Letest News
शिर्डी साई मंदिर सुरक्षेसाठी नवे प्रभारी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गेंचे आदेश साईपरंपरेचा वारसा जपणारे व्यक्तिमत्व – मिलिंद (दादा) कोते पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भक्तीचा महासागर उसळणार! शिरडी परिक्रमा महोत्सवासाठी साईनगरी सज्ज साईसेवेचा सुंदर नमुना-संस्थानला २५ लाखांची अत्याधुनिक स्कूल बस भेट साईकृपेचा दुहेरी आनंद-ठाण्याच्या नार्वेकर कुटुंबीयांकडून ११ लाखांचे दोन सोन्याचे दिवे अर्पण शिर्डीसाठी स्वतंत्र उत्पादन शुल्क अधीक्षक कार्यालय-आता ‘दारूमुक्त शिर्डी’ची खरी परीक्षा! खाकीतील कर्तव्यनिष्ठ नेतृत्वाचा गौरव शिर्डी विभागाचे पोलीस उपविभागीय अधिकारी अमोल भारती साहेबांचा वा... अनैतिक देहव्यापारावर पोलिसांचा कडक घावश्रीरामपुरातील ‘आदर्श लॉज’ एक वर्षासाठी बंद-लॉज सील शिर्डीत साईभक्तांची लूट थांबली नाही! विखे पिता–पुत्रांच्या सूचनांना एजंटांची हरताळ? साईनगरीत बालशोषणावर कडक घाव! भिक्षा आणि विक्रीसाठी वापरल्या जाणाऱ्या १४ अल्पवयीन बालकांची सुटका
अ.नगरशिर्डी

विरोधक हतबल झालेत — निवडणूक आयोगावर मोर्चे म्हणजे अपयशाचं झाकपाक : मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

शिर्डी प्रतिनिधी | साई दर्शन न्यूज

sai nirman
जाहिरात

शिर्डी – राज्यात सध्या सुरु असलेल्या राजकीय घडामोडींवर भाष्य करताना मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे.
“निवडणूक आयोगाविरोधात मोर्चे काढणं म्हणजे विरोधकांच्या हतबलतेचं द्योतक आहे. त्यांना आधीच दिसतंय की आगामी निवडणुकीत त्यांचं अपयश ठरलेलं आहे,” असं त्यांनी ठामपणे सांगितलं.

DN SPORTS

kamlakar

मंत्री भोसले म्हणाले, “महाविकास आघाडीनं कितीही जुळवाजुळव केली तरी जनतेचा त्यांच्यावर विश्वास उरलेला नाही. लोकसभेत त्यांना यश मिळालं, पण विधानसभेत ते साफ अपयशी ठरले. त्यातून अजून ते सावरलेले नाहीत.”

राज ठाकरे यांच्या नमो सेंटरवरील वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना भोसले म्हणाले, “छत्रपतींचा विषय काढल्याशिवाय काही लोकांना निवडणुकीत मुद्देच मिळत नाहीत. नमो सेंटरवर बोलण्याआधी ते काय आहे, त्याचं उद्दिष्ट काय आहे, हे जाणून घ्यावं. विरोध फक्त विरोधासाठी करू नये.”

पूरग्रस्त भागातील स्थितीवर बोलताना त्यांनी सांगितलं, “सरकारनं शेतकऱ्यांना उदारहस्ते मदत केली. त्यामुळे विरोधकांना तो मुद्दा गेला. आता ते भावनिक मुद्द्यांवर लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत.”

महाविकास आघाडीच्या मोर्चाबाबत ते म्हणाले, “आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, पण आरोप करताना तथ्यांवर बोललं पाहिजे. ईव्हीएम आणि मतदार याद्या यावर बिनबुडाचे आरोप करून स्वतःचं अपयश दुसऱ्यावर ढकलण्याचा प्रयत्न विरोधक करत आहेत.”

भोसले यांनी स्पष्ट केलं की, “महायुती सरकार राज्यातील विकास, पूरग्रस्त मदत आणि नागरिकांच्या हिताच्या कामांवर लक्ष केंद्रित करत आहे. जनतेचा विश्वास आमच्यावर आहे.”

शेवटी मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी शिर्डीत साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं आणि श्री साईबाबा संस्थानतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. साईबाबांच्या कृपाशिर्वादाने महाराष्ट्र शांतता, विकास आणि एकतेच्या मार्गावर पुढे जाईल, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.


साईंच्या चरणी नतमस्तक — श्री साईबाबा संस्थानकडून मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा सत्कार 🌸

शिर्डीत आगमनानंतर मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी श्री साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेऊन राज्यातील जनतेसाठी साईबाबांच्या आशीर्वादाची प्रार्थना केली.
दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळ तर्फे त्यांचा शाल, श्रीफळ आणि साईचरित्र पुस्तक देऊन सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.
या वेळी संस्थानचे अधिकारी, विश्वस्त आणि स्थानिक मान्यवर उपस्थित होते.
भोसले यांनी साईबाबांच्या पवित्र भूमीतून राज्यातील शांतता, विकास आणि जनकल्याणासाठी साईबाबांचे आशीर्वाद मागितले.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button