Letest News
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेशानंतर खा. भाऊसाहेब वाकचौरे यांचा जल्लोषात सत्कार साई प्रसादालयातील सेवेबाबत भरत मोरे यांची नाराजी व्यवस्थेत सुधारणा करण्याची मागणी महामहीम राष्ट्रपतींनी गौरवलेल्या साईप्रसाद भोजनालयाची बदनामी अयोग्य-भरत मोरे यांच्या भूमिकेवर कमलाकर... "छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन चालणार नाही विचारही जगावे" : राजमाता कल्पनाराजे शिर्डी - महिला लोकप्रतिनिधींनी देखील दारुबंदीसाठी पुढे यावे ! चंद्रपूरसारखे रणरागिणीचे रौद्र रुप एकद... फसवणूक प्रकरणात कल्पना खरात यांना अटकपूर्व जामीन मंजूर लग्नाच्या नावाखाली लाखोंची फसवणूक-राहाता पोलिसांनी बनावट विवाह रॅकेटचा केला पर्दाफाश! "आयुक्त तुकाराम मुंडे अॅक्शन मोडमध्ये--शिर्डीत पेढ्यांवर धाड-हजारो किलो माल जप्त!" दारूबंदी केवळ कागदावरच? शिर्डीत अवैध दारूविक्रीचा सुळसुळाट-गुन्हेगारीला मिळतेय खुलेआम खतपाणी! शिर्डी प्रसादालयात गोंधळ-शिवसेना पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल-सोशल मीडियावरील व्हिडिओही ठरला वादाचा विष...
अ.नगरराजकीय

शिंदेचा एन्काऊंटर केला. दुसऱ्या शिंदेंचा जनता एन्काऊंटर करेल पोलीस इतके लेचेपेचे असतील तर फडणवीसांनी राजीनामा द्यायला हवा राऊत

एकाचं एन्काऊंटर झाला, आता दुसऱ्या शिंदेंचा जनता एन्काऊंटर करेल, अशा शब्दात संजय राऊत यांनी नाशिकमध्ये बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका केली आहे. बदलापूर प्रकरणातील आरोपीच्या एन्काऊंटरबाबत बोलताना संजय राऊत यांनी हे संपूर्ण प्रकरण संशयास्पद असल्याचं म्हटलं.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

तसंच या प्रकरणात मोठे मासे वाचवायचे आहेत, ज्यांना वाचवायचं आहे ते भाजपशी संबंधित आहेत.बदलापूरमध्ये हे संपूर्ण प्रकरण समोर आल्यानंतर शहरात संतापाची लाट उसळली होती. संपूर्ण जनता आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, त्याला फाशी व्हावी या मागणीसाठी रस्त्यावर उतरली होती. याबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले, बदलापूरमधील जनतेने रेल्वे बंद पाडली होती, रस्ते बदं केले होते. आरोपीला आमच्या ताब्यात द्या,

kamlakar

आम्ही त्याला शिक्षा देऊ, फासावर लटकवू असं म्हणत त्याला आमच्याकडे सोपवण्याची मागणी केली होती. पण त्यावेळी मात्र मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांनी महाराष्ट्र कायदेशीर राज्य असून हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याचं आश्वासन दिलं होतं, असंही संजय राऊत म्हणाले.पोलीस व्हॅनमध्ये बसलेला बुरखा घातलेला आणि बेड्यांनी जखडलेला गुन्हेगार पळून कसा जाईल,

तो पोलिसांच्या कमरेवरील पिस्तूल कसं काढू शकतो असा सवाल करत संजय राऊत यांनी आमचे पोलीस इतके लेचेपेचे असतील तर फडणवीसांनी राजीनामा द्यायला हवा, असं म्हटलं आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मनोज जरांगे पाटील यांनी राज्यात जे वातावरण निर्माण केलं आहे, त्यावरुन लक्ष हटवणयासाठी हे एन्काऊंटर केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button