Letest News
नगर-मनमाड महामार्गाची साडेसाती संपणार कधी? सहा वर्षांत तीन कंत्राटदार बदलले तरी लोकप्रतिनिधींचे मौन ... तोतया पत्रकारांची धाड की खंडणीचा डाव? महिलेकडे मागितले तब्बल एक लाख! ग्रामपंचायत अधिकाऱ्याची १० हजारांची लाच मागणी ५ हजार घेताना ACBच्या जाळ्यात! साईबाबांच्या बदनामीकारक व्हिडीओंना चाप बसणार! दिल्ली उच्च न्यायालयाचे GAC ला दणका शिर्डीत १३ ते २१ ऑगस्टदरम्यान साईसच्चरित पारायण सोहळा! धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल मंत्र्यांचे राजकारण वाढले-मंत्र्यांच्या तिसऱ्या पिढ्या सत्तेत-२० वर्षे रस्त्याची वाट लागली-मंत्री-मह... कर्करोग रुग्णांसाठी शिर्डीत मोफत हाडांची तपासणी श्री साईनाथ रुग्णालयात १५ ऑगस्टला विशेष शिबिर कमरेला १० इंची कोयता-लोकरे जेरबंद-शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल-वृंदावन हॉटेल येथे शिर्डी पोलिसांच... नगर–मनमाड रोडवरील बिअर शॉपी पुन्हा चर्चेत; बिअरची बाटली डोक्यात फोडली! चावडी-द्वारकामाईच्या मार्गासाठी दिशादर्शक फलकांची मागणी साईभक्त संतोष कोते यांचे संस्थानच्या कार्यका...
Blog

सावधान ! स्वयंपर घोषित पत्रकार आणि चॅनेल संचालकांकडून शिर्डी ग्रामस्थांना ब्लॅकमेलिंगचा विळखा पत्रकार : राजेंद्र भुजबळ

लोकशाहीचा चौथा स्तंभ मानली जाणारी पत्रकारिता आज काही ठिकाणी धर्माऐवजी धंदा बनली आहे. साईबाबांच्या पवित्र शिर्डीत सध्या काही स्वयंघोषित पत्रकार आणि लोकल चॅनेल्सनी आपले “पत्रकार” पद हे ब्लॅकमेलिंगचे साधन बनवले आहे. समाजात नाव, प्रसिद्धी आणि पैशासाठी हे लोक साईनगरीतील सर्वसामान्य नागरिक, व्यावसायिक, तसेच लहान अधिकारी वर्गालाही वेठीस धरत आहेत.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


🔹 बाहेरील तालुक्यातील तरुणाचा शिर्डीत धुमाकूळ

एक बाहेरील तालुक्यातील तरुणाने शिर्डीत स्थानिक व्यक्तीला हाताशी धरून लोकल चॅनेल सुरू केले. सुरुवातीला त्याने पत्रकारितेचा धर्म जोपासला असला तरी, काळाच्या ओघात त्याचा हेतू बदलला. जिल्ह्यातील प्रतिनिधी पदासाठी १० ते १५ हजार रुपये घेण्याचे व्यवहार सुरू झाले. काही ठिकाणी तर अवैध धंदेवाले आणि गुन्हेगारांशी हातमिळवणी करून महिन्याचा हप्ता मागण्याचे प्रकार उघडकीस आले आहेत.


🔹 ब्लॅकमेलिंग, दारू, व्येशाव्यवसाय आणि मध्यस्थीचा काळा व्यवसाय

याच चॅनल्सचे काही संचालक शिर्डीत अवैध दारू पुरवठा, गुटखा तस्करी, तसेच काही संवेदनशील गुन्ह्यांमध्ये मध्यस्थी करून लाखो रुपये उकळतात. इतकेच नव्हे, तर महिलांवर विनयभंगाच्या गुन्ह्यांत अडकलेले काही संचालक आजही “पत्रकार” म्हणून फिरत आहेत. त्यांच्याकडे महागड्या गाड्या, प्रॉपर्टी, परदेश प्रवास — हे सर्व एका दशकात कसे शक्य झाले हा शिर्डीकरांचा मोठा प्रश्न आहे.


🔹 साईबाबांच्या पवित्र नगरीत अशा मंडळींना ‘VIP’ दर्जा का ?

या मंडळींची धाडस इतकी वाढली आहे की, ते साई संस्थानच्या कर्मचाऱ्यांसोबत परदेशात मौजमजा करतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर दाखवतात. आणि तरीही त्यांना VIP दर्शन पास, आरती प्रवेश आणि विशेष वागणूक दिली जाते — हे ग्रामस्थांच्या मनात संताप आणि प्रश्न निर्माण करणारे आहे. “सत्य बोलणारे पत्रकार वंचित, आणि ब्लॅकमेल करणारे VIP का?” हा आवाज आता गावोगाव उठू लागला आहे.


🔹 प्रशासन आणि राजकारणातील काहींचे मौन संशयास्पद !

प्रशासनाकडून अशा लोकांवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी ग्रामस्थांनी अनेक वेळा केली, मात्र आतापर्यंत कुठलाही ठोस निर्णय घेतलेला नाही. यामुळे शिर्डीतील सर्वसामान्य जनतेत नाराजी पसरली आहे. काही राजकीय नेते आगामी निवडणुकीसाठी अशा व्यक्तींना साथ देत आहेत, असे आरोपही होत आहेत.


🔹 शिर्डीकरांचा निर्धार — “सत्य आणि प्रामाणिकपणा यालाच प्राधान्य!”

शिर्डीकर आता जागे झाले आहेत. “या साईंच्या दरबारात खोटं टिकणार नाही,” असा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे. अशा ब्लॅकमेल करणाऱ्या, खोट्या पत्रकारांचा बुरखा फाडण्याची वेळ आली आहे, असा सूर ग्रामपंचायतीपासून ते साईभक्तांपर्यंत सर्व स्तरातून उमटू लागला आहे.


थेट सवाल :

“अशा भामट्यांना उमेदवारी देणार का?
त्यांना VIP मान देणाऱ्यांना उत्तर द्यावेच लागेल!”


भक्ती, सेवा आणि प्रामाणिकतेसाठी ओळखली जाणारी शिर्डी नगरी आज काही खोट्या चेहऱ्यांच्या सावटाखाली आहे. पण जनता जागरूक झाली तर अशा ब्लॅकमेलिंग साम्राज्याचा शेवट अटळ आहे — आणि साईंच्या दरबारात फक्त सत्यच विजयी होईल! 🙏

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button