Letest News
शिर्डीत 'चिल्लर गँग'चा धुमाकूळ! भाविकांचे मोबाईल-रोकड- पिशव्या लंपास-मध्यरात्री साईनगरीत अल्पवयीन टो... मुसळधार पावसाचा रेड अलर्ट-नदीकाठच्या गावांनी तातडीने सतर्क राहावे! शिर्डीच्या ६ गुन्हेगारांसह ६८ सराईत आरोपी तडीपार श्रीरामपूर विभागाची गुन्हेगारीवर मोठी कारवाई अ‍ॅक्शन मोडमध्ये पोलीस अधीक्षक! गुन्हेगारीला लगाम घालण्यासाठी 220 सराईत आरोपींचे विशेष समुपदेशन एसएस हॉटेल मधील बलात्कार व फसवणूक प्रकरणात जगताप यांची शिर्डी पोलीस ठाण्यात चौकशी समता पतसंस्थेच्या कथित बनावट खातेप्रकरणी एसआयटीचा तपास वेगात? अशोक खरातच्या ताब्याची चर्चा-अनेकांमध्... श्रीरामपूरच्या गुन्हेगारी विश्वाला मोठा हादरा! १६ गंभीर गुन्ह्यांतील 'सोन्या बेग' अखेर जेरबंद प्रेमाच्या जाळ्यात पाच वर्षे अडकवून लाखोंची फसवणूक? लग्नाचे आमिष-शारीरिक संबंध आणि 13 लाखांसह 3 तोळे... कोपरगावच्या दुय्यम कारागृहाला अखेर टाळे-२० कैद्यांची कडेकोट बंदोबस्तात नाशिकला रवानगी शिक्षणातील आर्थिक साक्षरता' : योग्य माहिती असेल तर पैशांची अडचण ठरत नाहीशिक्षण महाग नाही… योग्य नियो...
अ.नगरशिर्डी

शिर्डीसह राज्यात गुरुवारी रात्री बाराच्या दरम्यान चांगला पाऊस!

शिर्डी (प्रतिनिधी)
शिर्डी व परिसरात गुरुवारी उशिरा रात्री बाराच्या दरम्यान ठिकठिकाणी पाऊस पडला. गेली दोन दिवस ढगाळ वातावरण होते .त्यामुळे थंडी गायब होऊन दमट वातावरण तयार झाले होते. गुरुवारी रात्री उशिरा बारा एकच्या दरम्यान सावळीविहीर परिसरात चांगला पाऊस सुरू झाला. त्यामुळे दिवसभर दमट वातावरण काहीसे हलकेसे झाले.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


गेले दोन दिवसा पूर्वी कडाक्याची थंडी पडली होती .मात्र अचानक ढगाळ वातावरण निर्माण झाले. हवामान खात्यानेही ढगाळ वातावरण व तुरळक पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र गुरुवारी रात्री सावळीविहीर परिसरात पाऊस पडला. पावसामुळे काहीसे हलके वातावरण झाले असले तरी हिवाळात पावसाळ्यासारखे वातावरण निर्माण झालेचे दिसून येत होते.

ढगाळ वातावरणामुळे पिकांवरही अनेक रोग पडतात. त्यामुळे शेतकरीही काळजीत पडले आहे. कधी थंडी तर कधी दमट असे वातावरण निर्माण झाल्याने लहान मुले , वृद्धही आजारी पडत आहेत.नगरच्या काही भागांमध्ये गेल्या पाच ते सहा दिवसांपासून ढगाळ वातावरण होते आणि वातावरणातही थंडी गायब होऊन उष्णता वाढली होती. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार आज पावसाने हजेरी लावली आहे.

पुढील 24 तासांचा अंदाज घ्यायचा झाल्यास राज्याच्या सांगली, सातारा आणि कोल्हापूर या पश्चिम क्षेत्राला वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. इथं पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगडमध्येही पावसाच्या हलक्या सरींची हजेरी पाहायला मिळेल असं हवामान विभागानं स्पष्ट केलं आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button