Letest News
रामनवमी २०२६ : साईभक्तांच्या पदयात्रेत कीर्तन-प्रवचनांची भक्तीमय मेजवानी #AshokKharat #ShirdiConnection #शिर्डीतून उघड झाला भोंदू साम्राज्याचा काळा खेळ अंधश्रद्धेच्या आडून ल... गुढीपाडवा विशेष : साईनगरीत भक्तीचा महापूर! शिर्डीत आज आणि उद्या दिवसभर धार्मिक कार्यक्रमांची मेजवानी शिर्डीत ‘कॅप्टन’ खरातचे जाळे! चाहत्यांपासून कोट्यवधींच्या साम्राज्यापर्यंत – अटकेनंतर खळबळ शिर्डीहून परतणाऱ्या भाविकाला चाकूचा धाक दाखवून लूट-श्रीरामपुरात दोन आरोपी जेरबंद शिर्डीत गॅसचा काळाबाजार? घरगुती सिलेंडरचा हॉटेलमध्ये सर्रास वापर- ९०० रुपयांचा सिलेंडर २ हजारात विक्... साई एम्प्लॉईज सोसायटीचे कार्य ठरले आदर्श-गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शिधावाटप कार्यक्रम उत्साहात कृषी क्षेत्र देशाच्या अन्नसुरक्षा व आर्थिक स्थैर्याचा आधारस्तंभ – राज्यपाल जिष्णू देव वर्मा ६०-७० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या नागरिकांची घरे तोडू नयेत-सातबारा देण्याची मागणी शिर्डीत हरवलेले मोबाईल शोधून देण्यात पोलिसांचे कौतुकास्पद काम
अ.नगरराजकीय

मी 14 वर्ष सन्यास भोगला मला त्रास देणारेच घरी बसले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण

शिर्डी : “काँग्रेस नेत्यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे की, एवढी दयनीय अवस्था कशी झाली. मी राज्याचे नेतृत्व करत असताना 82 जागा निवडून आणल्या होत्या. त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांनी 82 जागांच्या 42 जागा केल्या. आता नाना पटोलेंनी 42 वरून 16 जागा आणल्या. त्यामुळे त्याचं आकलन काँग्रेसच्या नेत्यांनी केलं पाहिजे,” अशी खरमरीत टीका माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसवर शिर्डीत केलीय.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

यावेळी त्‍यांची कन्‍या नवनर्वाचित आमदार श्रीजया चव्‍हाण उपस्थित होत्‍या. दर्शनानंतर साईबाबा संस्‍थानच्या वतीनं मंदिर प्रमुख विष्‍णु थोरात आणि जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके यांनी त्‍यांचा साई मूर्ती तसंच शाल देवून सत्‍कार केला. साई दर्शनानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना अशोक चव्हाण यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केलीय.चौदा वर्षे मी वनवास भोगला – मला त्रास देणारे घरी बसले या वक्तव्यावर बोलताना चव्हाण म्हणाले,

“शेवटी मी ही मनुष्य आहे. मलाही भावना आहेत. ज्या पद्धतीने मी चौदा वर्षे वनवास भोगला. मला कोणाही विषय राग नाहीये मी साईबाबांचा भक्त असल्याने कोणावरही विनाकारण टीका करणे माझा उद्देश नाही. परंतु मला भावना आहेत. त्यामुळे मी रागाच्या भरात बोललो असेल. त्यामुळे त्यांनी मनावर न घेता राजकारणात हार जीत होत असते, हे लक्षात ठेवावं. मात्र त्यांनी आत्मपरीक्षण करायला हवय असंही माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण म्हणाले.

एकनाथ शिंदे मोठ्या मनाचे – दोन अडिच वर्ष मुख्यमंत्री पद भोगल्यानंतर साहजीकच आहे काहीसं मनामध्ये दुःख होत असतं. मात्र एकनाथ शिंदे हे कुठेही नाराज नसल्याचं दिसून येतय. त्यांनी मोठ्या मनाने महायुतीच्या सरकार स्थापनेमध्ये कोणत्याही प्रकारचा आडथळा निर्माण होणार नाही असं सांगितलं आहे.

संजय राऊत यांनी आमची चिंता करु नये – संजय राऊत यांनी आमची चिंता करण्यापेक्षा त्यांच्या जागा कमी झाल्या त्याबद्दल त्यांना काय वाटतय यावर अधिक भाष्य करणं योग्य राहील. आमच्या सरकारमध्ये कोणाला कोणतं मंत्री पद मिळणार यांची चिंता त्यांनी करु नये काँग्रेसचा राडीचा डाव सुरू – काँग्रेसनं आताच रडीचा डाव सुरू केलाय. 2029 मध्येही ते निवडून येणार नाहीत असं दिसत. त्यामुळे त्यांनी पराभवाचं खापर इव्हीएमवर फोडण्यास सुरवात केली असल्याची टीकाही चव्हाण यांनी केलीय.

राज्यसभेवर येण्या इतपत संख्या बळ नाही – राज्यसभेत येण्याइतपत तरी विरोधकांकडे संख्याबळ असलं पाहिजे. सर्व विरोधक मिळून 40-46 जागा आहेत. त्यात कोणाला राज्यसभा द्यायची हा प्रश्न येईल. राज्यसभेचा उमेदवार निवडून आणण्यासाठी देखील विरोधकांकडे संख्याबळ नाही. त्यामुळे राज्यसभेचा उमेदवार देखील निवडून येवू शकत नाही. एकाला दरवेळी संधी द्यावी लागले अशी स्थिती सध्या विरोधकांची झाली असल्याची टीका यावेळी अशोक चव्हाण यांनी केलीय.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button