनमोल भेट१२ लाख ८२ हजारांचा आकर्षक सुवर्ण मुकुट अर्पण पंढरपूरच्या विठ्ठल चरणी कमलाकर कोते यांचा वाढदिवस वाढदिवसानिमित्त विठ्ठल-रखुमाईचे दर्शन परिस्थितीला पंक्चर करत साहिलची डॉक्टर होण्याकडे गरुडझेप! वडील पंक्चर काढतात मुलगा आता रुग्णांवर उपचा...
क्राईमशिर्डी

शिर्डीत १५ लाखांचे सोने गायब- वॉटर पार्कमधील घटनेने खळबळ-पोलिसांत अद्याप तक्रार नाही

शिर्डी (प्रतिनिधी) : शिर्डी परिसरातील एका वॉटर पार्कमध्ये छत्रपती संभाजीनगर येथील महिलेचे सुमारे १५ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने गायब झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना काल सायंकाळी घडल्याची माहिती मिळत असून, यामुळे वॉटर पार्क परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला आपल्या कुटुंबासह वॉटर पार्कमध्ये फिरण्यासाठी आली होती. यावेळी तिच्याकडे असलेले अंदाजे १५ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हरवल्याचे तिच्या निदर्शनास आले. दागिने सापडावेत यासाठी महिलेने वॉटर पार्क प्रशासनाच्या मदतीने परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. मात्र, फुटेज तपासूनही दागिन्यांचा कोणताही ठावठिकाणा लागलेला नाही.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


घटनेनंतर महिलेने स्वतःच्या स्तरावर शोधाशोध सुरू ठेवली असून, अद्याप या प्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात कोणतीही अधिकृत तक्रार दाखल झालेली नाही. त्यामुळे नेमके दागिने चोरीला गेले की कुठेतरी हरवले, याबाबत अद्याप स्पष्टता झालेली नाही.
दरम्यान, एवढ्या मोठ्या रकमेचे सोन्याचे दागिने गायब झाल्याची चर्चा परिसरात सुरू असून, संबंधित महिलेने पोलिसांकडे तक्रार दिल्यास पुढील तपासातून वस्तुस्थिती समोर येण्याची शक्यता आहे. पोलिसांत तक्रार दाखल झाल्यानंतरच या प्रकरणाचे नेमके स्वरूप स्पष्ट होणार आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button