Letest News
समकालीन साईभक्त लक्ष्मीबाई शिंदे वाड्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी घेतले दर्शन साईसच्चरिताचा जयघोष सवाद्य मिरवणुकीने पारायण सोहळ्याला दिमाखात सुरुवात! मंगलमय वातावरणात श्रीसाईसच्चरित पारायण सोहळ्याचा शुभारंभ काळे रुमाल बांधलेल्या दोन चोरट्यांचा शिर्डीत धुमाकूळ लाखोच्या सोन्याची चैन हिसकावली गोरगरिबांच्या शिध्यावर डल्ला? राहात्यात ५.९० लाखांचा माल ताब्यात शिर्डीत भिक्षेकऱ्यांविरोधात पोलिसांची धडक मोहीम-भल्या पहाटे पोलिसांचा शहरभर धडाका नगर-मनमाड महामार्गाची साडेसाती संपणार कधी? सहा वर्षांत तीन कंत्राटदार बदलले तरी लोकप्रतिनिधींचे मौन ... तोतया पत्रकारांची धाड की खंडणीचा डाव? महिलेकडे मागितले तब्बल एक लाख! ग्रामपंचायत अधिकाऱ्याची १० हजारांची लाच मागणी ५ हजार घेताना ACBच्या जाळ्यात! साईबाबांच्या बदनामीकारक व्हिडीओंना चाप बसणार! दिल्ली उच्च न्यायालयाचे GAC ला दणका
अ.नगरराजकीय

शिंदेचा एन्काऊंटर केला. दुसऱ्या शिंदेंचा जनता एन्काऊंटर करेल पोलीस इतके लेचेपेचे असतील तर फडणवीसांनी राजीनामा द्यायला हवा राऊत

एकाचं एन्काऊंटर झाला, आता दुसऱ्या शिंदेंचा जनता एन्काऊंटर करेल, अशा शब्दात संजय राऊत यांनी नाशिकमध्ये बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका केली आहे. बदलापूर प्रकरणातील आरोपीच्या एन्काऊंटरबाबत बोलताना संजय राऊत यांनी हे संपूर्ण प्रकरण संशयास्पद असल्याचं म्हटलं.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

तसंच या प्रकरणात मोठे मासे वाचवायचे आहेत, ज्यांना वाचवायचं आहे ते भाजपशी संबंधित आहेत.बदलापूरमध्ये हे संपूर्ण प्रकरण समोर आल्यानंतर शहरात संतापाची लाट उसळली होती. संपूर्ण जनता आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, त्याला फाशी व्हावी या मागणीसाठी रस्त्यावर उतरली होती. याबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले, बदलापूरमधील जनतेने रेल्वे बंद पाडली होती, रस्ते बदं केले होते. आरोपीला आमच्या ताब्यात द्या,

kamlakar

आम्ही त्याला शिक्षा देऊ, फासावर लटकवू असं म्हणत त्याला आमच्याकडे सोपवण्याची मागणी केली होती. पण त्यावेळी मात्र मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांनी महाराष्ट्र कायदेशीर राज्य असून हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याचं आश्वासन दिलं होतं, असंही संजय राऊत म्हणाले.पोलीस व्हॅनमध्ये बसलेला बुरखा घातलेला आणि बेड्यांनी जखडलेला गुन्हेगार पळून कसा जाईल,

तो पोलिसांच्या कमरेवरील पिस्तूल कसं काढू शकतो असा सवाल करत संजय राऊत यांनी आमचे पोलीस इतके लेचेपेचे असतील तर फडणवीसांनी राजीनामा द्यायला हवा, असं म्हटलं आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मनोज जरांगे पाटील यांनी राज्यात जे वातावरण निर्माण केलं आहे, त्यावरुन लक्ष हटवणयासाठी हे एन्काऊंटर केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button