Letest News
रामनवमी २०२६ : साईभक्तांच्या पदयात्रेत कीर्तन-प्रवचनांची भक्तीमय मेजवानी #AshokKharat #ShirdiConnection #शिर्डीतून उघड झाला भोंदू साम्राज्याचा काळा खेळ अंधश्रद्धेच्या आडून ल... गुढीपाडवा विशेष : साईनगरीत भक्तीचा महापूर! शिर्डीत आज आणि उद्या दिवसभर धार्मिक कार्यक्रमांची मेजवानी शिर्डीत ‘कॅप्टन’ खरातचे जाळे! चाहत्यांपासून कोट्यवधींच्या साम्राज्यापर्यंत – अटकेनंतर खळबळ शिर्डीहून परतणाऱ्या भाविकाला चाकूचा धाक दाखवून लूट-श्रीरामपुरात दोन आरोपी जेरबंद शिर्डीत गॅसचा काळाबाजार? घरगुती सिलेंडरचा हॉटेलमध्ये सर्रास वापर- ९०० रुपयांचा सिलेंडर २ हजारात विक्... साई एम्प्लॉईज सोसायटीचे कार्य ठरले आदर्श-गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शिधावाटप कार्यक्रम उत्साहात कृषी क्षेत्र देशाच्या अन्नसुरक्षा व आर्थिक स्थैर्याचा आधारस्तंभ – राज्यपाल जिष्णू देव वर्मा ६०-७० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या नागरिकांची घरे तोडू नयेत-सातबारा देण्याची मागणी शिर्डीत हरवलेले मोबाईल शोधून देण्यात पोलिसांचे कौतुकास्पद काम
अ.नगरराजकीय

शेतकरी संरक्षण कायद्यासाठी भारतीय जनसंसदेचे लक्षवेध आंदोलन ३१ डिसेंबरला अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रात्रभर ठिय्या

अहिल्यानगर | प्रतिनिधी
“प्रामाणिक परिश्रम म्हणजेच प्रखर राष्ट्रनिर्मिती” या ब्रीदवाक्याअंतर्गत सहभाग प्रबोधन रचना भारतीय जनसंसद यांच्या वतीने शेतकरी संरक्षण कायदा लागू व्हावा, यासाठी येत्या ३१ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, अहिल्यानगर येथे रात्रभर लक्षवेध आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. शासनाच्या शेतकरीविरोधी धोरणांविरोधात हा लढा असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.
🟩 हमीभाव, कर्जमाफी आणि पिकविमा — शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या मागण्या
आंदोलनामध्ये सर्व पिकांच्या हमीभावात वाढ करून हमीभावापेक्षा कमी दराने विक्री झाल्यास भावांतर योजनेतून थेट अनुदान देण्याची मागणी करण्यात आली आहे.
तसेच बंद करण्यात आलेली जुनी प्रधानमंत्री पिक विमा योजना त्वरित सुरू करावी, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे.
यासोबतच थकबाकीदार व नियमित कर्जदार असा भेदभाव न करता सर्व शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी, अशी ठाम भूमिका संघटनेने घेतली आहे.
🟨 दिव्यांग शेतकरी, शेततळी आणि कुंपणासाठी १००% अनुदानाची मागणी
दिव्यांग शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टलद्वारे १०० टक्के अनुदानावर सर्व योजनांचा लाभ मिळावा, अशी मागणी आंदोलनात करण्यात आली आहे.
याशिवाय शेततळ्यांचे आकारमान वाढवून अनुदानात वाढ करावी, तसेच बिबटयाप्रवण गावांमध्ये १०० टक्के अनुदानावर शेतीला कुंपण देण्याची मागणी करण्यात आली आहे.
🟦 वन्यप्राण्यांमुळे होणाऱ्या नुकसानीस तात्काळ व वाढीव भरपाई द्या
बिबट्यांना जंगलात सुरक्षित राहू द्यावे, मात्र मानवी वस्तीतील बिबट्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी आंदोलकांची आहे.
तसेच वन्यप्राण्यांकडून होणाऱ्या शेती पिकांच्या नुकसानीची भरपाई वाढवून ती देण्याची कार्यपद्धती सुलभ करावी, अशीही प्रमुख मागणी आंदोलनात करण्यात आली आहे.
📍 आंदोलनाची माहिती
🗓 दिनांक : ३१ डिसेंबर
⏰ वेळ : रात्रभर
📌 स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय, अहिल्यानगर
📞 संपर्क :
९४२२०८३२०६ / ९४२१४४००८२

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button