Letest News
“द्वारकामाईत भक्तांना दिलासा-राजेंद्र कोते पाटील यांच्या मागणीला प्रशासनाचा तात्काळ प्रतिसाद” राहता पोलिस ठाण्यात अखेर ‘ऑपरेशन उचलबांगडी’ पीआय नितीन चव्हाणांची बदली साईबाबा मंदिर परिसरातच चोरीचा धुमाकूळलेंडीबागेतील फायर यंत्रणेचे होज व ब्रांज लंपास शिर्डीतील सुरक्ष... कॅप्टन खरात प्रकरण थंडबस्त्यात?-खरात प्रकरणात पडद्यामागे ‘मोठे हात’ सक्रिय? -तपासावर नागरिकांचा अविश... “दैवी शक्ती”च्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण! अशोक खरात प्रकरणात SITचा स्फोटक खुलासा लोणी पोलिसांच्या तपासाला मोठे यश! उर्वरित बोगस डॉक्टरांना कधी अटक होणार?” ⚠️ साई मंदिर परिसरातील भटक्या कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करा-अन्यथा प्रशासन जबाबदार!” 🚨 “द्वारकामाईत साईभक्त अक्षरशः घामाघूम- राजेंद्र कोते पाटील यांची संस्थान प्रशासनाला भावनिक साद” राहात्यात पोलिसांचा धाक संपला? गुन्हेगार मोकाट-नगराध्यक्षांचा संताप शिर्डीत ‘MOBILEWALA’ चे दिमाखदार आगमन मोबाईल व होम अप्लायन्सेसच्या विश्वात नवा अध्याय सुरू
अ.नगरक्राईम

महाराष्ट्र पोलिसांसारखं अकार्यक्षम खातं जगात कुठेही नाही

शिर्डी (प्रतिनिधी) शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी महाराष्ट्र पोलिसांबाबत वादग्रस्त विधान केलं आहे. महाराष्ट्र पोलिसांसारखं अकार्यक्षम खातं जगात कुठेही नाही. पोलिसांनी छाप्यात ५० लाख पकडले, तरी ५० हजार रुपयेच दाखवतात असं विधान त्यांनी महाराष्ट्र पोलिसांबद्दल केलं आहे.’पोलीस खात्यासारखं अकार्यक्षम डिपार्टमेंट भारतात, जगात कुठेही नाही. शासनाने कोणताही कायदा केला, की यांचा एक हप्ता वाढला,

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

गुटखा बंदी केली तर गुटखा द्यायचा पण यांचा हप्ता वाढला. दारू बंद केली की चालू करायची, यांचा एक हप्ता वाढला. या राज्यातील पोलिसांनी, देशातील पोलिसांनी इमानदारीने काम केलं ना, तर या जगातील सगळी गंदगी खतम होईल. यांनी फक्त प्रामाणिकपणे आपलं कर्तव्य ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ एवढं चांगलं केलं, तर सगळी गुन्हेगारी खतम होईल’,

अशा शब्दात यांनी पोलिसांवर खालच्या पातळीवर टीका केली आहे.दरम्यान, शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी जम्मू – काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यावरही प्रतिक्रिया दिली होती. २६ चा बदला २६० ने घ्या अशा शब्दात त्यांनी या भ्याड हल्ल्याचा निषेध केला होता. पुन्हा एकदा त्यांनी पीओकेबाबत प्रतिक्रिया दिली आहे. संजय गायकवाड हे निर्भीड बोलणारे नेते आहेत.

त्यांनी पोलीस दला विषयी आपले व्यक्तिगत मत व्यक्त केले असले तरी राज्यात त्यामुळे मोठा गहजब उडाला आहे. पोलीस दलामध्ये सर्वच पोलीस अधिकारी किंवा पोलीस कर्मचारी हे एक सारखे नसतात. काही चांगले असतात. पण काही आपल्या मर्जीप्रमाणे वागतात. सदरक्षणाय खिलनिग्रणाह, हे पोलीसी ब्रीदवाक्य आहे. मात्र सध्याच्या परिस्थितीत आ. संजय गायकवाड यांनी म्हटल्याप्रमाणे काही पोलिसांची दबंग शाही सुरू असलेली दिसते.

कोणी कितीही मोठा किंवा अधिकारी असो मात्र भारतात कायदा आहे. संविधान आहे. त्यावरच हा भारत देश सुरू आहे. त्यामुळे प्रत्येकाने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. अधिकार असला म्हणजे त्या अधिकाराचा गैरवापर करणे चुकीचे आहे. सध्या काही ठिकाणी अशा अधिकाराचा गैरवापर होत असल्याचे दिसून येत आहे.

असे प्रकार घडू नये. असेच आमदार संजय गायकवाड यांच्याप्रमाणे सर्वसामान्य नागरिकांची इच्छा आहे. महाराष्ट्र पोलीस दल देशात सर्वोत्कृष्ट समजले जाते. त्यामुळे आपल्या पोलीस दलाची शान आहे तसीच अबाधित राहावी म्हणून प्रत्येक पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनीही स्वतःहून तसे प्रयत्न केले पाहिजे.असे नागरिकांमधून बोलले जात आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button