Letest News
समता पतसंस्था प्रकरण : व्यवस्थापक मिलिंद बनकर व अध्यक्ष काका कोयटे यांना अटक करण्याची मागणी शिर्डीत दिव्यांग स्वाभिमानाचा ऐतिहासिक विजय! आ. बच्चू कडूंचे दिव्यांगांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी मो... गुरुपौर्णिमा उत्सवात साईभक्तांची श्रद्धेची उधळण!श्री साईबाबा संस्थानला अवघ्या तीन दिवसांत ७.८१ कोटीं... शिर्डीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त अनोखा उपक्रम: साई आश्रया अनाथालयातील मुलांना शैक्षणिक सा... गुरुपौर्णिमेत 'गावकरी गेट'वर संशयास्पद प्रवेशाचा खेळ? साईभक्त रांगेत… मग काहींना थेट प्रवेश कसा? धाडीनंतरही कायम अनुत्तरित प्रश्न साकुरी क्लबप्रकरणी 'मास्टरमाइंड' कोणाला वाचवले जात आहे? बोगस खात्यांच्या घोटाळ्यात मोठी कारवाई- आरोपी अशोक खरात शिर्डी पोलिसांच्या ताब्यात! गुरुपौर्णिमेत मोठा दरोडा उधळला! शिर्डी रेल्वे स्टेशनजवळ दरोड्याच्या तयारीत असलेले ७ आरोपी शस्त्रांसह... गुरुपौर्णिमेच्या मुख्य दिवशी शिर्डीत भक्तीचा महासागर-लाखो साईभक्तांनी घेतले समाधीचे दर्शन अढळ श्रद्धेचा सुवर्णमुकुट! आंध्रच्या साईभक्ताकडून श्री साईबाबांच्या चरणी ८२.३९ लाखांचा सुवर्ण मुकुट ...
अ.नगरक्राईम

माजी खासदार विखेंवर अॅड. सुरेश लगड यांचा घणाघाती हल्ला “चांगल्याला चांगले म्हणण्याची दानत ठेवा”

अहिल्यानगर | प्रतिनिधी
दूध भेसळीविरोधात राज्यभर धडक कारवाई करून भेसळखोरांचे धाबे दणाणून सोडणारे अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कार्यपद्धतीवर टीका करणाऱ्या माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्यावर ज्येष्ठ विधीज्ञ अॅड. सुरेश लगड यांनी जोरदार पलटवार केला आहे. “संपूर्ण महाराष्ट्रात भेसळखोरांना वठणीवर आणण्याचे काम करणाऱ्या प्रामाणिक अधिकाऱ्याच्या कामात खो घालण्याचे काम कोणत्याही राजकीय नेत्याने करू नये. अशा वक्तव्यांमुळे भेसळखोरांचेच मनोबल वाढते,” असा इशारा त्यांनी दिला.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


अॅड. लगड म्हणाले की, तुकाराम मुंढे यांच्या कारवाईमुळे सामान्य ग्राहकांना सुरक्षित अन्न मिळावे, हा उद्देश आहे. त्यामुळे त्यांच्या कामावर शंका घेण्याऐवजी अशा अधिकाऱ्यांच्या पाठीशी उभे राहणे ही लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहे.
विखे यांनी “पूर्वीच्या अधिकाऱ्यांनीही काम केले, मग मुंढे यांनाच एवढी प्रसिद्धी का?” असा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर अॅड. लगड यांनी प्रत्युत्तर देताना म्हटले की, “यापूर्वीच्या अधिकाऱ्यांनीही अशाच धाडसी पद्धतीने कारवाई केली असती तर त्यांनाही जनतेने डोक्यावर घेतले असते. प्रसिद्धी ही पदामुळे नाही, तर कामामुळे मिळते. चांगले काम करणाऱ्याला शाबासकीची थाप देण्याची दानत ठेवली पाहिजे.”


त्यांनी पुढे आव्हान देत विचारले, “तुकाराम मुंढे यांनी कोणत्या अधिकाऱ्यावर दबाव टाकून खोटे पंचनामे करण्यास सांगितले? असा ठोस पुरावा असेल तर त्याचा सविस्तर खुलासा करावा आणि मुख्यमंत्री यांच्याकडे अधिकृत तक्रार दाखल करावी. केवळ आरोप करून कार्यक्षम अधिकाऱ्याची प्रतिमा मलीन करणे योग्य नाही.”
अॅड. लगड यांनी विखे कुटुंबाच्या राजकीय जबाबदारीची आठवण करून देत म्हटले की, “आपण माजी खासदार आहात. आपले वडील राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्यामुळे प्रत्येक विधान हे जबाबदारीने आणि विचारपूर्वक केले पाहिजे.”


शेवटी त्यांनी सुचविले की, “दूध भेसळखोरांची बाजू घेण्यापेक्षा दूध उत्पादक शेतकऱ्यांना अधिक दर कसा मिळेल, त्यांच्या अडचणी कशा दूर होतील यासाठी प्रयत्न करा. त्यातून लाखो शेतकऱ्यांचे भले होईल आणि तेच आपल्यासाठी खरे लोकहिताचे काम ठरेल.”

“भेसळखोरांवर कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांचे मनोबल खच्ची करू नका. चांगले काम करणाऱ्याचे कौतुक करा; भेसळखोरांना अप्रत्यक्ष पाठबळ देणारी वक्तव्ये टाळा. लोकप्रतिनिधींनी जनहिताला प्राधान्य द्यावे.”
— अॅड. सुरेश लगड, ज्येष्ठ विधीज्ञ

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button