Letest News
शिर्डीत मजुरांच्या खोलीत घरफोडी चार मोबाईलसह ₹65 हजारांचा ऐवज लंपास शिर्डीत रिक्षातून वृद्ध शेतकऱ्याची लूट- सराईत शंकर चौधरी ऊर्फ रहीम पठाण जेरबंद डॉ. मीरा ढास यांनी स्वीकारला शिर्डी येथील माहिती अधिकारी पदाचा कार्यभार मोहरा अटकेत… पण सूत्रधारापर्यंत तपास कधी?व्यवस्थापकाला बेड्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्... साईचरणी प्रामाणिकतेचा आदर्श! गाभाऱ्यात सापडलेले ३४९० भाविक महिलेला सुखरूप परत दिवसाढवळ्या घरफोडी कुलूप तोडून घरातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला कोपरगावात स्थानिक गुन्हे शाखेचे धडक सत्रपाच ठिकाणी छापे ११ आरोपींवर ५ गुन्हे २.१४ लाखांचा मुद्देमाल ... विजयराव कोते पाटील यांचा सेवासंकल्प साईबाबांच्या पालखीसह अखेरची ऐतिहासिक तीर्थयात्रा सेवेतून साईभक्तीचा साक्षात्कार तीन दिवस १० हजार भाविकांना महाप्रसादअन्नदान हीच खरी साईसेवा-अय्यर परि... समता पतसंस्था प्रकरण : व्यवस्थापक मिलिंद बनकर व अध्यक्ष काका कोयटे यांना अटक करण्याची मागणी
राजकीयशिर्डी

शिर्डीकरांची मागणी — “विखे यांनी आदर्श उमेदवार द्यावेत!”🔸 “अनुभवी आणि लोकाभिमुख व्यक्तींनाच संधी”🔸 “शिक्षण चारित्र्य आणि गुन्हामुक्त पार्श्वभूमी गरजेची”

शिर्डी | आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिर्डीकर मतदारांमध्ये एक ठाम मत आकार घेत आहे — “आता केवळ ओळख नव्हे, तर पात्रता आणि प्रामाणिकपणावर उमेदवारी द्यावी!”

sai nirman
जाहिरात

गेल्या काही दिवसांत शहरातील विविध समाजघटक, व्यावसायिक व नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे की, विखे कुटुंबाने यावेळी सक्षम, सुशिक्षित आणि जनतेशी नाळ जोडलेले उमेदवारच मैदानात उतरवावेत.


🔸 “अनुभवी आणि लोकाभिमुख व्यक्तींनाच संधी”

DN SPORTS

नागरिकांचे मत आहे की, किमान पाच वर्षांचा सामाजिक किंवा सार्वजनिक अनुभव असलेल्यांनाच उमेदवारीची संधी दिली पाहिजे.
शिर्डी नगरपरिषदेसारख्या संवेदनशील व वाढत्या शहरात केवळ नावापुरते नव्हे, तर काम करणारे लोक गरजेचे आहेत, असे स्पष्टपणे सांगितले जात आहे.


🔸 “कुटुंबाचा सामाजिक सहभाग आवश्यक”

निवडणुकीच्या दृष्टीने नागरिकांचा आग्रह आहे की, ज्या घरातील उमेदवार देणार आहे, त्याचे कुटुंबही समाजात मिसळून राहणारे असावे.
लोकांमध्ये विश्वास निर्माण होण्यासाठी उमेदवार आणि त्याचे कुटुंब समाजाच्या प्रत्येक घटकात आदराने राहणारे असावे, ही अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


🔸 “शिक्षण, चारित्र्य आणि गुन्हामुक्त पार्श्वभूमी गरजेची”

शिर्डीकरांनी स्पष्ट सांगितले —
“उमेदवार हा गुन्हा दाखल नसलेला, प्रवृत्तीने प्रामाणिक आणि सुशिक्षित असावा.
किमान शिक्षण असलेला व कुटुंब सुशिक्षित असलेले लोक शहराचा चेहरा बदलू शकतात.”
शिक्षण आणि चारित्र्य हे उमेदवारीचे निकष व्हावेत, अशी मागणी होत आहे.

kamlakar

🔸 “सर्व समाजघटकांना सोबत घेणारे नेतृत्व हवे”

शिर्डी हे विविध जाती-धर्मांच्या लोकांचे एकत्र नांदणारे शहर आहे.
म्हणून नागरिकांच्या अपेक्षा आहेत की, उमेदवार सर्व समाजघटकांना समान वागणूक देणारा, विरोधकांनाही सोबत घेऊन चालणारा आणि वार्डातील तसेच शहरातील सर्व समस्यांची जाण असणारा असावा.


🔹 शिर्डीकरांचा ठाम संदेश

“विखे कुटुंबाने या वेळेस आदर्श, लोकाभिमुख आणि प्रामाणिक उमेदवारच द्यावेत.
शिर्डीला विकासाच्या नव्या वाटेवर नेणारे, सर्वांना जोडणारे नेतृत्व आम्हाला हवे आहे.”

🗣️ जनतेचा स्पष्ट सूर —

“नेतृत्व बदललं तरी कार्यसंस्कृती बदलली पाहिजे!” 🙏

दैनिक साईदर्शनाच्या सर्वे नुसार पुढील नगराध्यक्षा हे शेजवळ कुटुंबियांतूनच होईल परंतु ते शेजवळ कोण?
आपलें काय मत आहे ते अवश्य कळवावे

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button