Letest News
अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय श्रीरामपूर पथकाची धडक कारवाई-गावठी कट्टा विक्रीसाठी दोन इसमांचा पर्दाफा... राहाता शहरात बदलाची गर्जना-घराणेशाही-भ्रष्ट राजकारणाचा पर्दाफाश – नागरिकांचा रोष उफाळला 55 कोटींचा महाघोटाळा —तेच लोक आज राजकारणात मोठ्या खुर्च्या घेण्यासाठी धाव घेतायत.- लोकांना फसवणारे ह... प्रभाग २ क मध्ये ‘सक्षम प्रभाग – विकसित प्रभाग’चा नवा आवाज किटली चिन्हाचे उमेदवार सतीश उर्फ नंदू गों... अहिल्यानगर जिल्ह्यात मोठा बदल : 12 पैकी 4 नगरपरिषद निवडणुका पुढे ढकलल्या — कोर्टातील अपीलचा परिणाम प्रभाग १ ब मध्ये परीवर्तनाची लाट — अॅड. प्रतिक शेळके अग्रस्थानी ‘बॅट’ चिन्हावर मतदारांचा विश्वास — श... तीन दिवस तळीरामांचे ‘दिवे लागले’ — जिल्हाधिकाऱ्यांचा कोरडा दिवस आदेश जाहीर मतदान मतमोजणी आणि मतदानाप... राहाता नगरपरिषद : “जनतेच्या पैशावर डल्ला मारणाऱ्यांना झाडू घेऊन हद्दपार करा!” — रामनाथ सदाफळ (आप) सुनील निवृत्ती पाटील शिंदे यांचा प्रचंड दावा : “प्रभाग २ मध्ये नंदूभाऊंचा विजय ठरलेलाच… विरोधकांची ब... एआय बनावट वन्यप्राणी व्हिडिओवाल्यांना थेट जेल — एसपी सोमनाथ घार्गे यांची कडक सूचना”
अ.नगरशिर्डी

विरोधक हतबल झालेत — निवडणूक आयोगावर मोर्चे म्हणजे अपयशाचं झाकपाक : मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

शिर्डी प्रतिनिधी | साई दर्शन न्यूज

sai nirman
जाहिरात

शिर्डी – राज्यात सध्या सुरु असलेल्या राजकीय घडामोडींवर भाष्य करताना मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे.
“निवडणूक आयोगाविरोधात मोर्चे काढणं म्हणजे विरोधकांच्या हतबलतेचं द्योतक आहे. त्यांना आधीच दिसतंय की आगामी निवडणुकीत त्यांचं अपयश ठरलेलं आहे,” असं त्यांनी ठामपणे सांगितलं.

DN SPORTS

kamlakar

मंत्री भोसले म्हणाले, “महाविकास आघाडीनं कितीही जुळवाजुळव केली तरी जनतेचा त्यांच्यावर विश्वास उरलेला नाही. लोकसभेत त्यांना यश मिळालं, पण विधानसभेत ते साफ अपयशी ठरले. त्यातून अजून ते सावरलेले नाहीत.”

राज ठाकरे यांच्या नमो सेंटरवरील वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना भोसले म्हणाले, “छत्रपतींचा विषय काढल्याशिवाय काही लोकांना निवडणुकीत मुद्देच मिळत नाहीत. नमो सेंटरवर बोलण्याआधी ते काय आहे, त्याचं उद्दिष्ट काय आहे, हे जाणून घ्यावं. विरोध फक्त विरोधासाठी करू नये.”

पूरग्रस्त भागातील स्थितीवर बोलताना त्यांनी सांगितलं, “सरकारनं शेतकऱ्यांना उदारहस्ते मदत केली. त्यामुळे विरोधकांना तो मुद्दा गेला. आता ते भावनिक मुद्द्यांवर लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत.”

महाविकास आघाडीच्या मोर्चाबाबत ते म्हणाले, “आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, पण आरोप करताना तथ्यांवर बोललं पाहिजे. ईव्हीएम आणि मतदार याद्या यावर बिनबुडाचे आरोप करून स्वतःचं अपयश दुसऱ्यावर ढकलण्याचा प्रयत्न विरोधक करत आहेत.”

भोसले यांनी स्पष्ट केलं की, “महायुती सरकार राज्यातील विकास, पूरग्रस्त मदत आणि नागरिकांच्या हिताच्या कामांवर लक्ष केंद्रित करत आहे. जनतेचा विश्वास आमच्यावर आहे.”

शेवटी मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी शिर्डीत साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं आणि श्री साईबाबा संस्थानतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. साईबाबांच्या कृपाशिर्वादाने महाराष्ट्र शांतता, विकास आणि एकतेच्या मार्गावर पुढे जाईल, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.


साईंच्या चरणी नतमस्तक — श्री साईबाबा संस्थानकडून मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा सत्कार 🌸

शिर्डीत आगमनानंतर मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी श्री साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेऊन राज्यातील जनतेसाठी साईबाबांच्या आशीर्वादाची प्रार्थना केली.
दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळ तर्फे त्यांचा शाल, श्रीफळ आणि साईचरित्र पुस्तक देऊन सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.
या वेळी संस्थानचे अधिकारी, विश्वस्त आणि स्थानिक मान्यवर उपस्थित होते.
भोसले यांनी साईबाबांच्या पवित्र भूमीतून राज्यातील शांतता, विकास आणि जनकल्याणासाठी साईबाबांचे आशीर्वाद मागितले.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button