Letest News
भाविक सेवेत SBIची ‘साईसेवा’ ६९ लाखांचे अत्याधुनिक डिश वॉशिंग मशीन देत जपली सामाजिक बांधिलकी! समकालीन साईभक्त लक्ष्मीबाई शिंदे वाड्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी घेतले दर्शन साईसच्चरिताचा जयघोष सवाद्य मिरवणुकीने पारायण सोहळ्याला दिमाखात सुरुवात! मंगलमय वातावरणात श्रीसाईसच्चरित पारायण सोहळ्याचा शुभारंभ काळे रुमाल बांधलेल्या दोन चोरट्यांचा शिर्डीत धुमाकूळ लाखोच्या सोन्याची चैन हिसकावली गोरगरिबांच्या शिध्यावर डल्ला? राहात्यात ५.९० लाखांचा माल ताब्यात शिर्डीत भिक्षेकऱ्यांविरोधात पोलिसांची धडक मोहीम-भल्या पहाटे पोलिसांचा शहरभर धडाका नगर-मनमाड महामार्गाची साडेसाती संपणार कधी? सहा वर्षांत तीन कंत्राटदार बदलले तरी लोकप्रतिनिधींचे मौन ... तोतया पत्रकारांची धाड की खंडणीचा डाव? महिलेकडे मागितले तब्बल एक लाख! ग्रामपंचायत अधिकाऱ्याची १० हजारांची लाच मागणी ५ हजार घेताना ACBच्या जाळ्यात!
अ.नगरक्राईम

शरद पवार यांचा सरपंच पदाच्या स्थगितीचा अर्ज नामंजूर जिल्हाध्यक्ष सुधीर भद्रे

सह्यांचे अधिकार स्वतःकडे ठेवण्यासाठी केविलवाणी धडपड करणारे शरद पवार यांनी सादर केलेली बनावट कागदपत्र फेटाळून अपर विभागीय आयुक्त, नाशिक यांनी चिचोंडी पाटील, ता. जि. अहिल्यानगर येथील सरपंच पदाच्या स्थगितीचा अर्ज नामंजुर केल्याची माहिती माजी पंचायत समिती सदस्य तथा भारतीय जनसंसदचे जिल्हाध्यक्ष श्री. सुधीर भद्रे यांनी दिली आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

चिचोंडी पाटील ता. जि. अहिल्यानगरचे सरपंच शरद खंडू पवार यांनी त्यांच्या बंगल्याच्या पुढे व मागे आणि एस. टी. स्टॅण्ड येथील सार्वजनिक रस्त्यावर अतिक्रमण केल्याचा तक्रार अर्ज सुधीर भद्रे यांनी मा. जिल्हाधिकार अहिल्यानगर यांच्याकडे दाखल केला होता. या अर्जानुसार आणि सत्य परिस्थितीनुसार शरद खंडू पवार यांचे सदस्यासह सरपंच पद रद्द झाले. या आदेशाविरुद्ध शरद पवार यांनी नाशिक येथील विभागीय आयुक्तांकडे अपील दाखल केले.

अपिलामधे शरद पवार यांनी व त्यांचे वकिलांनी असा युक्तीवाद केला की बंगल्याच्या समोर आणि मागे अतिक्रमण कुणी केले हे त्यांना माहीत नाही. शरद पवार त्या बंगल्यात राहत नाही. एसटी स्टँड वरील अतिक्रमण त्यांचे नसून सुधीर भद्रे अथवा दिलीप कोकाटे यांनीच केले असावे असा कांगावा केला. तर दुसऱ्या वेळेस एसटी स्टॅण्डवर चाँद जाफर शेख यांनी अतिक्रमण केले असल्याचे बनावट कागदपत्र दाखल केले.

अपिलाचे सुनावणी वेळी ज्या सरपंचांना स्वतःच्या बंगल्याच्या समोर आणि पाठीमागे अतिक्रमण कुणी केले आहे हे माहिती नसेल तर ते गाव कसे चालवत असतील असा तोंडी युक्तीवाद ज्येष्ठ विधिज्ञ सचिन चांगदेव इथापे यांनी केला. अतिक्रमण सिद्ध झाल्यामुळेच जिल्हाधिकारी, अहिल्यानगर यांनी पद रद्द केल्याची आणि सदर निकाल हा योग्य व निर्दोष असल्याची बाजू मांडली.

स्वतःच्या सरपंच पदाची प्रतिष्ठा वाचविण्यासाठी न्यायालयासमोर अनेक बनावट कागदपत्र सादर करून आणि अनेक कोलांट्या उड्या मारूनही अपर विभागीय आयुक्त श्री. अजय मोरे यांनी अगदी अचुक निकाल दिल्याबद्दल सुधीर भद्रे यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button