Letest News
मंत्र्यांचे राजकारण वाढले-मंत्र्यांच्या तिसऱ्या पिढ्या सत्तेत-२० वर्षे रस्त्याची वाट लागली-मंत्री-मह... कर्करोग रुग्णांसाठी शिर्डीत मोफत हाडांची तपासणी श्री साईनाथ रुग्णालयात १५ ऑगस्टला विशेष शिबिर कमरेला १० इंची कोयता-लोकरे जेरबंद-शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल-वृंदावन हॉटेल येथे शिर्डी पोलिसांच... नगर–मनमाड रोडवरील बिअर शॉपी पुन्हा चर्चेत; बिअरची बाटली डोक्यात फोडली! चावडी-द्वारकामाईच्या मार्गासाठी दिशादर्शक फलकांची मागणी साईभक्त संतोष कोते यांचे संस्थानच्या कार्यका... पुणतांब्यात चांगदेव महाराजांच्या दर्शनासाठी दीड लाख भाविकांचा जनसागर! समृद्धी महामार्गावर आगीचा तांडव!मालट्रक-कंटेनरचे टायर फुटल्याने भीषण अपघात- वाहनाने घेतला पेट= एकाचा... पालखी सोहळ्यात दोन भाविक महिलांच्या सोनसाखळ्या लंपास! अयोध्या राममंदिरातील दानपेटी प्रकरणाच्या निषेधार्थ कोपरगावात शिवसेनेचे आंदोलन महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय-शिर्डी नगरपरिषदेला मिळाला परिविक्षाधीन मुख्याधिकारी!
क्राईमशिर्डी

शिर्डीत १५ लाखांचे सोने गायब- वॉटर पार्कमधील घटनेने खळबळ-पोलिसांत अद्याप तक्रार नाही

शिर्डी (प्रतिनिधी) : शिर्डी परिसरातील एका वॉटर पार्कमध्ये छत्रपती संभाजीनगर येथील महिलेचे सुमारे १५ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने गायब झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना काल सायंकाळी घडल्याची माहिती मिळत असून, यामुळे वॉटर पार्क परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला आपल्या कुटुंबासह वॉटर पार्कमध्ये फिरण्यासाठी आली होती. यावेळी तिच्याकडे असलेले अंदाजे १५ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हरवल्याचे तिच्या निदर्शनास आले. दागिने सापडावेत यासाठी महिलेने वॉटर पार्क प्रशासनाच्या मदतीने परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. मात्र, फुटेज तपासूनही दागिन्यांचा कोणताही ठावठिकाणा लागलेला नाही.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


घटनेनंतर महिलेने स्वतःच्या स्तरावर शोधाशोध सुरू ठेवली असून, अद्याप या प्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात कोणतीही अधिकृत तक्रार दाखल झालेली नाही. त्यामुळे नेमके दागिने चोरीला गेले की कुठेतरी हरवले, याबाबत अद्याप स्पष्टता झालेली नाही.
दरम्यान, एवढ्या मोठ्या रकमेचे सोन्याचे दागिने गायब झाल्याची चर्चा परिसरात सुरू असून, संबंधित महिलेने पोलिसांकडे तक्रार दिल्यास पुढील तपासातून वस्तुस्थिती समोर येण्याची शक्यता आहे. पोलिसांत तक्रार दाखल झाल्यानंतरच या प्रकरणाचे नेमके स्वरूप स्पष्ट होणार आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button