Letest News
शिर्डीत अपहरण करून एकाचा खून! या संदर्भात सात अल्पवयीन मुलांना पोलिसांनी घेतले ताब्यात! भरत मोरे यांच्या त्या" वादग्रस्त वक्तव्याचा वकील संघाकडून निषेध ! कोल्हार घोटी महामार्गावर कोकणगाव जवळ ट्रक व ट्रॅव्हल बसचा भीषण अपघात! तीन ठार! सहा जण गंभीर जखमी! शिव,शाहु.फुले,आंबेडकर प्रबोधिनी समिती कडून शौकतभाई शेख सह सामाजिक कार्यकर्त्यांचा सन्मान! तर मग साई संस्थान हाजी अब्दुल बाबा समाधी येथील देणगी व देखरेख स्वतःकडे का घेत नाही?--आ. संग्राम जगता... शिर्डीत व्हाइटनरची नशा करणाऱ्या तरुणांची वाढली संख्या! छत्रपती कॉम्प्लेक्स बनला त्यांचा अड्डा! आधार ... शिर्डीत धारदार शस्त्र बाळगल्याने दोन आरोपींवर गुन्हा दाखल! साईभक्ताची 51 लाखाची फसवणूक केल्या प्रकरणी शिर्डी येथील कुमावत वर दिल्लीतील भक्ताने केला गुन्हा दाखल प्रवेशद्वाराजवळ पूजेचे साहित्य खरेदी केल्याचे बिल दाखवल्यानंतरच पूजेचे साहित्य मंदिरात नेण्यास परवान... sshirdi news उभ्या दोन ट्रक मधून रात्री डिझेलची चोरी करणाऱ्या तिघांना अटक! त्यात सावळीविहीरचे दोन तर...
शिर्डी

नगरपरिषदेच्या पाणी पुरवठा विभागाला अधिकाऱ्याची प्रतीक्षा..! पंपमनकडे सर्व सूत्रे..करेल का तो शिर्डीकरांची रक्षा..?

शिर्डी( प्रतिनिधी)
शिर्डी नगर परिषद प्रतीवर्षी पाणीपट्टी दंड व्याज शास्ती सह वसूल करत असताना मात्र शिर्डी शहराला दररोज पिण्याचे पाणी देणे गरजेचे असताना प्रतिदिन शहराला पाणी मिळत नाही. दिवसाआड पाणीपुरवठा होत होता परंतु नगर परिषदच्या चुकीमुळे आज दोन दिवस आड पाणी मिळत असल्याने महिलांना मनस्ताप सहन करावा लागत आहे नागरिकांना पिण्याच्या पाण्याच्या समस्येमुळे मोठी अडचण असल्याने महिला वर्गामधून संतप्त प्रतिक्रिया व नाराजी व्यक्त होत आहे.
पाणीपट्टी वेळेवर भरली. नाही तर व्याज दंड शास्ती वसूल करण्यापेक्षा नागरिकांना पिण्याची पाण्याची सुविधा उपलब्ध करून देणे हे नगरपालिकेचे काम असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे.
शिर्डी शहराला कनकुरी येथील साठवण‌ तलावातून पाणीपुरवठा केला जातो मात्र यावेळी नगर परिषद कडून पाणी भरण्याचे वेळापत्रक पाणी पुरवठा विभागाच्या तांत्रिक चुकीमुळे चुकले होते. सध्या गोदावरी उजव्या कालव्याला सध्या सात दिवसापासून पाणी सुरू आहे. आणि साठवण बंदरात पाणी भरलेले असताना पूर्वी प्रमाणे एक दिवस आड पाणी देणें अपेक्षित असतानाही दोन दिवस आड पाणी सोडले जात आहे प्रशासकीय राजवट आहेत त्याठिकाणी लोकप्रतिनिधी नसल्याने नागरिकांना हाल सोसावे लागत आहे
शिर्डी शहर आंतरराष्ट्रीय तीर्थस्थान आहे. येथील शिर्डी शहराला दररोज पिण्याचे पाणीपुरवठा होणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रथम प्राधान्याने हा साठवण बंधारा भरणे गरजेचे आहे. मात्र नगरपालिकेचे दुर्लक्ष म्हणा किंवा इतर कारण म्हणा या साठवण बंदरात पाणी न आल्यामुळे शिर्डी शहराला पाणीपुरवठा दोन दिवसा्आड होत आहे.
त्यामुळे शिर्डी शहरातील अनेक उपनगरातील महिलांची पाण्यासाठी वण वण होतं आहे.तुम्ही जर पाणीपट्टी भरणार असाल तर महिलांची वनवण कशासाठी ?असा सवाल नागरिकांमधून नगरपालिकेला होत आहे. शिर्डी शहरामध्ये सुमारे ४० टक्के हे व्यावसायिक नळपट्टी धारक आहेत.
ते व्यवस्थित पाणीपट्टी भरतात.
तरीही शहरातील महिलांना पाण्यासाठी वणवण करावे लागते. गोदावरी उजव्या कालव्याला पाणी आले. येथील साठवण बंधारे भरणे हे नगरपालिकेचे काम आहे व शिर्डी शहराला पाणीपुरवठा वेळेवर करणे हे नगरपालिकेचे काम आहे. कारण आपण पाणीपट्टी वसूल करतो. मात्र तरीही सध्या शिर्डी शहराला दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. यापुढे वेळेवर पाणी द्यावे अन्यथा नगरपालिकेविरुद्ध तीव्र आंदोलनाचा छेडले जाईल. असा इशारा शिर्डी शहरातील महिलांनी दिला आहे.पालकमत्री असलेल्या ना राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या मतदारसंघात. भर हिवाळ्यात हि परिस्थिती असेल तर भर उन्हाळ्यात काय असेल या चिंतेने महिला चिंताग्रस्त आहेत

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button