Letest News
शिर्डीत दिवसाढवळ्या धर्मशाळेची भिंत जमीनदोस्त शिवसेना पदाधिकाऱ्यासह ५ जणांवर गुन्हा संघटित गुन्हेगारीचे कलम १११ लागू आरोपींवर 'मोक्का'सारखी कठोर कारवाई AI चा गैरवापर की राजकीय कट? पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या नावाने मॉर्फ ऑडिओ-व्हिडिओ प्रकरण-संगम... शरीरात घुसला चक्क बॉलपेन- श्री साईनाथ रुग्णालयात दुर्मिळ व जीवघेण्या शस्त्रक्रियेला यश शिर्डीतील महिला हत्येनंतर माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांची काव्यात्मक टीका-सोशल मीडियावर चर्चेला उध... शिर्डीच्या भूमिपुत्री डॉ. सिमरन साई कोतकर यांची वारकऱ्यांसाठी निस्वार्थ सेवा-सर्वत्र कौतुकाचा वर्षाव शिर्डी पोलिसांचा गुटखा माफियांवर धडक प्रहार! दोन ठिकाणी एकाच वेळी छापे दोघे ताब्यात हजारो रुपयांचा ग... साई समाधीवरील चित्रीकरण प्रकरण पेटले- सखोल चौकशीसह फोटो एडिट करून विकणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची ... महिलेचा खळबळजनक आरोप-बलात्कार-पिस्तुलाचा धाक जीवे मारण्याच्या धमक्या शिर्डी पोलिसांत मध्यरात्री FIR जर्मनीतील ४१ साईभक्तांची शिर्डीत भक्तीमय साईसेवा समाधी मंदिरात गुंजले साईभजन
क्राईमशिर्डी

शिर्डीत १५ लाखांचे सोने गायब- वॉटर पार्कमधील घटनेने खळबळ-पोलिसांत अद्याप तक्रार नाही

शिर्डी (प्रतिनिधी) : शिर्डी परिसरातील एका वॉटर पार्कमध्ये छत्रपती संभाजीनगर येथील महिलेचे सुमारे १५ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने गायब झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना काल सायंकाळी घडल्याची माहिती मिळत असून, यामुळे वॉटर पार्क परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला आपल्या कुटुंबासह वॉटर पार्कमध्ये फिरण्यासाठी आली होती. यावेळी तिच्याकडे असलेले अंदाजे १५ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हरवल्याचे तिच्या निदर्शनास आले. दागिने सापडावेत यासाठी महिलेने वॉटर पार्क प्रशासनाच्या मदतीने परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. मात्र, फुटेज तपासूनही दागिन्यांचा कोणताही ठावठिकाणा लागलेला नाही.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


घटनेनंतर महिलेने स्वतःच्या स्तरावर शोधाशोध सुरू ठेवली असून, अद्याप या प्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात कोणतीही अधिकृत तक्रार दाखल झालेली नाही. त्यामुळे नेमके दागिने चोरीला गेले की कुठेतरी हरवले, याबाबत अद्याप स्पष्टता झालेली नाही.
दरम्यान, एवढ्या मोठ्या रकमेचे सोन्याचे दागिने गायब झाल्याची चर्चा परिसरात सुरू असून, संबंधित महिलेने पोलिसांकडे तक्रार दिल्यास पुढील तपासातून वस्तुस्थिती समोर येण्याची शक्यता आहे. पोलिसांत तक्रार दाखल झाल्यानंतरच या प्रकरणाचे नेमके स्वरूप स्पष्ट होणार आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button