Letest News
चेंबूर के साईभक्त प्रताप गंगवानी और शिर्डीके सुपुत्र राजेश टिक्यानी शोभा राजेश जाधवानी इनके श्रमसे स... ह.भ.प. संगीताताई पवार यांची हत्या जमिनीच्या वादातून झाल्याचं स्पष्ट चार संशयित आरोपींना अटक चेंबूर येथील प्रकाश गंगवाणी व शिर्डी येथील राजेश टिक्यानी शोभा राजेश जाधवानी यांच्या प्रयत्नाने श्री... निमगाव येथील पतसंस्थेच्या पैश्यांचा अपहर करणाऱ्या त्या संचालकांच्या प्रॉपर्टीवर बोजा चढवणार-सहकार खा... शिवराज्याभिषेक दिनानिमित्त महसूल समाधान शिबिरात १३६ दाखल्यांचे वाटप नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद उल्हासनगरच्या विजयचे शिर्डी येथून अपहरण वडिलांनी शिर्डी पोलीस स्टेशनला केला गुन्हा दाखल आर बी एल चौकात हाईट ब्यारिगेटला ट्रकची धडक सुदैवाने कोणास इजा नाही  आषाढी वारी सुरू असताना महिला किर्तनकाराची दगडाने ठेचून हत्या शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य पाईपलाईन मध्ये मोरीचे घाण पाणी सोडल्याने तिघांविरोधात गुन्हा दाखल  साईभक्ताची सापडलेली पर्स संस्थान कर्मचारी यांनी केली परत संस्थान कडून त्या कर्मचारीचे सन्मान
अ.नगरक्राईम

तलावात दोन संख्या बहिण भावाचा बुडून मृत्यू! परिसरात दुःख!

शिर्डी ( प्रतिनिधी)राहाता तालुक्यातील कोर्‍हाळे येथील भांबारे मळ्यातील साठवण तलाव निळवंडेच्या पाण्याने नुकताच भरला असून या तलावात 21 मे बुधवारी रोजी दुपारी 2 सख्ख्या बहिण भावाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली असून या घटनेने परिसरातील हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


या संदर्भात सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, मल्हारवाडी शिवारात राहत असलेल्या प्रशांत डोशी यांची मुले साहिल प्रशांत डोशी (वय 12, इयत्ता 6 वी) आणि दिव्या प्रशांत डोशी ( वय 15, इयत्ता 10 वी) ही निळवंडेच्या पाण्याने भरलेल्या साठवण तलावात पाणी पाहण्यासाठी गेले असता साहीलचा पाय घसरुन तो पाण्यात पडला.

पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडू लागल्याने बहीण दिव्या हिने त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र तलावात पाण्याची खोली जास्त असल्याने दिव्याही पाण्यात बुडाली. दोघांचाही पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना स्थानिक युवकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी घटनेची माहिती मुलांचे वडील प्रशांत डोशी यांना दिली.

तोपर्यंत स्थानिक युवकांनी पाण्यात उड्या मारुन साहील व दिव्याचा शोध सुरु केला होता. स्थानिक युवकांनी या दोन्ही मुलांना पाण्यातून बाहेर काढले. त्यांना तात्काळ राहाता ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.


दोन दिवसापूर्वी या परिसरात तलावात निळवंडे कॅनॉलचे पाणी सोडण्यात आले. परंतु या मुलांना पाण्याचा अंदाज न आल्याने पोहण्यासाठी गेलेला या बहिण भावाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. व दुःख व्यक्त होत आहे.

सध्या ग्रामीण भागात शाळांना सुट्टी आहेत. अनेक लहान मुले मामांच्या गावाला गेली आहेत. तसेच काही घरी आहेत. अनेक ठिकाणी शेततळे तलाव ओढे नाले आहेत. विहीरी आहेत. मुले सुट्टीमुळे खेळतात. बागडतात. अनेकदा अशा घटना घडल्या आहेत. त्यामुळे शेततळे तलाव ओढे नाले आदी ठिकाणी मुलांना खेळण्यास प्रतिबंध करावा .पालकांनी मुलांकडे लक्ष द्यावे. धोक्याच्या ठिकाणी मुलांना मज्जाव करावा. असे आता नागरिकांकडून बोलले जात आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button