Letest News
शिर्डीत मजुरांच्या खोलीत घरफोडी चार मोबाईलसह ₹65 हजारांचा ऐवज लंपास शिर्डीत रिक्षातून वृद्ध शेतकऱ्याची लूट- सराईत शंकर चौधरी ऊर्फ रहीम पठाण जेरबंद डॉ. मीरा ढास यांनी स्वीकारला शिर्डी येथील माहिती अधिकारी पदाचा कार्यभार मोहरा अटकेत… पण सूत्रधारापर्यंत तपास कधी?व्यवस्थापकाला बेड्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्... साईचरणी प्रामाणिकतेचा आदर्श! गाभाऱ्यात सापडलेले ३४९० भाविक महिलेला सुखरूप परत दिवसाढवळ्या घरफोडी कुलूप तोडून घरातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला कोपरगावात स्थानिक गुन्हे शाखेचे धडक सत्रपाच ठिकाणी छापे ११ आरोपींवर ५ गुन्हे २.१४ लाखांचा मुद्देमाल ... विजयराव कोते पाटील यांचा सेवासंकल्प साईबाबांच्या पालखीसह अखेरची ऐतिहासिक तीर्थयात्रा सेवेतून साईभक्तीचा साक्षात्कार तीन दिवस १० हजार भाविकांना महाप्रसादअन्नदान हीच खरी साईसेवा-अय्यर परि... समता पतसंस्था प्रकरण : व्यवस्थापक मिलिंद बनकर व अध्यक्ष काका कोयटे यांना अटक करण्याची मागणी
क्राईमशिर्डी

नऊ नाण्यांचा गोंधळ की श्रद्धेचा घोटाळा?” “९ चे ९९! साईंच्या नावावर डुप्लिकेट नाण्यांचा बाजार?”

साईबाबा यांनी आपल्या अखेरच्या क्षणी परमभक्त लक्ष्मीबाई शिंदे यांना दिलेली ९ नाणी ही ‘नवविधा भक्ती’चे पवित्र प्रतीक मानली जातात. पण आज हाच पवित्र वारसा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. धक्कादायक बाब म्हणजे — मूळ ९ नाण्यांचे आता ९९ पेक्षा अधिक नाण्यांमध्ये रूपांतर झाल्याची चर्चा जोरात असून, श्रद्धेच्या नावाखाली “डुप्लिकेट नाण्यांचा बाजार” सुरू असल्याचा गंभीर आरोप होत आहे.
⚠️ माहिती अधिकारातही गूढ कायम – “खरी नाणी कोणती?” अनुत्तरितच!
श्री साईबाबा संस्थान कडे माहिती अधिकारातून विचारणा करण्यात आली असता, “साईबाबांनी दिलेली मूळ नाणी कोणती?” याबाबत संस्थानही ठोस उत्तर देऊ शकले नाही. म्हणजेच, शतकभर जपला गेलेला पवित्र ठेवा आज अधिकृत नोंदींशिवाय फिरतोय का? हा प्रश्न साईभक्तांच्या मनात संताप निर्माण करत आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


🔥 शिंदे विरुद्ध गायकवाड – ‘नाण्यांवरून दोन दावे, सत्य कुठे?’
एकीकडे शिंदे कुटुंबाकडे मूळ ९ नाणी असल्याचा दावा केला जातो, जी त्यांच्या वाड्यात दर्शनासाठी ठेवली आहेत. तर दुसरीकडे गायकवाड यांच्याकडेही ९ नाणी असल्याचे सांगितले जाते. इतकेच नव्हे, काही नाणी विकली गेल्याच्या चर्चेमुळे हा प्रकार सरळ “आर्थिक व्यवहाराचा खेळ” असल्याचा संशय बळावला आहे.
👉 ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, गायकवाड हे नाणे देश-विदेशात नेऊन “साईबाबांची मूळ नाणी” म्हणून प्रदर्शन भरवतात आणि त्यातून मोठ्या प्रमाणात पैसा गोळा केला जातो.डीएनए टेस्टची मागणी – श्रद्धेवर घाला, भावनांचा उद्रेक!
गायकवाड यांनी “नाणी खरी की खोटी हे तपासण्यासाठी साईबाबांचा डीएनए टेस्ट करावा” असे वादग्रस्त वक्तव्य केल्याने संपूर्ण साईभक्त समाजात संताप उसळला होता. या वक्तव्यामुळे शिर्डीत गुन्हाही दाखल झाला, पण तरीही त्यांच्याकडून नाण्यांचे प्रदर्शन आणि प्रचार सुरूच असल्याचे आरोप आहेत.


