Letest News
साईभक्तांच्या चोऱ्या रोखण्यात अपयशी ठरलेल्या कबाडींकडे मंदिर सुरक्षा-‘अपयशाला बक्षीस की भाविकांच्या ... शिर्डीत विनापरवाना आम पापड विक्रीचा सुळसुळाट नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू? तातडीच्या कारवाईची नाग... जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे यांच्या वाढदिवसानिमित्त शिर्डीत महामृत्युंजय राज समता पतसंस्थेतील बनावट खाते प्रकरणाचा तपास आता एसआयटीकडे-आरोपींच्या अडचणी वाढणार अशोक खरात प्रकरणात उज्ज्वल निकमांची एन्ट्री-विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती कामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षिततेसाठी अंतर्गत तक्रार समिती स्थापन करा- जिल्हा महिला व बाल विकास ... अल्पवयीन मुलीच्या विनयभंगप्रकरणाने राहता हादरले संतप्त नागरिकांची पोलीस ठाण्यावर धडक शिर्डीत १५ लाखांचे सोने गायब- वॉटर पार्कमधील घटनेने खळबळ-पोलिसांत अद्याप तक्रार नाही 'लाडू प्रसाद कारखाने सील'च्या कथित खोट्या बातमीवर शिर्डी पोलिसांत फिर्याद दाखल वाचन संस्कार हरवत चालले-मोबाईलच्या आहारी गेलेल्या पिढीबाबत डांगे सरांची खंत
क्राईमशिर्डी

शिर्डीत हरवलेले मोबाईल शोधून देण्यात पोलिसांचे कौतुकास्पद काम

शिर्डी : साईबाबांच्या दर्शनासाठी दररोज हजारो साईभक्त शिर्डीत येत असतात. गर्दी, गडबड किंवा कधी अनावधानाने अनेकांचे मोबाईल हरवण्याच्या घटना घडतात. मोबाईलची किंमत हजारो रुपयांत असली तरी थोड्याशा निष्काळजीपणामुळे भक्तांना मोठा आर्थिक फटका बसतो. मात्र केंद्र सरकारच्या दूरसंचार ‘साथी’ पोर्टलच्या मदतीने आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी पोलिसांनी हरवलेले मोबाईल शोधून देण्याचे कौतुकास्पद काम केले आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


जिल्हा पोलीस प्रमुख सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी पोलीस ठाण्याच्या पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे हरवलेल्या मोबाईलचा माग काढला. भारतातील विविध राज्यांत पोहोचलेल्या मोबाईलचा शोध घेत सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. या प्रयत्नांमुळे गेल्या वर्षभरात १७३ मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना परत मिळवून देण्यात आले, अशी माहिती पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांनी दिली.


यातील एक उदाहरण म्हणजे शिर्डी शहरातील हॉटेल साई गीताचे व्यवस्थापक संतोष गायकवाड यांचा काही दिवसांपूर्वी सुमारे दहा हजार रुपये किमतीचा मोबाईल हरवला होता. शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सागर काळे, पोलीस कर्मचारी संदीप उदावंत तसेच तांत्रिक पथकाने तपास करून हा मोबाईल शोधून काढला आणि तो गायकवाड यांच्याकडे सुपूर्द केला.


मोबाईल परत मिळाल्यानंतर प्रतिक्रिया देताना संतोष गायकवाड म्हणाले, “हरवलेला मोबाईल परत मिळेल अशी अपेक्षा नव्हती. मात्र पोलिसांनी तांत्रिक तपास करून तो शोधून दिला. त्यामुळे पोलीस खात्यावरील माझा विश्वास अधिक दृढ झाला आहे.”
शिर्डी पोलिसांच्या या उपक्रमामुळे हरवलेले मोबाईल परत मिळण्याची शक्यता वाढली असून नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.

नागरिकांनी मोबाईलची काळजी घ्यावी
— पोलीस उपनिरीक्षक सागर काळे

हरवलेले मोबाईल केंद्र सरकारच्या दूरसंचार ‘साथी’ प्रणालीच्या मदतीने तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे शिर्डी पोलिसांनी शोधून काढून संबंधित मालकांना परत दिले आहेत. मात्र अशा घटना टाळण्यासाठी नागरिकांनीही स्वतःच्या मोबाईलची योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे, असे आवाहन शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सागर काळे यांनी केले. गर्दीच्या ठिकाणी मोबाईल सुरक्षित ठेवणे, अनोळखी व्यक्तीकडे देऊ नये तसेच मोबाईल हरवल्यास त्वरित पोलिसांकडे तक्रार नोंदवावी, असेही त्यांनी सांगितले.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button