Letest News
राहाता तालुक्यातील एकरूखे येथे सरकारी वकिलाच्या घरी धाडसी दरोडा- १.५१ लाखांचा ऐवज लुटून चार दरोडेखोर... साईबाबांवर हात ठेवून शपथ घ्या- टक्केवारी कोणी मागितली?निलेश लंके यांचा विखेंवर घणाघात मंदिर परिसरात भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाटइशारा देऊनही संस्थान-नगरपरिषद सुस्त अखेर साईभक्त महिलेवर कु... पती बेपत्ता म्हणून पत्नीची पोलिसांत तक्रार शोध घेताना समोर आला धक्कादायक प्रकार! पत्नीच्या नावाने रू... पैशांसाठी विवाहितेचा छळ चारित्र्यावर संशय घेत मारहाण‘गाडी घेण्यासाठी माहेरून पैसे आण नाहीतर जिवंत सो... ओबीसी मोर्चाच्या उत्तर महाराष्ट्र सहसंपर्कप्रमुखपदी बाळासाहेब गाडेकर शिर्डीत साईबाबांच्या धुपारतीच्या वेळेत बदल श्रावण सोमवारी सायंकाळी ६ वाजताच धुपारती चक्क भरदिवसा किराणा दुकानाचा गल्ला साफ! दान करायला आले अन् सोन्याची पोत घेऊन पसार!शिर्डीत महिलेची हातचलाखीने फसवणूक ४० हजारांचे सोने लंपास NH-160 च्या निकृष्ट कामावर पिपाडांचा हल्लाबोल!ठेकेदार सल्लागार एजन्सी व दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाख...
क्राईमशिर्डी

शिर्डीत १५ वर्षीय मुलाची गळफास घेऊन आत्महत्या श्रीरामनगर परिसर हादरला

शिर्डी शहरातील श्रीरामनगर परिसरात १५ वर्षीय मुलाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून शहरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रेम दशरथ हातांगळे (वय १५) याने ६ जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास राहत्या घरात फॅनला साडीच्या सहाय्याने गळफास घेतला. ही बाब लक्षात येताच कुटुंबीयांनी त्याला तातडीने साईबाबा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजीत गलांडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

याप्रकरणी शिर्डी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.
प्राथमिक माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी प्रेमच्या वडिलांचे निधन झाले होते. तो कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. त्यामुळे या घटनेने हातांगळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मुलाने हे टोकाचे पाऊल कोणत्या कारणामुळे उचलले, याचा सर्व बाजूंनी तपास शिर्डी पोलीस करीत आहेत.
दरम्यान, एकुलत्या एक मुलाच्या निधनानंतर आईने फोडलेला आक्रोश पाहून घटनास्थळी उपस्थित नागरिकांचेही डोळे पाणावले. श्रीरामनगर परिसरात या घटनेमुळे शोककळा पसरली असून नागरिकांकडून हातांगळे कुटुंबीयांप्रती हळहळ व्यक्त केली जात आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button