Letest News
72 तास उलटले… तरी गुन्हा नाही! शिर्डीत धर्मांतर प्रकरण गूढच” “हिंदुत्ववादी संघटना शांत का? शिर्डीत स... दैनिक साई दर्शनचा दणका! ‘मुंबई बिर्याणी’वर कारवाई – हॉटेल सील घरकुल मंजुरीसाठी लाच मागणाऱ्यांवर सापळा- १० हजार घेताना रंगेहात अटक! अनुयायांच्या नावावर बनावट खाती-‘समता पतसंस्था’चा महाघोटाळा उघडकीस? “समता”ला संरक्षण कोण देतंय? शिर्डीत मानपानाच्या नावाखाली नवविवाहितेचा छळ- पतीसह सहा जणांवर गुन्हा! शिर्डीत वैद्यकीय चमत्कार! 15 किलोची प्रचंड गाठ यशस्वीरीत्या काढली थकीत वीजबिलावर ५०% सवलत द्या- डॉ. राजेंद्र पिपाडा यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन जिल्ह्यात बालविवाहाविरोधात प्रशासनाचा धडाका- १५५ प्रकरणांत हस्तक्षेप-वर्षभरात ७ गुन्हे दाखल-अनेक विव... शेळके दाम्पत्याचा दुर्दैवी मृत्यू- हजारोंच्या उपस्थितीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार सिन्नरचा दीपक लोंढे पोलिसांच्या रडारवर- २५ मालमत्तांची माहिती समोर!
शिर्डी

श्री साईबाबा संस्थानाचे १९२० कंत्राटी कर्मचारी होणार कायम कर्मचाऱ्यानं मध्ये आनंदाचे वातावरण

शिर्डी, प्रतिनिधि
श्री साईबाबा संस्थानमध्ये गेल्या २२ ते २३ वर्षांपासून विविध विभागात काम करत असलेले कंत्राटी कर्मचारी यांच्या संघर्षाला अखेर साईच्या दरबारात यश मिळाले आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

वास्तविक ५९८ कर्मचारी यांनी कायमस्वरूपी ऑर्डर मिळण्यासाठी शासनाकडे, राजकीय नेत्यांकडून अपेक्षा ठेवली होती. तर दुसरीकडे न्यायालयात धाव घेतली होती. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सन २०२१ मध्ये याचिका दाखल केली होती त्यात त्यांनी महाराष्ट्र शासनाला प्रतिवादी केले होते.

kamlakar

९ मे रोजी उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठाचे न्यायाधीश स्वाँद्र पुगे व आर. एम. जोशी यांनी या याचिकेवर निकाल दिला आहे. संस्थानमध्ये दहा वर्षांपासून हे कर्मचारी काम करतात, त्यांना कायमस्वरुपी करण्यात यावे असा आदेश देण्यात आला. आदेशाची अंमलबजावणी १२० दिवसात पूर्ण करण्याची मुदत देण्यात आली असून या निकालामुळे १९०० कामगारांचे कल्याण होणार आहे. या निकालानंतर कामगार विभागातून कागदपत्रांची जुळवाजुळव सुरु असुन हा अहवाल शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.


गेल्या २२ते २३ वर्षांपासून कायमस्वरूपीची ऑर्डर मिळावी, यासाठी अनेक कामगारांनी संघर्ष केला. अनेक आंदोलने झाली, दुर्दैवाने हे स्वप्न उराशी बाळगणारे काही कर्मचारी देवाघरी गेले. यात फक्क ५९८ कंत्राटी कामगारांना आशा होती. मात्र, त्यांनी उभारलेल्या लढ्याला यश मिळताना १९२० कर्मचान्यांचे कल्याण होणार आहे. विशेष बाब म्हणजे तीन महिन्यात यासर्व १९०० कर्मचायांना कायमस्वरूपी ऑर्डर मिळण्याची शक्यता असून २०२४ है वर्ष कंत्राटी कामगारांसाठी एक भविष्याला नवीन दिशा देणारे ठरणार आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button