Letest News
साईनामाशी नातं असलेली ज्येष्ठ व्यक्ती हरपली-आशालता ताई नागरे यांच्या निधनाने शिर्डीत शोककळा रामनवमी उत्सवात ‘रिल’चा स्फोट शिर्डीची बदनामी करणाऱ्यावर गुन्हा ‘लाचखोरीचा स्फोट!’ — शिर्डीचे प्रांत सीताराम गायकर यांचे जावई लाचखोर गोविंद शिंदे यास दिवस पोलीस कोठ... ‘रॉकेल आहे… पण स्टोव्ह नाही!’ शिर्डीत नागरिकांची अक्षरशः कोंडी लक्ष्मीनगर अतिक्रमण प्रश्न तापला- शिर्डी प्रशासनाची मोठी हालचाल-स्थळपाहणी व चौकशीचे आदेश- तहसीलदारां... शिर्डीचा भूमिपुत्र निहार गीते पुन्हा झळकणार रुपेरी पडद्यावर-‘बेवारस’मधून साकारणार महत्त्वाची भूमिका “दारू पाजून काळी आई लुटली?” कॅप्टन खरातवर कोट्यवधींच्या जमिनीचा डल्ला-शिर्डीत संतापाचा ज्वालामुखी! साईनगरीत प्रामाणिकतेचा आदर्श-सुरक्षा व आरोग्य कर्मचाऱ्यांची ईमानदारी ठरली कौतुकास्पद! शिर्डीतून मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचा इशारा- भोंदूबाबा खरात प्रकरणात “कठोर कारवाई अटळ!” मोठी राजकीय खळबळ! रुपाली चाकणकर यांचा राजीनामा-खरात प्रकरणाचा मोठा परिणाम
राजकीयशिर्डी

ShirdiNews #RickshawIssue#शिर्डीत मीटरविना रिक्षांचा हैदोस-साईभक्तांची सर्रास लूट – प्रशासन झोपेत का?

शिर्डी :
राज्यात ऑटो रिक्षा व मीटर टॅक्सी चालकांच्या कल्याणासाठी शासन विविध योजना राबवत असताना साईनगरी शिर्डीत मात्र पूर्णपणे उलट चित्र पाहायला मिळत आहे. येथे शेकडो रिक्षा मीटरशिवायच धावत असून साईभक्तांकडून उघडपणे मनमानी भाडे उकळून त्यांची सर्रास लूट केली जात असल्याचा गंभीर आरोप होत आहे. विशेष म्हणजे ही लूट सर्वांसमोर सुरू असतानाही संबंधित प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


दररोज हजारो साईभक्त शिर्डीत दर्शनासाठी येत असतात. रेल्वे स्थानक, बसस्थानक, मंदिर परिसर आणि शहरातील प्रमुख चौकांमध्ये रिक्षाचालकांकडून मीटर न लावता थेट भाविकांशी घासाघीस करून भाडे आकारले जात असल्याचे चित्र आहे. काही ठिकाणी अवघ्या काही अंतरासाठी 200 ते 500 रुपयांपर्यंत भाडे मागितले जात असल्याच्या तक्रारी भाविकांकडून होत आहेत.
नियमांनुसार प्रत्येक ऑटो रिक्षामध्ये मीटर बसविणे बंधनकारक आहे.

मात्र शिर्डीत अनेक रिक्षांमध्ये मीटरच नसल्याचे उघडपणे दिसत आहे. इतकेच नव्हे तर काही रिक्षा परवाना, नोंदणी किंवा अधिकृत कागदपत्रांशिवायच धावत असल्याचीही चर्चा शहरात आहे. त्यामुळे अधिकृत व नियम पाळणाऱ्या रिक्षाचालकांवर अन्याय होत असून त्यांची उपजीविकाही धोक्यात आली आहे.


शिर्डी हे आंतरराष्ट्रीय स्तरावरील धार्मिक पर्यटन स्थळ असताना अशा प्रकारे भाविकांची लूट सुरू असणे ही अत्यंत लाजिरवाणी बाब मानली जात आहे. परिवहन विभाग, पोलीस प्रशासन आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी संयुक्त कारवाई करून मीटरविना धावणाऱ्या तसेच बोगस रिक्षांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.


दरम्यान, राज्य शासन रिक्षाचालकांच्या कल्याणासाठी योजना राबवत असताना शिर्डीत मात्र नियमांची उघडपणे पायमल्ली होत असताना प्रशासन का गप्प आहे? असा संतप्त सवाल नागरिक व साईभक्तांकडून उपस्थित केला जात आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button