Letest News
शिर्डीत भक्तिरसाचा महापर्व! साई–हरी नामाचा सार्वजनिक कीर्तन सोहळा ५०व्या वर्षात — शिर्डी पंढरपूरमय मतदानाच्या दिवशी शिर्डी आठवडे बाजार बंद ठेवण्याचा निर्णय-मतदान प्रक्रियेला अडथळे टाळण्यासाठी प्रशासन... प्रचाराचा शेवटचा दिवस…आणि शिर्डीतले वातावरण अक्षरश धगधगतंय! कारण या निवडणुकीत एकच नाव वाऱ्यासारखं पस... अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय श्रीरामपूर पथकाची धडक कारवाई-गावठी कट्टा विक्रीसाठी दोन इसमांचा पर्दाफा... राहाता शहरात बदलाची गर्जना-घराणेशाही-भ्रष्ट राजकारणाचा पर्दाफाश – नागरिकांचा रोष उफाळला 55 कोटींचा महाघोटाळा —तेच लोक आज राजकारणात मोठ्या खुर्च्या घेण्यासाठी धाव घेतायत.- लोकांना फसवणारे ह... प्रभाग २ क मध्ये ‘सक्षम प्रभाग – विकसित प्रभाग’चा नवा आवाज किटली चिन्हाचे उमेदवार सतीश उर्फ नंदू गों... अहिल्यानगर जिल्ह्यात मोठा बदल : 12 पैकी 4 नगरपरिषद निवडणुका पुढे ढकलल्या — कोर्टातील अपीलचा परिणाम प्रभाग १ ब मध्ये परीवर्तनाची लाट — अॅड. प्रतिक शेळके अग्रस्थानी ‘बॅट’ चिन्हावर मतदारांचा विश्वास — श... तीन दिवस तळीरामांचे ‘दिवे लागले’ — जिल्हाधिकाऱ्यांचा कोरडा दिवस आदेश जाहीर मतदान मतमोजणी आणि मतदानाप...
क्राईमशिर्डी

सावळीविहीर बुद्रुक आठवडे बाजारात गर्दीचा फायदा घेत मोबाईल, दागिने, मोटरसायकल वर भामटे मारतात डल्ला!

राहाता तालुका प्रतिनिधी
(दिगंबर कोते)–
राहाता तालुक्यातील
सावळीविहीर बुद्रुक हे गाव नगर मनमाड या महामार्गाच्या कडेला तसेच सात-आठ आसपासच्या गावचे व्यापारी केंद्र आहे. त्यामुळे सावळीविहीर बुद्रुक येथे दर गुरुवारी आठवडे बाजार भरतो.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

मात्र या आठवड्या बाजारात अनेकदा मोबाईल, मोटरसायकल ,महिलांचे दागिने यांच्या चोऱ्या होत असून येथे सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत किंवा कोणतीही सुरक्षा व्यवस्था नाही व बाजार करू साठी साधे पिण्याचे पाणी सुद्धा नाही. तरी सावळी विहीर बुद्रुक येथील आठवडे बाजारा मध्ये पावत्या गोळा करून पैसे वसूल केले जातात मात्र सुविधा पुरवल्या जात नाही .त्यामुळे बाजारकरू त्याचप्रमाणे व्यावसायिक ,विक्रेते शेतकरी यांच्यामधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.


यासंदर्भात अधिक माहिती अशी की राहता तालुक्यातील सावळीविहीर बुद्रुक या मोठ्या गावामध्ये दर गुरुवारी आठवडे बाजार भरतो. परिसरातून वाड्यावर त्या व इतर गावातून येथे शेतकरी भाजीपाला घेऊन येतात व्यापारी येतात व
बाजारकरू येतात ‌.येथे बाजार तळ आहे .या बाजार तळावर अनेक शेतकरी व्यावसायिक दुकानदार विक्रीते आपला माल घेऊन विक्रीसाठी बसत असतात.

पण या बाजार तळात गर्दीचा फायदा घेत अनेकदा गुरुवारी आठवडे बाजारात बाजारासाठी येणाऱ्या महिलांच्या गळ्यातील दागिने चोरीस गेलेले आहे. त्याचप्रमाणे अनेकांचे मोबाईल येथून चोरी जातात मोटरसायकल चोरी जातात .मात्र बाजार तळामध्ये त्यासाठी कोणतीही सुरक्षा व्यवस्था केली गेली नाही.

बाजारतळात सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत. जे आहे ते कधी चालू तर कधी बंद असतात. त्याचप्रमाणे नगर मनमाड रस्त्याच्या कडेला सुद्धा मोठ्या प्रमाणात व्यापारी शेतकरी भाजीपाला घेऊन बसतात. त्यामुळे अनेकदा वाहतूक कोंडी होते. अपघात होण्याची मोठी शक्यता असते. मात्र या सर्व गोष्टींकडे येथील ग्रामपंचायत दुर्लक्ष करत असून दर गुरुवारी मात्र आठवडे बाजार वसूल केला जातो.

दरवर्षी मार्च महिन्यात या आठवड्यात बाजारच्या वसुलीचे टेंडर दिले जाते. मात्र त्या संदर्भात कोणतेही वृत्तपत्रात किंवा जाहिरात केली जात नाही. आपल्या मर्जीतल्या व्यक्तीला बाजार वसुलीसाठी नियुक्त केले जाते. त्यामुळे येथे जर गुरुवारी आठवडा बाजारात फक्त वसुली होते मात्र बाजारकरू किंवा ग्राहक विक्रेते व्यावसायिक यांना कोणतीही सुविधा ग्रामपंचायत कडून उपलब्ध होत नाही.

अनेकदा येथून मोबाईल, मोटरसायकल चोरी गेलेल्या असतानाही त्याचा तपास लागलेला नाही. त्यामुळे येथील विक्रीते, ग्राहक ,बाजारकरू यांच्यामधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. ज्यांना आठवडे बाजार वसूल करण्याचे टेंडर दिले आहे त्यांनी किंवा ग्रामपंचायतीने या बाजारतळामध्ये सोयी सुविधा निर्माण कराव्यात ,पिण्यासाठी स्वच्छ पाणी, सार्वजनिक शौचालय, तसेच येथे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत.

व बाजारात एखाद्या कारणावरून वाद झाला तर तो मिटवण्यासाठी ग्रामपंचायत मध्ये दर गुरुवारी तक्रार निवारण कक्ष निर्माण करावा. असे अनेक मागण्या बाजारकरू, विक्रेते, ग्राहक यांच्या मधून होत आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button