Letest News
श्री साई निर्माण शैक्षणिक संकुलातील विद्यार्थ्यांनी अनोख्या उपक्रमातून साजरी केली ' रक्षाबंधन ' भाजपाचे माजी जिल्हा पदाधिकारी बंडू शिंदे यांच्यावर पुन्हा एकदा महिला विनयभंगाचा गंभीर गुन्हा दाखल मुख्यमंत्री सहाय्यता निधी अनेक रुग्णांसाठी ठरला आशेचा किरण ! लाभार्थी रुग्णांनी व्यक्त केल्या कृतज्ञ... नागपूर–पुणे वंदे भारत एक्सप्रेसचे अहिल्यानगर येथे उत्साहात स्वागत ! रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल येथे कै पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील यांची 125 जयंती व शे... शिर्डीचे पोलीस उपविभागीय अधिकारी शिरीष वमने यांची बदली त्याच्या जागी अमोल भारती यांची वर्णी साईसेवेच्या कार्यात उल्लेखनीय योगदान करणाऱ्या साईभक्त रघु सुंदरम यांचा श्री साईबाबा संस्थानच्या वतीन... शिर्डी दुहेरी हत्याकांडातील आरोपींविरुध्द मकोका कायदयान्वये कारवाई नगर मनमाड रोडवरील हॉटेल मध्ये खंडणीसाठी गुंड्यांचा हैदोस  शिर्डीचे ग्राम महसूल अधिकारी सतीश गायके यांची गच्ची धरून धक्काबुकी करीत चोरीचा मुरुमाचा डंफ़र तस्करा...
अ.नगरराजकीय

आम्ही घरात घुसून मारु’, मोदींकडून वायुसेनेच्या वाघांचं कौतुक

नरेंद्र मोदी यांनी आज आदमपूर एअरबेसवर जावून भारतीय जवानांची भेट घेतली.नरेंद्र मोदी यांनी यावेळी भारतीय जवानांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी तीनही सैन्य दलांचं कौतुक केलं. विशेष म्हणजे नरेंद्र मोदी यांनी दहशतवाद्यांना खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानला आम्ही घरात घुसून मारु, असा इशारा दिला.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

पाकिस्तानकडून आदमपूर एअरबेसवर हल्ला करुन एअरबेस उद्ध्वस्त केल्याचा दावा केला जात होता. पण याच एअरबेसवर जावून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानवर सडकून टीका केली. यावेळी त्यांनी जवानांचं कौतुक केलं.

“तुमच्या पराक्रमामुळे आज ऑपरेशन सिंदूरची गुँज प्रत्येक कानाकोपऱ्यात ऐकू जात आहे. या प्रत्येक ऑपरेशन दरम्यान प्रत्येक भारतीय आपल्यासोबत उभा राहिला. प्रत्येक भारतीयाची प्रार्थना आपल्या सगळ्यांसोबत राहिली आहे. आज प्रत्येक देशवासी आपल्या सैनिक आणि त्यांच्या परिवारांप्रती कृतज्ञ आहे.

त्यांचा ऋणी आहे”, अशी भावना मोदींनी व्यक्त केली.नरेंद्र मोदी यांनी यावेळी भारत-पाकिस्तान तणावावेळी भारतीय वायुसेनेच्या जवानांच्या मानसिक अवस्थेबाबतही भाष्य केलं. पाकिस्तानने भारतावर हवाई हल्ला केल्यानंतर भारतीय वायुसेनेचे पायलट पाकिस्तानच्या हवाई हद्दीत शिरले.

त्यावेळी पाकिस्तानने आपले हवाई क्षेत्र बंद केलं नव्हतं. पाकिस्तानची नागरी विमान वाहतूक सुरु होती. भारतीय हवाईदलाच्या जवानांनी पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देताना पाकिस्तानच्या नागरी विमानांना लक्ष्य केलं नाही. जेव्हा पाकिस्तानचे नागरी विमान समोर होते तेव्हा भारताच्या वायुसेनेच्या पायलट्सची मानसिक अवस्था काय असेल, याबाबत मोदींनी आपल्या भाषणात भाष्य केलं.

“तुमचा स्पीड आणि कामाची पद्धत अशा स्तरावरची होती की शत्रू गोंधळून गेला. त्याला समजलं देखील नाही की त्याचं कसं नुकसान झालं. आमचं लक्ष्य पाकिस्तानमधील दहशतवाद्यांना संपवणं होतं. पण पाकिस्तानने आपल्या प्रवाशी विमानांना समोर ठेवून जे षडयंत्र रचलं, मी कल्पना करु शकतो की, तो क्षण किती कठीण असेल जेव्हा नागरी विमान दिसतायत. मला गर्व आहे की, तुम्ही खूप सावधगिरीने नागरी विमानाला नुकसान न पोहोचवता कमाल करुन दाखवली. त्याचं प्रत्युत्तर तुम्ही दिलं.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button