Letest News
शिर्डीत मजुरांच्या खोलीत घरफोडी चार मोबाईलसह ₹65 हजारांचा ऐवज लंपास शिर्डीत रिक्षातून वृद्ध शेतकऱ्याची लूट- सराईत शंकर चौधरी ऊर्फ रहीम पठाण जेरबंद डॉ. मीरा ढास यांनी स्वीकारला शिर्डी येथील माहिती अधिकारी पदाचा कार्यभार मोहरा अटकेत… पण सूत्रधारापर्यंत तपास कधी?व्यवस्थापकाला बेड्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्... साईचरणी प्रामाणिकतेचा आदर्श! गाभाऱ्यात सापडलेले ३४९० भाविक महिलेला सुखरूप परत दिवसाढवळ्या घरफोडी कुलूप तोडून घरातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला कोपरगावात स्थानिक गुन्हे शाखेचे धडक सत्रपाच ठिकाणी छापे ११ आरोपींवर ५ गुन्हे २.१४ लाखांचा मुद्देमाल ... विजयराव कोते पाटील यांचा सेवासंकल्प साईबाबांच्या पालखीसह अखेरची ऐतिहासिक तीर्थयात्रा सेवेतून साईभक्तीचा साक्षात्कार तीन दिवस १० हजार भाविकांना महाप्रसादअन्नदान हीच खरी साईसेवा-अय्यर परि... समता पतसंस्था प्रकरण : व्यवस्थापक मिलिंद बनकर व अध्यक्ष काका कोयटे यांना अटक करण्याची मागणी
अ.नगरक्राईम

अवैध वाळू उपशातून रक्तरंजित टोळी युद्ध-एक तरुण मयत-गोदावरी पात्रात फेकल्याची घटना

श्रीरामपूर | प्रतिनिधी
श्रीरामपूर तालुक्यातील नायगाव येथील गोदावरी नदीपात्रात गेल्या अनेक वर्षांपासून कोणतेही शासकीय टेंडर नसताना बेकायदेशीर व बेसुमार अवैध वाळू उपसा सुरू आहे. दिवसा नदीपात्रातून वाळू उपसा केला जात असून, रात्री डंपर, हायवा व जेसीबीच्या साह्याने मोठ्या प्रमाणावर वाळू वाहतूक केली जाते. या अवैध धंद्यामुळे संपूर्ण नायगाव परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे.
अवैध वाळू उपशामुळे गावाला अक्षरशः गुंडगिरीचे स्वरूप प्राप्त झाले असून, वाळू तस्करांच्या दहशतीमुळे गावकरी भीतीच्या वातावरणात जीवन जगत आहेत. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचा सहभाग असल्याने नागरिक उघडपणे आवाज उठवण्यास धजावत नाहीत.
वाळू पॉईंटवरून टोळी युद्ध; ६ ते ७ जण गंभीर जखमी
काल सायंकाळी गोदावरी नदीपात्रात वाळूचा पॉईंट बनवण्याच्या कारणावरून दोन टोळ्यांमध्ये भीषण टोळी युद्ध झाले. या झटापटीत जबर मारहाण करण्यात आली असून, सहा ते सात जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे.
तरुणाला नदीपात्रात फेकले; एकाचा मृत्यू
या टोळी युद्धादरम्यान एका तरुणाला चक्क गोदावरी नदीपात्रात फेकून देण्यात आले. या घटनेत एका तरुणाचा मृत्यू झाल्याची खात्रीशीर माहिती असून, मृत तरुणाची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. काही वेळाने मृतदेह पाण्यात सापडल्याचे समजते, तर काहींच्या मते तो वाहून गेला होता. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
गोळीबाराची चर्चा; बाहेरील वाळू तस्करांचा सहभाग
या अवैध वाळू उपशामध्ये शेजारील श्रीयाधापूर तालुक्यातील तसेच नायगाव वॉर्ड क्रमांक दोन परिसरातील काही कुख्यात वाळू तस्करांचा सहभाग असल्याची चर्चा आहे. काही वाळू तस्करांकडून गोळीबार झाल्याचीही माहिती परिसरात पसरली असून, पोलिसांकडून याबाबत अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही.
पोलीस घटनास्थळी; तरीही गुन्हा दाखल नाही
घटना घडताच श्रीरामपूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मात्र, इतकी गंभीर घटना घडूनही अद्याप कोणताही गुन्हा दाखल न झाल्याने पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
अवैध वाळू उपशातून थेट खून झाल्याची घटना समोर येऊनही प्रशासन शांत का?
नायगावमधील अवैध वाळू माफियांवर कठोर कारवाई कधी?
याकडे संपूर्ण श्रीरामपूर तालुक्याचे लक्ष लागले आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button