Letest News
नगर–मनमाड रोडवरील बिअर शॉपी पुन्हा चर्चेत; बिअरची बाटली डोक्यात फोडली! चावडी-द्वारकामाईच्या मार्गासाठी दिशादर्शक फलकांची मागणी साईभक्त संतोष कोते यांचे संस्थानच्या कार्यका... पुणतांब्यात चांगदेव महाराजांच्या दर्शनासाठी दीड लाख भाविकांचा जनसागर! समृद्धी महामार्गावर आगीचा तांडव!मालट्रक-कंटेनरचे टायर फुटल्याने भीषण अपघात- वाहनाने घेतला पेट= एकाचा... पालखी सोहळ्यात दोन भाविक महिलांच्या सोनसाखळ्या लंपास! अयोध्या राममंदिरातील दानपेटी प्रकरणाच्या निषेधार्थ कोपरगावात शिवसेनेचे आंदोलन महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय-शिर्डी नगरपरिषदेला मिळाला परिविक्षाधीन मुख्याधिकारी! तीन किलोमीटर दूर श्रीराम मंदिर कशासाठी? साईभक्त डॉ. एस. बी. गोंदकर पाटील यांचा प्रांजळ आग्रह समता पतसंस्थेच्या बोगस खात्याप्रकरणी आरोपी अशोक खरात न्यायालयीन कोठडीत भाविकांच्या कथित आर्थिक फसवणुकीच्या तक्रारीनंतर दुकान सील मात्र गुन्हा दाखल न झाल्याने संताप
अ.नगरक्राईम

मोहम्मद पैंगबर त्यांच्याबाबत एवढ्या अश्लील भाषेत बोलताना या महाराजांना जराशी लाज वाटली नाही का?’ अमोल मिटकरी

रामगिरी महाराज यांनी मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल वादग्रस्त व्यक्तव्य केलं होतं. या वक्यव्यानंतर छत्रपती संभाजीनगर आणि अहमदनगर जिल्ह्यात लोक रस्त्यावर उतरले होते. यावेळी आंदोलकांनी रामगिरी महाराज यांच्या अटकेची मागणी केली होती. तसेच काही ठिकाणी दगडफेकीच्या घटनाही घडल्या होत्या. या सगळ्या घटनेबाबत बोलताना महायुती सरकारमधील आमदार अमोल मिटकरींनी त्यांच्यावर टीका करत कारवाईची मागणी केली आहे.बांग्लादेशमध्ये जे अत्याचार सुरू आहेत त्याचं कोणी समर्थन करत नाही. पण बांग्लादेशच्या अत्याचाराचा आणि भारताचा संबंध काय? कोण भारतातील वातावरण खराब करतंय.. कोणत्या मुसलमानाने हिंदू धर्माबाबत अपशब्द काढले आहेत? किंवा कोणत्या हिंदूने मुस्लिमांबाबत अपशब्द काढलेत.’आपण हिंदू धर्माचं तत्वज्ञान सांगत असताना.. हिंदू धर्मातील चांगल्या गोष्टी सांगा ना.. अशा पद्धतीने हजरत मोहम्मद पैंगबर.. जे इस्लाम धर्माचं श्रद्धास्थान आहे त्यांच्याबाबत एवढ्या अश्लील भाषेत बोलताना या महाराजांना जराशी लाज वाटली नाही का?’ अशा लोकांवर कायदेशीर वचक असला पाहिजे. कुठल्याही धर्माची विटंबना करताना.. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो हे या लोकांना माहीत असताना.. असे प्रकार करणं म्हणजे संन्यासाच्या वेषात गुंडागर्दी करण्याचा प्रकार आहे.’ तुकडोजी महाराजांच्या महाराष्ट्रात असे लफंगे महाराज (रामगिरी महाराज) जन्माला येणं.. मला असं वाटतं की, हे महाराष्ट्राचं दुर्दैवं आहे. स्वत: नाव रामगिरी ठेवताना यांना जरा जरी भान का राहिलं नाही?’ जे वक्तव्य केलं ते निंदनीय आहे. मी तर उलट म्हणेन की, अशा व्यक्तीची पाठराखण करू नये. देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली याला तात्काळ अटक करावी. जर एखाद्या धर्माबाबत बोलून दोन समाजामध्ये वितुष्ट निर्माण होत असेल तर या दंगलखोरीचं मूळ.. जसं मालेगावच्या दंगलखोरीचं मूळ होतं.. तसं या दंगलखोरीचं मूळ हा महाराज आहे का? अशा व्यक्तीवर ताबडतोब कारवाई केली पाहिजे.’ अशा शब्दात अमोल मिटकरी यांनी रामगिरी महाराज यांच्यावर टीका केली आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button