Letest News
अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय श्रीरामपूर पथकाची धडक कारवाई-गावठी कट्टा विक्रीसाठी दोन इसमांचा पर्दाफा... राहाता शहरात बदलाची गर्जना-घराणेशाही-भ्रष्ट राजकारणाचा पर्दाफाश – नागरिकांचा रोष उफाळला 55 कोटींचा महाघोटाळा —तेच लोक आज राजकारणात मोठ्या खुर्च्या घेण्यासाठी धाव घेतायत.- लोकांना फसवणारे ह... प्रभाग २ क मध्ये ‘सक्षम प्रभाग – विकसित प्रभाग’चा नवा आवाज किटली चिन्हाचे उमेदवार सतीश उर्फ नंदू गों... अहिल्यानगर जिल्ह्यात मोठा बदल : 12 पैकी 4 नगरपरिषद निवडणुका पुढे ढकलल्या — कोर्टातील अपीलचा परिणाम प्रभाग १ ब मध्ये परीवर्तनाची लाट — अॅड. प्रतिक शेळके अग्रस्थानी ‘बॅट’ चिन्हावर मतदारांचा विश्वास — श... तीन दिवस तळीरामांचे ‘दिवे लागले’ — जिल्हाधिकाऱ्यांचा कोरडा दिवस आदेश जाहीर मतदान मतमोजणी आणि मतदानाप... राहाता नगरपरिषद : “जनतेच्या पैशावर डल्ला मारणाऱ्यांना झाडू घेऊन हद्दपार करा!” — रामनाथ सदाफळ (आप) सुनील निवृत्ती पाटील शिंदे यांचा प्रचंड दावा : “प्रभाग २ मध्ये नंदूभाऊंचा विजय ठरलेलाच… विरोधकांची ब... एआय बनावट वन्यप्राणी व्हिडिओवाल्यांना थेट जेल — एसपी सोमनाथ घार्गे यांची कडक सूचना”
अ.नगरराजकीय

आणीबाणीमध्ये कारावास भोगलेल्या संघर्षयात्रींचा उपजिल्हाधिकारी गिते यांच्या हस्ते गौरव

अहिल्यानगर, दि.२५- देशात आणीबाणी लागू झालेल्या घटनेस ५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने आणीबाणीत कारावास भोगलेल्या जिल्ह्यातील संघर्षयात्रींचा निवासी जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात एका विशेष कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वाक्षरीचे गौरवपत्र, गुलाबपुष्प देवून गौरव करण्यात आला.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

 यावेळी तहसीलदार (सामान्य प्रशासन) शरद घोरपडे, तहसीलदार श्री.सबनीस, प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी सुरेश पाटील, माहिती अधिकारी अमोल महाजन, विजय जोशी, विजय वहाडणे, राजाभाऊ मुळे आदी उपस्थित होते. 

यावेळी विजय जोशी, विजय वहाडणे व राजाभाऊ मुळे यांनी मनोगत व्यक्त केले. आणीबाणी विरोधात लढा देणाऱ्या संघर्षयात्रींचा शासनाने सन्मान करुन कृतज्ञता व्यक्त केल्याबाबत त्यांनी राज्य शासनाचे आभार व्यक्त केले.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते म्हणाले, देशात आणीबाणी लागू झाल्याच्या घटनेस ५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने आणीबाणीत कारावास भोगलेल्या व्यक्तींचा व त्यांच्या वारसांचा सत्कार करण्यात येत असल्याचे सांगत  सन्मानपत्रामध्ये असलेल्या मजकुराचे त्यांनी यावेळी वाचनही केले. 

आजच्या या सत्कार सोहळ्यास अनेक वयोवृद्ध व्यक्ती उपस्थित होत्या. जिल्हा प्रशासनाच्यावतीने त्या व्यक्तींचा जागेवर जाऊन त्यांचा सन्मान केला.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button