Letest News
शिर्डीत भक्तिरसाचा महापर्व! साई–हरी नामाचा सार्वजनिक कीर्तन सोहळा ५०व्या वर्षात — शिर्डी पंढरपूरमय मतदानाच्या दिवशी शिर्डी आठवडे बाजार बंद ठेवण्याचा निर्णय-मतदान प्रक्रियेला अडथळे टाळण्यासाठी प्रशासन... प्रचाराचा शेवटचा दिवस…आणि शिर्डीतले वातावरण अक्षरश धगधगतंय! कारण या निवडणुकीत एकच नाव वाऱ्यासारखं पस... अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय श्रीरामपूर पथकाची धडक कारवाई-गावठी कट्टा विक्रीसाठी दोन इसमांचा पर्दाफा... राहाता शहरात बदलाची गर्जना-घराणेशाही-भ्रष्ट राजकारणाचा पर्दाफाश – नागरिकांचा रोष उफाळला 55 कोटींचा महाघोटाळा —तेच लोक आज राजकारणात मोठ्या खुर्च्या घेण्यासाठी धाव घेतायत.- लोकांना फसवणारे ह... प्रभाग २ क मध्ये ‘सक्षम प्रभाग – विकसित प्रभाग’चा नवा आवाज किटली चिन्हाचे उमेदवार सतीश उर्फ नंदू गों... अहिल्यानगर जिल्ह्यात मोठा बदल : 12 पैकी 4 नगरपरिषद निवडणुका पुढे ढकलल्या — कोर्टातील अपीलचा परिणाम प्रभाग १ ब मध्ये परीवर्तनाची लाट — अॅड. प्रतिक शेळके अग्रस्थानी ‘बॅट’ चिन्हावर मतदारांचा विश्वास — श... तीन दिवस तळीरामांचे ‘दिवे लागले’ — जिल्हाधिकाऱ्यांचा कोरडा दिवस आदेश जाहीर मतदान मतमोजणी आणि मतदानाप...
अ.नगरराजकीय

श्रीराम आणी स्वामी समर्थ यांच्या विषयी बोलणाऱ्या मूर्ख महारावं चा व जाणत्या नेत्यांचा निषेध हिंदू समाजाने करावा

कळस (प्रतिनिधी):

sai nirman
जाहिरात

प्रभू श्रीराम व स्वामी समर्थ यांच्या विषयी बोलणाऱ्या मूर्ख महारावं व त्यांच्या वक्तव्याला मुक संमती देणाऱ्या जाणत्या नेत्याचा निषेध हिंदू समाजाने केला पाहिजे असे स्पष्ट मत जगद्गुरू तुकाराम महाराज संस्थान नेवासा चे मठाधीपती ह.भ.प. उद्धव महाराज मंडलिक यांनी व्यक्त केले. महारावं व त्यांचे स्टेज वर असणाऱ्या नेत्यांचा भाविकांनी दोन्ही हात वर करून निषेध केला.

DN SPORTS


अमृतवाहिनी प्रवरामातेच्या तीरावर वसलेल्या ब्रह्मलीन प.पू. सुभाष पुरी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने श्री क्षेत्र कळस बु येथे अखंड हरिनाम सप्ताह मध्ये काल्याचे कीर्तनात निरूपण करताना बोलत होते.

kamlakar

यावेळी अगस्ती देवस्थान ट्रस्ट चे विश्वस्त विष्णू महाराज वाकचौरे, गणेश महाराज वाकचौरे, सरपंच राजेंद्र गवांदे, भाजपा सोशल मीडिया सेल चे जिल्हा संयोजक भाऊसाहेब वाकचौरे, उपसरपंच केतन वाकचौरे आदी उपस्थित होते.


मंडलिक महाराज हे बोलताना म्हणाले, हिंदू धर्म सहिष्णू असल्याने हिंदू धर्माची टिंगल करण्याचे षडयंत्र राबवले जात आहे. धर्मनिरपेक्षता ही बेगडी असून ती फक्त हिंदू धर्मा विरोधात राबविली जाते.

हिंदू धर्मातील देव देवता, साधू संत यांच्या बद्दल चुकीचे वक्तव्य करणाऱ्या अपप्रवृत्ती चा व ज्यांच्या समोर केला असे वक्तव्य केले ते महाराष्ट्रातील स्वतःला जाणते नेते म्हणून घेणाऱ्या च्या मुक संमतीचा निषेध हिंदू समाजाने केला पाहिजे.

धर्म आणी संस्कृतीला बाधा आणण्याची खोटी धर्मनिरपेक्षता बेगडी आहे. यात फक्त हिंदू धर्माला लक्ष केल जात.
हिंदू धर्म कोणत्याही जातीचा द्वेष करत नाही. भारत भूमी नेहमी विश्व बंधुत्वाचा संदेश देत असते. हिंदू धर्मातून निर्माण झालेले धर्म, पंथ यांचा सुद्धा राग केला नाही.

जाती पाती मध्ये भांडणे लावून फुट पाडण्याचे काम केले जात आहे. देश सुरक्षित राहण्यासाठी संस्कृती टिकली पाहिजे यासाठी हिंदू समाज संघटित झाला पाहिजे.
आपल्या देशाच्या चोहो बाजूनी अपप्रवृत्ती असून अमेरिका, चिन, पाकिस्तान आपले देशाला हानी पोहचविण्याचे काम करीत आहे.

गीता , गाथा यांचे ज्ञान आपल्या पुढील पिढीला मिळाले पाहिजे. तरुणांनी कोणाचे दास न होता राजकारणा पासून दूर राहिले पाहिजे, तरुणी नी आपला जोडीदार निवडताना त्यांचे संस्कार पाहिले पाहिजे. झगामगत्या दुनिया च्या नादी लागू नये. आभासी जगाच्या मागे पळू नका असा मंडलिक महाराज यांनी सल्ला दिला.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button