Letest News
मंत्र्यांचे राजकारण वाढले-मंत्र्यांच्या तिसऱ्या पिढ्या सत्तेत-२० वर्षे रस्त्याची वाट लागली-मंत्री-मह... कर्करोग रुग्णांसाठी शिर्डीत मोफत हाडांची तपासणी श्री साईनाथ रुग्णालयात १५ ऑगस्टला विशेष शिबिर कमरेला १० इंची कोयता-लोकरे जेरबंद-शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल-वृंदावन हॉटेल येथे शिर्डी पोलिसांच... नगर–मनमाड रोडवरील बिअर शॉपी पुन्हा चर्चेत; बिअरची बाटली डोक्यात फोडली! चावडी-द्वारकामाईच्या मार्गासाठी दिशादर्शक फलकांची मागणी साईभक्त संतोष कोते यांचे संस्थानच्या कार्यका... पुणतांब्यात चांगदेव महाराजांच्या दर्शनासाठी दीड लाख भाविकांचा जनसागर! समृद्धी महामार्गावर आगीचा तांडव!मालट्रक-कंटेनरचे टायर फुटल्याने भीषण अपघात- वाहनाने घेतला पेट= एकाचा... पालखी सोहळ्यात दोन भाविक महिलांच्या सोनसाखळ्या लंपास! अयोध्या राममंदिरातील दानपेटी प्रकरणाच्या निषेधार्थ कोपरगावात शिवसेनेचे आंदोलन महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय-शिर्डी नगरपरिषदेला मिळाला परिविक्षाधीन मुख्याधिकारी!
अ.नगरराजकीय

मराठ्यांच्या मुलांच्या बाजूने बोलायचं शिका आणी खर बोलायच शिका जरांगेची विखेंवर् टिका

तुमच्यामुळे एक दिवशी जात मरेल.. लवकर शहाणे व्हा.. असा सल्ला मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी राधाकृष्ण विखे यांना दिला आहे. जातीवाद भुजबळ करत आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

राज्यात जे काही होतोय ते भुजबळ घडून आणत आहे, अशी टीका देखील मनोज जरांगेंनी यावेळी केली. ते माध्यामांशी बोलत होते.
मराठा समाजाचे आंदोलन भरकटत चालले आहे. मनोज जरांगे म्हणजे मराठा समाज नव्हे, अशी टीका राधाकृष्ण विखे पाटील यांनी मनोज जरांगेंवर केली.त्यावर आज मनोज जरांगेंनी आज प्रत्युत्तर दिले आहे.

kamlakar

मनोज जरांगे म्हणाले, आंदोलन भरकटले नाही. मराठा समाज हा 1984 पासून कुणबीत आहे. महाराष्ट्रातला सर्व मराठा हा कुणबी आहे हेच गेल्या 10 वर्षापासून मी सांगत आहे. कधीतरी जातीकडून बोलायला शिका… तुमच्या वडिलांचे मोठे योगदान आहे. कधीतरी मराठ्यांच्या लेकरांसाठी बोलायला शिका.. खरे बोलायला शिका…

मराठ्यांवर काय वेळ आली आहे. तुमच्या आसपासचे ओबीसींचे नेते मराठ्यांच्या विरोधात यायला लागले. तुमच्या नगर जिल्ह्यातले ओबीसीचे आमदार इकडे येऊन ओरडत आहे ते नाही भरकटलेले दिसत नाहीय मी कायद्याला धरून बोलतो मात्र हे आंदोलन भरकटले म्हणतात.मराठ्यांच्या लोकांनी मराठ्यांवर आरोप करणे बंद करा.. अशी टीका देखील मनोज जरांगेंनी यावेळी केली.


काय म्हणाले होते महसूलमंत्री

आरक्षणाचे आंदोलन भरकटत आहे. आंदोलनाचे गांभीर्य कमी होतं चालले आहे, अशी प्रतिक्रिया महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिली. भाजपच्या आत्मचिंतन बैठकीसाठी मंत्री विखे आज नांदेडला आले होते. यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. मनोज जरांगे म्हणजे मराठा समाज नाही, बाकी समाजाचे काम करणारे अनेक आहेत. तेव्हा जरांगे यांच्या प्रश्नाला उत्तर देणे योग्य नाही असं देखील विखे म्हणाले. मराठा समाज आणि ओबीसीच्या मागण्या संदर्भात मार्ग निघेल, असा विश्वास महसूल मंत्री राधाकृष्ण विख यांनी वक्त केला.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button