
शिर्डी प्रतिनिधी
शिर्डीत दररोज गुन्हेगारी वाढत चालली आहे याला कारणीभूत जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक असल्याचे बोलले जात आहे कारण कि शिर्डीतच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात गुन्हेगारी दिवसादिवस वाढत चालली आहे
ज्यांप्रमाणे गुन्हेगारी रोखण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे तसें होतांना दिसत नाहीत म्हणून गुन्हेगारांना व सामान्य लोकांना पोलिसांचा धाक राहिलेला नाही सुपाऱ्या घेणे मुलं उचलून नेने हत्या सारखे प्रकार दररोज घडत आहेत जिल्हा पोलीस प्रमुख गुन्हेगारी रोखण्यास आकार्यक्षम असल्याची सामान्य नागरिकांची भावना झालेली आहे
शिर्डी ही साईबाबांच्या पावन स्पर्शाने पुनीत झालेली भूमी आहे ह्याभूमीत देश विदेशातून साईभक्त साईबाबांच्या दर्शनासाठी येत असतात त्यांचेही पाकिटमारणे चैनस्नेचिंग होणे गाडीच्या काचा फोडून गाडीतील सामान चोरून नेने मोबाईल चोराने हे नित्याची बाबा झालेली आहे शिर्डी पोलीस स्टेशनला पोलीसांची संख्याबळ कमी आहे
एक गुन्हा डिटेक्त होत नाही तोवर दुसरा गुन्हा दाखल होतो पहिल्या गुन्ह्याच तपास सुरु करताच व्ही आयपिंचा बंदोबस्त लागून जातो म्हणून पोलीसांनी कामे कशी करावीत हा प्रश्न पडतो पोलीसाची संख्या कमी आहे हे पोलीस अधीक्षकांना माहीत असून शिर्डी पोलीस स्टेशनला पोलीस बळ वाढवळे जात नाही
आणि पोलीस अधीक्षक सुद्धा येथे लक्ष देत नसल्याने शिर्डीत गुन्हेगारी वाढली आहे साईभक्त सुद्धा येथे जीव मुठीत घेऊन येत असल्याचे चित्र आहे आणि हे असेच सुरु राहिले तर शिर्डीत पुन्हा आराजक्ता वाढणार आहे काही दिवसांपूर्वी राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखेंनी शिर्डीत गुन्हेगारी वाढलेली आहे
म्हणून प्रसासनाची बैठकीत सर्व सूचना देऊन शिर्डीतील गुन्हेगारी कडे लक्ष देण्याच्या सूचना केल्या होत्या त्याकडेही प्रशासनाने दुर्लक्ष केलेले दिसून येत आहे
परवा रात्री शिर्डीत दोन गटात तुंबळ हाणामारी झाली त्यात एकाने दुसऱ्याच्या डोक्यात कोयता घातला आणि एकाच्या पायावर घाव घातले ते दोन्ही हॉस्पिटल मध्ये उपचार घेत आहेत ज्याच्या डोक्यात वार झालेले आहेत
त्याला 30 टाके पडले आहेत काल सकाळ पर्यंत त्याची परिस्तिथी नाजूक होती आता व्यवस्तीत असल्याचे कळते आणि दुसऱ्या जखमीला ही काही टाके पडले असल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे दोन्ही गट एकमेका विरोधात तक्रार देणार असल्याचे कळते
आतापर्यंत शिर्डी पोलीस स्टेशनला कुठलाही गुन्हा दाखल झालेला नसून बहुतेक ज्याच्या डोक्याला मार लागलेला आहे त्याची प्रकृती बरी झाल्यावर परस्पर विरोधी गुन्हे दाखल होतील असे समजते शिर्डीत आधीच गर्दी कमी आहे शिर्डीत लूटमार होते आणि असे प्रकार घडते म्हणून साईभक्त येथे जास्त थांबत नाहीत
परिणामी शिर्डीत गर्दी न झाल्याने शिर्डीतील व्यावसायिक त्रासलेले आहेत असेच प्रकार शिर्डीत घडत राहिले तर शिर्डीची ओढख गुन्हेगारांची शिर्डी होण्यास वेळ लागणार नाही म्हणून स्वतः पोलीस महासंचालकानी येथे लक्ष घालून अहमदनगरला कृष्णप्रकाश सारखे सिंघम पोलीस अधीक्षकांची नियुक्ती करून शिर्डीची पावित्रता आबाधित कशी राहील हे प्रयत्न करने गरजेचे झालेले आहे