Letest News
वंदे भारतने मुंबई ते शिर्डी-मुख्यमंत्री फडणवीसांचा साधेपणाचा संदेश राजनाथ सिंह आणि मुख्यमंत्री फडणवीस साईचरणी नतमस्तक-भक्ती ते शक्ती : शिर्डीत डिफेन्स प्रकल्पाचे भव्य ... “शिर्डीत पेट्रोलसाठी झुंबड! पंपांवर लांबच लांब रांगा=नागरिकांना संयम ठेवण्याचे आवाहन” स्मार्ट ग्राम’चा फक्त गाजावाजा; सावळीविहीरमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ!”“CCTV बंद स्ट्रीट लाईट गुल-सावळी... “क्लबवर छापे… पण ‘मुख्य सूत्रधार’ अजूनही मोकाट?”“राहात्यात अवैध धंद्यांना कोणाचा राजकीय वरदहस्त?” “गर्भलिंग चाचणी रॅकेटचे धागेदोरे निफाडपर्यंत १८ आरोपी जेरबंद ६ डॉक्टर अटकेत!” “शिर्डी-राहात्यात गुन्हेगारांचा धुमाकूळ- पिपाडा यांचा अप्रत्यक्ष निशाणा विखेंवर!” “राजकीय वरदहस्तामु... सावळी विहीरमध्ये घरफोडीचा थरार- कडी-कोयंडा तोडून चोरट्यांचा धुमाकूळ ! शिर्डीत भरदिवसा रक्तरंजित थरार- दुकानदारावर जीवघेणा हल्ला कॉकरोच जनता पार्टी”मुळे देशभरात बेरोजगारांचा संताप उफाळला-८ मिलियन तरुण एकवटले! साई संस्थानवर गंभीर...
राजकीयशिर्डी

“मंत्रिजी तुम्ही रोज या म्हणजे आमचंही जगणं गुळगुळीत होईल! स्वागताच्या फुलांआड लपलेलं कटू वास्तव

शिर्डी-कोपरगाव मतदारसंघात केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांच्या दौऱ्याची लगबग सुरू होती. सर्वत्र स्वागताचे बॅनर, फुलांचे तोरण, राजकीय नेते व कार्यकर्त्यांची धावपळ — संपूर्ण परिसर उत्साहाने फुलून गेला होता.
पण या चमकदार वातावरणाच्या मागे एक वेगळीच चर्चा नागरिकांमध्ये रंगली —

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


“मंत्रिजी, तुम्ही रोज या…!”

कारण काय माहित आहे का?
ज्या नगर–मनमाड रस्त्यावरून दररोज हजारो नागरिक जीव मुठीत धरून प्रवास करतात, ज्या खड्ड्यांमुळे दररोज अपघात होतात, त्याच रस्त्याची एका रात्रीत डागडुजी झाली!
अनधिकृत गतिरोधक गायब झाले, खड्डे बुजले, आणि नव्या डांबराचा सुगंध हवेत दरवळू लागला.
लोकांचे आश्चर्य दाटून आले —


“आपल्याला सुरक्षित प्रवासासाठी मंत्री लागतात का?”

दररोज लोक मरतात, जखमी होतात, पण तेव्हा प्रशासन झोपेत असतं.
आणि आज?
मंत्री येणार म्हटल्यावर सगळ्या यंत्रणा जणू जिवंत झाल्या!


लोकांनी कटाक्ष टाकत उपरोधाने म्हटलं —
“मंत्रिजी, तुम्ही रोज या… म्हणजे आमचे रस्ते तरी रोज दुरुस्त होतील!”

अमित शाह हे शिर्डीहून प्रवरानगरमार्गे लोणीकडे जाणार असल्याने, तो संपूर्ण मार्ग एकदम गुळगुळीत करण्यात आला.
परिसर झळाळून गेला, पण सामान्य नागरिकांच्या मनात जळत राहिला तो एकच प्रश्न —
“आपल्या जीवाचं मोल फक्त मंत्र्यांच्या दौऱ्यापुरतंच का?”

आज शिर्डी-कोपरगाव परिसरातील प्रत्येक नागरिकाच्या अंतःकरणातून एकच भावना उमटली —

“मंत्रिजी, तुम्ही रोज या,
म्हणजे आमचे रस्ते रोज डांबरीत होतील,
आमचे जीव रोज सुरक्षित राहतील,
आणि आम्हालाही एक दिवस नागरिक म्हणून किंमत मिळेल.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button