Letest News
रामनवमी २०२६ : साईभक्तांच्या पदयात्रेत कीर्तन-प्रवचनांची भक्तीमय मेजवानी #AshokKharat #ShirdiConnection #शिर्डीतून उघड झाला भोंदू साम्राज्याचा काळा खेळ अंधश्रद्धेच्या आडून ल... गुढीपाडवा विशेष : साईनगरीत भक्तीचा महापूर! शिर्डीत आज आणि उद्या दिवसभर धार्मिक कार्यक्रमांची मेजवानी शिर्डीत ‘कॅप्टन’ खरातचे जाळे! चाहत्यांपासून कोट्यवधींच्या साम्राज्यापर्यंत – अटकेनंतर खळबळ शिर्डीहून परतणाऱ्या भाविकाला चाकूचा धाक दाखवून लूट-श्रीरामपुरात दोन आरोपी जेरबंद शिर्डीत गॅसचा काळाबाजार? घरगुती सिलेंडरचा हॉटेलमध्ये सर्रास वापर- ९०० रुपयांचा सिलेंडर २ हजारात विक्... साई एम्प्लॉईज सोसायटीचे कार्य ठरले आदर्श-गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शिधावाटप कार्यक्रम उत्साहात कृषी क्षेत्र देशाच्या अन्नसुरक्षा व आर्थिक स्थैर्याचा आधारस्तंभ – राज्यपाल जिष्णू देव वर्मा ६०-७० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या नागरिकांची घरे तोडू नयेत-सातबारा देण्याची मागणी शिर्डीत हरवलेले मोबाईल शोधून देण्यात पोलिसांचे कौतुकास्पद काम
अ.नगरक्राईम

अंत्यविधी की रॅली? देशद्रोही बंटी जहागीरदारच्या अंत्यविधी आड गुन्हेगारीचे शक्तीप्रदर्शन

श्रीरामपूर | दैनिक साई दर्शन
हा अंत्यविधी होता की गुन्हेगारीची रॅली?
हा शोकसोहळा होता की दहशतीचे उघड प्रदर्शन?
देशविघातक कृत्यांचे आरोप असलेल्या बंटी जहागीरदारच्या अंत्यविधीला जमलेला प्रचंड जमाव पाहता, संपूर्ण श्रीरामपूरमध्ये हाच संतप्त सवाल उपस्थित झाला आहे. गोळीबारासारख्या गंभीर गुन्ह्यानंतरही आरोपीच्या अंत्यविधीत शक्तीप्रदर्शन, जमावबाजी, भीतीचे वातावरण निर्माण होणे म्हणजे कायद्याला थेट आव्हान असल्याचा आरोप आता उघडपणे होत आहे.
या संपूर्ण प्रकाराचा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी थेट उल्लेख करत तीव्र शब्दांत समाचार घेतला.
“श्रीरामपूर गोळीबारानंतर देशविघातक कृत्य करणाऱ्या आरोपीच्या समर्थनार्थ जमणारा जमाव समाजासाठी अत्यंत घातक आहे. गुन्हेगारी मानसिकतेचे उदात्तीकरण कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाही,” असा कडक इशारा त्यांनी दिला.
बंटी जहागीरदार याच्यावर गंभीर गुन्ह्यांचे आरोप असताना, त्याच्या अंत्यविधीला मोठ्या प्रमाणात लोक जमणे, काही ठिकाणी घोषणाबाजी, तर काही ठिकाणी दहशत निर्माण करणारे दृश्य पाहायला मिळणे, हा सामान्य नागरिकांच्या सुरक्षेवर थेट घाला असल्याचे बोलले जात आहे.
हा प्रकार केवळ एका व्यक्तीच्या मृत्यूनंतरचा शोक नसून,
👉 गुन्हेगारांना नायक ठरवण्याचा प्रयत्न,
👉 गुन्हेगारीला सामाजिक मान्यता देण्याचा धोका,
👉 तरुण पिढीला चुकीचा संदेश
असे गंभीर परिणाम करणारा असल्याचा आरोप प्रशासन पातळीवरून होत आहे.
“गुन्हेगार कितीही कुख्यात असो, कितीही लोक त्याच्या मागे उभे राहिले तरी कायदा सर्वांसाठी समान आहे. गुन्हेगारांच्या समर्थनार्थ जमाव गोळा करणाऱ्यांवरही कारवाई केली जाईल,” असा थेट आदेश पालकमंत्र्यांनी पोलीस यंत्रणेला दिला आहे.
गुटखा, अवैध धंदे, अमली पदार्थांचा व्यापार आणि बेकायदेशीर शस्त्रांमधून उभ्या राहिलेल्या गुन्हेगारी साखळीमुळेच असे “अंत्यविधी की रॅली?” असे चित्र उभे राहत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यावर लगाम घालण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान, सीसीटीव्ही विश्लेषण, व्हिडीओ फुटेज तपासणी आणि विशेष पथके तात्काळ सक्रिय करण्याचे संकेत देण्यात आले आहेत.
या पार्श्वभूमीवर बंटी जहागीरदारच्या अंत्यविधीवेळी जमलेल्या जमावाची ओळख, सहभाग, घोषणाबाजी आणि कथित शक्तीप्रदर्शनाची सखोल चौकशी अटळ मानली जात असून, गुन्हेगारांना पाठबळ देणाऱ्या प्रवृत्तींवर मोठी कारवाई होण्याची दाट शक्यता आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button