Letest News
अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय श्रीरामपूर पथकाची धडक कारवाई-गावठी कट्टा विक्रीसाठी दोन इसमांचा पर्दाफा... राहाता शहरात बदलाची गर्जना-घराणेशाही-भ्रष्ट राजकारणाचा पर्दाफाश – नागरिकांचा रोष उफाळला 55 कोटींचा महाघोटाळा —तेच लोक आज राजकारणात मोठ्या खुर्च्या घेण्यासाठी धाव घेतायत.- लोकांना फसवणारे ह... प्रभाग २ क मध्ये ‘सक्षम प्रभाग – विकसित प्रभाग’चा नवा आवाज किटली चिन्हाचे उमेदवार सतीश उर्फ नंदू गों... अहिल्यानगर जिल्ह्यात मोठा बदल : 12 पैकी 4 नगरपरिषद निवडणुका पुढे ढकलल्या — कोर्टातील अपीलचा परिणाम प्रभाग १ ब मध्ये परीवर्तनाची लाट — अॅड. प्रतिक शेळके अग्रस्थानी ‘बॅट’ चिन्हावर मतदारांचा विश्वास — श... तीन दिवस तळीरामांचे ‘दिवे लागले’ — जिल्हाधिकाऱ्यांचा कोरडा दिवस आदेश जाहीर मतदान मतमोजणी आणि मतदानाप... राहाता नगरपरिषद : “जनतेच्या पैशावर डल्ला मारणाऱ्यांना झाडू घेऊन हद्दपार करा!” — रामनाथ सदाफळ (आप) सुनील निवृत्ती पाटील शिंदे यांचा प्रचंड दावा : “प्रभाग २ मध्ये नंदूभाऊंचा विजय ठरलेलाच… विरोधकांची ब... एआय बनावट वन्यप्राणी व्हिडिओवाल्यांना थेट जेल — एसपी सोमनाथ घार्गे यांची कडक सूचना”
अ.नगर

कोपरागाव येथे दोन दिवसात चौघांचे निधन

कोपरगाव तालुक्यातील संवत्सर ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या लक्ष्मणवाडी येथील रहिवासी व ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच सांडुजी दगडू उगले (वय-८८) यांचेसह रमेश जनार्दन भाकरे (वय-६५) मारुती काकूंजी ग्राम (वय-९०),जैतूनबी महंमद शेख (वय-५५) आदी चार जणांचे दोन दिवसात निधन झाले आहे.त्यामुळे संवत्सर शिवारात शोककळा पसरली आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

कोपरगाव तालुक्यातील गोदावरी तीरी संवत्सर हे गाव असून त्यास मोठा धार्मिक वारसा आहे.येथील हद्दीत लक्ष्मणवाडी ही उपवाडी आहे.या ठिकाणी दोन दिवसात तीन पुरुष व एक महिला यांचे निधन झाले आहे.त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

यातील संवत्सर येथील ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच सांडुजी दगडू उगले यांचे आज दुपारी ०२ वाजता निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात तीन मुले,एक मुलगी,नातू पणतू असा परिवार आहे.ते शेती महामंडळाचे सेवानिवृत्त कर्मचारी होते.दरम्यान ते गोदावरी परजणे तालुका सहकारी दूध संघाचे कर्मचारी सिद्धार्थ उगले याचे पिताश्री होते.त्यांच्यावर आज सायंकाळी ०७ वाजता अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

दरम्यान दुसरा मृत्यू हा रमेश जनार्दन भाकरे यांचे निधन काल सकाळी ०९ वाजता झाले होते.यांचें निधन आज सकाळी झाले आहे.त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा,तीन मुली असा परिवार आहे.त्यांच्यावर आज सकाळी ११ वाजता गोदावरीतीरी अंत्यविधी शोकाकुल वातावरणात संपन्न झाला आहे.ते सेवानिवृत्त सैनिक अशोक भाकरे यांचे कनिष्ठ बंधू होते.नगर जिल्हा युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कृष्णा आढाव यांचे चुलते होते.

तिसरा मृत्यू हा लक्ष्मणवाडी येथील शेतमजूर मारुती काकूंजी ग्राम (वय-९०) यांचे आज दुपारी ०२ वाजता निधन झाले आहेत्यांच्या पश्चात पत्नी आहे.त्यांचाही अंत्यविधी आज सायंकाळी ०७ वाजता संपन्न होणार आहे.

दरम्यान याच उपवाडीच्या रहिवासी असलेल्या जैतूनबी महंमद शेख (वय-५५) यांचे काल निधन झाले होते.त्यांच्या पश्चात दोन मुले,तीन मुली,नातू,पणतू असा परिवार आहे.त्यांचा अंत्यविधी शोकाकुल वातावरणात संपन्न झाला आहे.

त्यांच्या निधनाबद्दल गोदावरी नामदेवराव परजणे तालुका सहकारी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे,संवत्सर येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच सुलोचना दिलीप ढेपले,उपसरपंच विवेक परजणे,पांडुरंग शिंदे (शास्त्री),बाळासाहेब दहे,बाजार समितीचे संचालक खंडू पाटील फेफाळे,ज्येष्ठ कार्यकर्ते लक्ष्मणराव साबळे,सहकार महर्षि शंकरराव कोल्हे साखर कारखान्याचे संचालक ज्ञानेश्वर परजणे,संचालक बापूसाहेब बारहाते,कर्मवीर शंकरराव काळे साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष दिलीप बोरनारे आदींनी दुःख व्यक्त केले आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button