Letest News
खाकीतील कर्तव्यनिष्ठ नेतृत्वाचा गौरव शिर्डी विभागाचे पोलीस उपविभागीय अधिकारी अमोल भारती साहेबांचा वा... अनैतिक देहव्यापारावर पोलिसांचा कडक घावश्रीरामपुरातील ‘आदर्श लॉज’ एक वर्षासाठी बंद-लॉज सील शिर्डीत साईभक्तांची लूट थांबली नाही! विखे पिता–पुत्रांच्या सूचनांना एजंटांची हरताळ? साईनगरीत बालशोषणावर कडक घाव! भिक्षा आणि विक्रीसाठी वापरल्या जाणाऱ्या १४ अल्पवयीन बालकांची सुटका राज्यातील शासकीय रुग्णालयांत मोफत उपचारांना ब्रेक! आता उपचारांसाठी रुग्णांना मोजावे लागणार पैसे शिर्डीत मध्यरात्री थरार! ‘झिंग्या गँग’चा तरुणावर जीवघेणा हल्ला शिर्डीच्या मातीचा जागतिक झेंडा! ‘Future IP Leader Award’ने गौरव लोकचंदानी यांचा सन्मान 24 तासांत न्याय! कर्तव्यदक्ष कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांची कणखर व निर्भय कारवाई दबावाला न ज... अहिल्यानगरमध्ये कारवाई… शिर्डीत कधी? ब्लॅक फिल्मविरोधात ४५८ वाहनांवर दंड-नागरिकांचा सवाल तीन पत्ती तिरट जुगार खेळणारे ६ जण ताब्यात-रोख रक्कम-मोबाईल व दुचाकी जप्त
राजकीयशिर्डी

परिवर्तनाच्या प्रवासातील प्रत्येक सहकाऱ्याचे मनःपूर्वक आभार – सौ. जयश्री विष्णू थोरात यांचे भावनिक निवेदन

शिर्डी, दि.–
नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारयात्रेला आज मतदानाची सांगता झाली असताना, महायुतीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ. जयश्री विष्णू थोरात यांनी आपल्या कार्यकर्त्यांप्रति आणि नागरिकांप्रति मनापासून कृतज्ञता व्यक्त करणारे भावनिक निवेदन जारी केले.

sai nirman
जाहिरात

“या संपूर्ण प्रचार काळात माझ्यासोबत घरोघरी फिरत, खांद्याला खांदा लावून या परिवर्तनाच्या प्रवासात सहभागी झालात, त्या प्रत्येक साथीदाराचे मनःपूर्वक आभार,” अशा शब्दांत सौ. थोरात यांनी आपल्या कार्यकर्त्यांप्रति विशेष प्रेम व्यक्त केले. मागील काही आठवड्यांपासून त्यांनी प्रत्येक प्रभागात जाऊन नागरिकांच्या समस्या, अपेक्षा आणि विकासाची दिशा जाणून घेतली होती. या संपूर्ण प्रवासात त्यांना मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद आणि जनतेचा सहभाग हेच त्यांच्या उत्साहाचे खरे बळ असल्याचे त्या म्हणाल्या.

आजच्या मतदानानंतर सौ. जयश्री थोरात यांनी नागरिकांना विश्वास दिला की, “निकाल काहीही असो, लोकसेवेचा माझा संकल्प आणि प्रामाणिकपणा तसाच कायम राहील.” जनतेच्या आशीर्वादाने आणि कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमामुळे परिवर्तनाचा मार्ग अधिक दृढ झाल्याचेही त्या म्हणाल्या.

DN SPORTS

प्रचारादरम्यान महिलांनी, युवकांनी, ज्येष्ठ नागरिकांनी आणि सर्व समाजघटकांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल त्यांनी मनापासून कृतज्ञता व्यक्त केली. त्या पुढे म्हणाल्या, “शिर्डीच्या सर्वांगीण विकासासाठी, स्वच्छ-सुरक्षित आणि सुसंस्कृत शहरासाठी मी सदैव तत्पर राहीन.”

निवेदनाच्या शेवटी सौ. थोरात यांनी सर्वांना पुन्हा एकदा मनःपूर्वक धन्यवाद देत आश्वासन दिले की, जनतेचा विश्वास हीच त्यांची खरी जमेची बाजू आहे आणि भविष्यातही त्या त्याच निष्ठेने सार्वजनिक जीवनात कार्यरत राहतील.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button