Letest News
“साईंच्या नावावर ऑनलाईन दरोडा! बनावट वेबसाईटने भाविकांची फसवणूक” “साईचरणी ९२ लाखांचा सुवर्ण मुकुट… भक्तीसमोर सोन्यालाही तेज!” “वरून सर्व सेटिंग झाली का?” — शिर्डीतून अंजली दमानियांचा सरकारला थेट सवाल साई चरणी ३५०७ किलो सेंद्रिय केशर आंब्याचे अर्पण भाविकांना तीन दिवस आमरसाची मेजवानी २.१० लाखांची सोन्याची बांगडी सापडली-महिला सुरक्षा कर्मचाऱ्याने दाखवली प्रामाणिकता शिर्डीत मोकाट कुत्र्यांचा हैदोस-संस्थान कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला-हरिभाऊ कोते यांचा इशारा ठरला खरा? शिर्डीच्या दोन दमदार व्यक्तिमत्त्वांचा गौरव-विठ्ठलराव पवार आणि दिलीप खरात सन्मानित शिर्डीत मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर-गरजू रुग्णांसाठी मोठा दिलासा अहिल्यानगर पोलीस मुख्यालयात स्मोक हँड ग्रेनेडचा स्फोट-चार प्रशिक्षणार्थी पोलीस जखमी समता पतसंस्थेच्या “मॅनेजरच्या सांगण्यावरूनच पैसे टाकले” भोंदू खरातची न्यायालयात धक्कादायक कबुली
अ.नगरक्राईम

“वरून सर्व सेटिंग झाली का?” — शिर्डीतून अंजली दमानियांचा सरकारला थेट सवाल

खरात प्रकरण गाडण्याचा डाव?” — शिर्डीतून अंजली दमानियांचा सत्तेला थेट इशारा, SIT बरखास्तीच्या आरोपाने महाराष्ट्र हादरला
महाराष्ट्रभर प्रचंड खळबळ उडवून देणाऱ्या अशोक खरात प्रकरणाने पुन्हा एकदा राजकीय स्फोट घडवला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेत असलेल्या या प्रकरणावर आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अत्यंत गंभीर आणि धक्कादायक आरोप करत राज्य सरकार, तपास यंत्रणा आणि काही बड्या राजकीय नेत्यांवर थेट निशाणा साधला आहे.
साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डी येथे आलेल्या दमानिया यांनी माध्यमांसमोर बोलताना असा दावा केला की, या प्रकरणाच्या तपासासाठी नेमण्यात आलेली विशेष तपास समिती अर्थात SITच आता बरखास्त करण्यात आली आहे. जर हा दावा खरा असेल, तर महाराष्ट्रातील सर्वात गाजलेल्या प्रकरणांपैकी एक असलेले खरात प्रकरण आता मुद्दाम दाबले जात आहे का, असा संतप्त सवाल जनतेतून उपस्थित होऊ लागला आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


“दोन महिने झाले… पण मोठे मासे अजूनही सुरक्षित?”
दमानिया यांनी पत्रकार परिषदेत संतप्त शब्दांत सरकारला धारेवर धरले. “दोन महिने उलटले, पण अजूनही या प्रकरणातील महत्त्वाच्या राजकीय व्यक्तींना चौकशीसाठी का बोलावलं गेलं नाही? SIT अचानक का गुंडाळली जातेय? वरून सर्व सेटिंग झाली आहे का?” असे थेट प्रश्न त्यांनी उपस्थित केले.
त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, तपासावर प्रभाव टाकला जात असल्याच्या चर्चांना पुन्हा खतपाणी मिळाले आहे. सामान्य आरोपींवर झटपट कारवाई करणारी यंत्रणा या प्रकरणात मात्र शांत का आहे, असा सवाल आता नागरिक विचारू लागले आहेत.


“रुपाली चाकणकरांना वाचवण्यासाठी दबाव?” — तटकरे यांच्यावर थेट आरोप

या प्रकरणाला आणखी गंभीर वळण देताना दमानिया यांनी थेट नाव घेत आरोप केले. सुनील तटकरे हे रुपाली चाकणकर यांना वाचवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचा गंभीर दावा त्यांनी केला.
“एका बाजूला तपास सुरू असल्याचे दाखवले जाते, पण दुसऱ्या बाजूला प्रभावशाली लोकांना क्लीन चिट देण्याचा प्रयत्न सुरू आहे,” असा आरोप करत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला. या आरोपांनंतर राज्याच्या राजकीय गलियार्‍यात एकच खळबळ उडाली आहे.


“खरातला जेलमध्ये काही झालं तर?” — दमानियांच्या विधानाने राज्य हादरलं
दमानिया यांनी सर्वात मोठा आणि धक्कादायक सवाल उपस्थित करत म्हटलं की, “उद्या जेलमध्ये असलेल्या खरातचे काही बरे-वाईट झाले, तर हा विषय कायमचा संपवण्यासाठीच हा संपूर्ण खटाटोप सुरू आहे का?”
त्यांच्या या वक्तव्यामुळे प्रकरणाने अत्यंत गंभीर स्वरूप धारण केले आहे. सोशल मीडियावरही या विधानाची जोरदार चर्चा सुरू झाली असून, खरात प्रकरणाचा तपास निष्पक्ष होणार का, की हा विषय राजकीय दबावाखाली गाडला जाणार, अशी भीती व्यक्त केली जात आहे.


शिर्डीत साईदर्शन, संस्थानकडून सन्मान… आणि बाहेर पडताच राजकीय बॉम्ब
दरम्यान, श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट कडून अंजली दमानिया यांचा सन्मान करण्यात आला. साईबाबांचे दर्शन घेतल्यानंतर मंदिर परिसरात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत थेट सरकारलाच लक्ष्य केले.
“जर सरकार खरंच पारदर्शक असेल, तर SIT का हटवली? चौकशी अहवाल कुठे आहे? मोठ्या लोकांची नावे बाहेर येऊ नयेत म्हणूनच का हा सगळा खेळ सुरू आहे?” असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला.


महाराष्ट्रात पुन्हा पेटणार खरात प्रकरण?
दमानियांच्या आरोपांनंतर आता खरात प्रकरण पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आले आहे. SIT बरखास्तीच्या आरोपामुळे सरकार अडचणीत येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

खरंच तपासावर पडदा टाकला जातोय का? प्रभावशाली लोकांना वाचवण्यासाठी यंत्रणा वापरल्या जातायत का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे — अशोक खरात प्रकरणातील सत्य कधी बाहेर येणार?
महाराष्ट्रातील जनतेच्या मनात आता हाच प्रश्न धगधगत आहे… “खरात प्रकरणाचा तपास होणार, की सत्य कायमचं गाडलं जाणार?”

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button