हेडिंग १ – शिर्डी नगरपालिकेवर निषेध
शिर्डी – लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नगरातील मागासवर्गीय नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा शिर्डी नगरपालिकेने काही दिवसांपूर्वी अचानक थांबवला. या प्रकरणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्ष श्री. समीर रामचंद्र वीर यांनी उपमुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांना तातडीने हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे.
– नागरिकांना दैनंदिन जीवनात अडचणी
प्रतिष्ठानाचे म्हणणे आहे की, नगरपालिकेच्या निर्णयामुळे वृद्ध, महिला व लहान मुलांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. नागरिक नियमाने पाणीपट्टी भरण्यास तयार असूनही नगरपालिकेकडून दुर्लक्ष केले जात आहे, असा आरोप त्यांनी केला.
न्याय मिळेपर्यंत धर्मांतराची धमकी
सामाजिक अन्याय आणि पाणीपुरवठ्यापासून वंचित ठेवण्याच्या आरोपामुळे प्रतिष्ठानने निवेदनात नमूद केले आहे की, जर हिंदू धर्मात राहून न्याय मिळत नसेल, तर त्यांनी धर्मांतर करण्याचा विचार केला आहे.
– तातडीने उपाययोजना करण्याची मागणी
प्रतिष्ठानाने उपमुख्यमंत्र्यांकडे तातडीने हस्तक्षेप करून शिर्डी नगरपालिकेच्या मुख्याधिकार्यांना आदेश देण्याची, संबंधित अधिकारी/पदाधिकारी यांच्यावर चौकशी करून योग्य ती शिस्तभंगात्मक कारवाई करण्याची विनंती केली आहे. तसेच, मागणी मान्य न झाल्यास धर्मांतर करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

