Letest News
नगरपरिषद–नगरपंचायत निवडणुकीत मोठा बदल आता ऑनलाईनसोबत ऑफलाईन नामनिर्देशनालाही परवानगी-सुट्टीच्या दिवश... कोपरगाव–शिर्डी महामार्गावरील भीषण अपघात! कार पेटून खाक – ड्रायव्हरचा होरपळून मृत्यू अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था मजबूत करण्यासाठी एक “गेम चेंजर” ठर... गावठी कट्टा घेऊन फिरणारे तिघे जेरबंद- 7.82 लाखांचा मुद्देमाल हस्तगत शिर्डीत लोकशाहीचा उघड उघड खून! मतदारांच्या माथी उमेदवार लादणाऱ्यांना शिर्डीकडून थेट इशारा! शिर्डीत ट्रॅव्हल्सची दादागिरी! लहान बाळासह साईभक्त महिलेला मध्यरात्री बसमधून हाकलण्याचा प्रकार — साई... ५१ लाखांचे सोन्याचे दागिने हस्तगतस्थानिक गुन्हे शाखेने ५७२.७५ ग्रॅम सोनं जप्त करून फिर्यादीस दिला न्... शिर्डी नगरपरिषद निवडणुकीसाठी नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांची निरीक्षक... मालेगावमध्ये अतिक्रमण मोहिमेने शेकडो नागरिक बेरोजगार —मातोश्री हाॅकर्स युनियन संस्थापक जगदीश गो-हेच्... फरार खुनाचा आरोपी अखेर पोलिसांच्या ताब्यात!अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या नेतृत्वाखाली अ...
शिर्डी

श्री साईबाबा संस्थानाचे १९२० कंत्राटी कर्मचारी होणार कायम कर्मचाऱ्यानं मध्ये आनंदाचे वातावरण

शिर्डी, प्रतिनिधि
श्री साईबाबा संस्थानमध्ये गेल्या २२ ते २३ वर्षांपासून विविध विभागात काम करत असलेले कंत्राटी कर्मचारी यांच्या संघर्षाला अखेर साईच्या दरबारात यश मिळाले आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

वास्तविक ५९८ कर्मचारी यांनी कायमस्वरूपी ऑर्डर मिळण्यासाठी शासनाकडे, राजकीय नेत्यांकडून अपेक्षा ठेवली होती. तर दुसरीकडे न्यायालयात धाव घेतली होती. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सन २०२१ मध्ये याचिका दाखल केली होती त्यात त्यांनी महाराष्ट्र शासनाला प्रतिवादी केले होते.

kamlakar

९ मे रोजी उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठाचे न्यायाधीश स्वाँद्र पुगे व आर. एम. जोशी यांनी या याचिकेवर निकाल दिला आहे. संस्थानमध्ये दहा वर्षांपासून हे कर्मचारी काम करतात, त्यांना कायमस्वरुपी करण्यात यावे असा आदेश देण्यात आला. आदेशाची अंमलबजावणी १२० दिवसात पूर्ण करण्याची मुदत देण्यात आली असून या निकालामुळे १९०० कामगारांचे कल्याण होणार आहे. या निकालानंतर कामगार विभागातून कागदपत्रांची जुळवाजुळव सुरु असुन हा अहवाल शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.


गेल्या २२ते २३ वर्षांपासून कायमस्वरूपीची ऑर्डर मिळावी, यासाठी अनेक कामगारांनी संघर्ष केला. अनेक आंदोलने झाली, दुर्दैवाने हे स्वप्न उराशी बाळगणारे काही कर्मचारी देवाघरी गेले. यात फक्क ५९८ कंत्राटी कामगारांना आशा होती. मात्र, त्यांनी उभारलेल्या लढ्याला यश मिळताना १९२० कर्मचान्यांचे कल्याण होणार आहे. विशेष बाब म्हणजे तीन महिन्यात यासर्व १९०० कर्मचायांना कायमस्वरूपी ऑर्डर मिळण्याची शक्यता असून २०२४ है वर्ष कंत्राटी कामगारांसाठी एक भविष्याला नवीन दिशा देणारे ठरणार आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button