Letest News
चिन्नाराव हॉटेल प्रकरणाने शिर्डीत खळबळ आता शिर्डी नगर परिषद कारवाई करणार का? रक्षाबंधनाचा स्नेहसोहळा शिर्डीत उत्साहात- महिलांनी सुजय विखे यांच्या हातावर बांधली राखी बनावट नंबरच्या बेवारस दुचाकीचा छडा- साई संस्थानच्या सुरक्षा विभागाने शोधला मूळ मालक महाराष्ट्रात तुकाराम मुंडे… तर तेलंगणात वैभव गायकवाड! अहिल्यानगरच्या भूमिपुत्राच्या धडक कारवाईने गुन... पत्रकारितेतील चार दशकांचा प्रदीर्घ प्रवास- असंख्य पत्रकारांचे मार्गदर्शक ज्येष्ठ पत्रकार शौकतभाई शेख... “राधाकृष्ण विखेंना हटवा…” जरांगेंच्या निर्णायक आंदोलनापूर्वीच मुख्यमंत्र्यांना थेट पत्र! संघर्षाच्या वाटेवरून यशाची पहिली पायरी चढला गौरव लोकचंदानी-बार कौन्सिलची सनद मिळवत वकिलीच्या नव्या प... शिर्डीतील ‘चिन्नाराव’ हॉटेलच्या जेवणात झुरळ? फोटो समोर येताच खळबळ! “विखे पाटलांना काहीच कळत नाही त्यांना फक्त साखर कारखानाच कळतो!” – मनोज जरांगे पाटील तालुक्याला दोन आमदार पण एकही नाही दमदार!रस्त्यांच्या खड्ड्यांनी हैराण कोपरगावकरांचा संताप फलकावर
राजकीयशिर्डी

मला कोणाचे तुपाचे,दुधाचे घोटाळे बाहेर काढायचे नाहीत किंवा करायचे नाहीत मतदार संघाच्या विकासासाठी मी निवडणुकीच्या रिंगणात – खामकर

शिर्डी प्रतिनिधी/ महाराष्ट्राचे चर्मकार विकास संघाचे संस्थापक अध्यक्ष संजय हरिश्चंद्र खामकर यांनी नुकतीच शिर्डी लोकसभा मतदारसंघातून बळीराजा पार्टी पक्षाकडून नुकताच खासदारकीचा उमेदवारी अर्ज दाखल केला असून यावेळी पक्षाचे पदाधिकारी महेंद्र धाडवे सत्यप्रकाश अर्जुने जकीर अन्सारी विनोधन मोर्या अरुण गाडेकर वकील आनंद लहामागे वकील अविनाश शेजवळ सिमोन जगताप आदीसह विविध पदाधिकारी हजर होते

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

याप्रसंगी बोलताना संजय खामकर म्हणाले की शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या विकासात आजी-माजी खासदारांना विकासाची कामे करण्यात अपयश आले असून त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारे विकासाचा अजेंडा नाही खासदार लोखंडे हे निळवंडेचे श्रेय घेऊन पाणीदार खासदार म्हणून मी काम केले हे सांगत आहे तर मग नामदार राधाकृष्ण विखे व माजी महसूल मंत्री थोरात यांचे निळवंडे योगदान नाही का असा सवाल विचारत खासदार वाकचौरे यांचे वय झाले तरी त्यांना सत्तेचा मोह सुटत नसल्याने आपण ही उमेदवारी करत असल्याचे संजय खामकर यांनी सांगितले

kamlakar


खामकर म्हणाले की दोन्ही खासदारांची कामगिरी निराशदायक आहे हे जनतेच्या लक्षात आले आहे दोघांनी लोकसभेत कधी शेतकऱ्यांच्या व सर्वसामान्यांच्या प्रश्नावर प्रश्न विचारले नाही एकमेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप करून ते लोकांची फसवणूक करत आहेत पाणीदार खासदार हा लोखंडेचा ढोंगीपणा आहे दोन्ही खासदार कोरोना काळात कोठे होते जेव्हा लोक अडचणीत होते त्यावेळी आपण जनतेच्या बरोबर होतो

असे सांगत आपण खासदार झालो तर शेतकरी विविध प्रश्न खते औषधे शेती अवजारांना सबसिडी बेरोजगारांना रोजगार या परिसरातील लोकांसाठी कारखानदारी असे विविध प्रश्न सोडवण्यासाठी आपण खासदारकीच्या माध्यमातून काम करणार असल्याचे सांगत जनता आता परिवर्तन करणार असल्याचे यावेळी सांगितले

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button