🌍 लुधियाना प्रकरण – संस्थानचे गुरु नियम तोडून आरतीत?
दिनांक १४/०४/२०२६ रोजी लुधियाना येथे गायकवाड यांच्या नाण्यांचे प्रदर्शन करण्यात आले. या ठिकाणी श्री साईबाबा संस्थान संबंधित गुरु – अमित देशमुख, दिलीप झा आणि सुदेश कुलकर्णी यांच्या हस्ते आरती पार पडल्याची माहिती समोर आली आहे.
👉 संस्थानच्या नियमांनुसार कार्यरत गुरुंना बाहेर पूजा-अर्चा करण्यास मनाई असताना, हा प्रकार सरळ नियमांचा भंग मानला जात आहे.
👉 त्यामुळे “संस्थानातील काही जण या खेळात सहभागी आहेत का?” असा थेट संशय उपस्थित होऊ लागला आहे.
⚖️ मोठ्या चौकशीची मागणी – ‘दोषींना बडतर्फ करा!’
या संपूर्ण प्रकरणात सत्य बाहेर काढण्यासाठी उच्चस्तरीय चौकशीची जोरदार मागणी होत आहे.


👉 नाण्यांची सत्यता, मालकी हक्क, विक्री व्यवहार आणि प्रदर्शनातून जमा होणारा पैसा – याचा तपास व्हावा
👉 संस्थानच्या नियमांचा भंग करणाऱ्या गुरुंवर तात्काळ कारवाई करून त्यांना सेवेतून बडतर्फ करावे
👉 श्रद्धेच्या नावाखाली चालणारा हा “नाण्यांचा व्यवसाय” थांबवावा
❗ शेवटचा सवाल:
साईबाबांच्या पवित्र नावावर चाललेला हा “नऊ नाण्यांचा खेळ” नेमका भक्ती आहे की मोठा घोटाळा?
शिर्डी, देश आणि जगभरातील साईभक्त आता एकच प्रश्न विचारत आहेत —
👉 “खरी नाणी कोणती… आणि खोटे कोण?”

“संस्थानची बदनामी थांबवा, दोषींवर तात्काळ कारवाई करा!” – शिर्डी ग्रामस्थांची मागणी
शिर्डीतील साईबाबा मंदिराशी संबंधित कुलकर्णी गुरु प्रकरण तसेच अमित देशमुख प्रकरण यामुळे परिसरात तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. या दोन्ही प्रकरणांची सखोल व निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, अशी जोरदार मागणी शिर्डी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
श्री साईबाबा संस्थान च्या कार्यकारी अधिकाऱ्यांनी या प्रकरणात कोणतीही दिरंगाई न करता, दोषी आढळणाऱ्यांवर तात्काळ कठोर कारवाई करावी, अशी भूमिका ग्रामस्थांनी स्पष्ट केली आहे.
👉 “मंदिराच्या पवित्रतेला धक्का पोहोचवणारे प्रकार सहन केले जाणार नाहीत”
👉 “संस्थानच्या नियमांचा भंग करणाऱ्यांना पाठीशी घालू नये”
👉 “साईबाबांच्या नावावर सुरू असलेली बदनामी तात्काळ थांबवावी”
अशी ठाम भूमिका घेत ग्रामस्थांनी प्रशासनाला इशारा दिला आहे.
⚖️ श्रद्धास्थानाची प्रतिमा वाचवण्यासाठी आता कठोर निर्णयांची गरज – अन्यथा आंदोलनाचा इशारा!

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button