Letest News
शिर्डीत मजुरांच्या खोलीत घरफोडी चार मोबाईलसह ₹65 हजारांचा ऐवज लंपास शिर्डीत रिक्षातून वृद्ध शेतकऱ्याची लूट- सराईत शंकर चौधरी ऊर्फ रहीम पठाण जेरबंद डॉ. मीरा ढास यांनी स्वीकारला शिर्डी येथील माहिती अधिकारी पदाचा कार्यभार मोहरा अटकेत… पण सूत्रधारापर्यंत तपास कधी?व्यवस्थापकाला बेड्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्... साईचरणी प्रामाणिकतेचा आदर्श! गाभाऱ्यात सापडलेले ३४९० भाविक महिलेला सुखरूप परत दिवसाढवळ्या घरफोडी कुलूप तोडून घरातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला कोपरगावात स्थानिक गुन्हे शाखेचे धडक सत्रपाच ठिकाणी छापे ११ आरोपींवर ५ गुन्हे २.१४ लाखांचा मुद्देमाल ... विजयराव कोते पाटील यांचा सेवासंकल्प साईबाबांच्या पालखीसह अखेरची ऐतिहासिक तीर्थयात्रा सेवेतून साईभक्तीचा साक्षात्कार तीन दिवस १० हजार भाविकांना महाप्रसादअन्नदान हीच खरी साईसेवा-अय्यर परि... समता पतसंस्था प्रकरण : व्यवस्थापक मिलिंद बनकर व अध्यक्ष काका कोयटे यांना अटक करण्याची मागणी
राजकीयशिर्डी

शिर्डीतील लक्ष्मीनगर अतिक्रमण हटविण्यास सुरुवात नागरिकांकडून स्वयंस्फूर्तीने सहकार्य

शिर्डी | प्रतिनिधी
Shirdi Sai Baba Temple परिसरातील लक्ष्मीनगर भागात अतिक्रमण हटविण्याची प्रक्रिया वेगाने सुरू झाली असून येथील नागरिक स्वतःहून आपली घरे, दुकाने आणि शेड काढून घेऊ लागले आहेत. Shirdi Nagar Parishad प्रशासनाने १० मार्चपर्यंतचा अंतिम अल्टिमेटम दिल्यानंतर संभाव्य नुकसान टाळण्यासाठी रहिवासी प्रशासनाला सहकार्य करत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


लक्ष्मीनगर परिसरातील अतिक्रमणाचा मुद्दा गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत होता. मात्र, नगरपरिषदेच्या निवडणुकीनंतर प्रशासनाने या प्रश्नावर ठोस भूमिका घेत कारवाईची तयारी सुरू केली. प्रशासनाची भूमिका स्पष्ट झाल्यानंतर संभाव्य कारवाईपूर्वीच अनेक रहिवाशांनी आपली बांधकामे हटवण्यास प्राधान्य दिले आहे.

अतिक्रमण काढताना नागरिक स्वतःच पत्रे, दरवाजे, खिडक्या तसेच इतर बांधकाम साहित्य ट्रॅक्टरमधून हलवताना दिसत आहेत. या प्रक्रियेसाठी नगरपरिषदेच्या वतीने साहित्य वाहून नेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वाहनेही उपलब्ध करून देण्यात आली आहेत. भर उन्हातही नागरिक आपले साहित्य सुरक्षित ठिकाणी हलवताना दिसत आहेत.
राहाता तालुक्यातील शिर्डी, सावळीविहीर खुर्द, सावळीविहीर बुद्रुक आणि निमगाव कोहाळे या गावांमधील बहुतांश अतिक्रमणे यापूर्वीच हटविण्यात आली आहेत.


काही ठिकाणी विस्थापित अतिक्रमणधारकांना अर्धा गुंठा जागा देण्यात आली असून उर्वरित प्रकरणांमध्ये प्रशासकीय प्रक्रिया सुरू आहे. भविष्यात शासनाच्या योजनांद्वारे हक्काची जागा आणि निवारा मिळेल, या विश्वासामुळे नागरिक प्रशासनाला सहकार्य करत स्वतःहून अतिक्रमण हटवताना दिसत आहेत.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button