Letest News
जिल्ह्यात बालविवाहाविरोधात प्रशासनाचा धडाका- १५५ प्रकरणांत हस्तक्षेप-वर्षभरात ७ गुन्हे दाखल-अनेक विव... शेळके दाम्पत्याचा दुर्दैवी मृत्यू- हजारोंच्या उपस्थितीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार सिन्नरचा दीपक लोंढे पोलिसांच्या रडारवर- २५ मालमत्तांची माहिती समोर! शिर्डीत कथित धर्मांतर प्रकरणाने खळबळ-डि मार्ट मॉलमधील घटनेवरून वाढली चर्चा “मी नाही त्यातला!” – दीपक लोंढेची तीच जुनी पिपाणी, चौकशीत मात्र वेगळंच चित्र-लोंढेंच्या दाव्यांवर प्... शिर्डीत ‘मुंबई बिर्याणी’चा घाणेरडा खेळ उघड! बिर्याणीत गुटख्याची पुडी – खवय्यांच्या आरोग्याशी खिलवाड टपऱ्या हटवा-अन्यथा रस्त्यावर उतरू! – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा इशारा अतिक्रमणाविरोधात मनसेचा एल्गा... 🏅 शिर्डीचे तत्कालीन पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांचा राज्यस्तरीय सन्मान 🚨 डॉ. जितेंद्र शेळके प्रकरणावरून शिर्डीत संतापाची लाट सोशल मीडियावरील आरोपांवर नागरिक आक्रमक दुर्दैवाचा दुहेरी घाव… शिर्डीचा लाडका भूमिपुत्र जितेंद्र शेळके यांच्यासह पत्नी अनुराधाताई यांचीही मृ...
राजकीयशिर्डी

मला कोणाचे तुपाचे,दुधाचे घोटाळे बाहेर काढायचे नाहीत किंवा करायचे नाहीत मतदार संघाच्या विकासासाठी मी निवडणुकीच्या रिंगणात – खामकर

शिर्डी प्रतिनिधी/ महाराष्ट्राचे चर्मकार विकास संघाचे संस्थापक अध्यक्ष संजय हरिश्चंद्र खामकर यांनी नुकतीच शिर्डी लोकसभा मतदारसंघातून बळीराजा पार्टी पक्षाकडून नुकताच खासदारकीचा उमेदवारी अर्ज दाखल केला असून यावेळी पक्षाचे पदाधिकारी महेंद्र धाडवे सत्यप्रकाश अर्जुने जकीर अन्सारी विनोधन मोर्या अरुण गाडेकर वकील आनंद लहामागे वकील अविनाश शेजवळ सिमोन जगताप आदीसह विविध पदाधिकारी हजर होते

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

याप्रसंगी बोलताना संजय खामकर म्हणाले की शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या विकासात आजी-माजी खासदारांना विकासाची कामे करण्यात अपयश आले असून त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारे विकासाचा अजेंडा नाही खासदार लोखंडे हे निळवंडेचे श्रेय घेऊन पाणीदार खासदार म्हणून मी काम केले हे सांगत आहे तर मग नामदार राधाकृष्ण विखे व माजी महसूल मंत्री थोरात यांचे निळवंडे योगदान नाही का असा सवाल विचारत खासदार वाकचौरे यांचे वय झाले तरी त्यांना सत्तेचा मोह सुटत नसल्याने आपण ही उमेदवारी करत असल्याचे संजय खामकर यांनी सांगितले

kamlakar


खामकर म्हणाले की दोन्ही खासदारांची कामगिरी निराशदायक आहे हे जनतेच्या लक्षात आले आहे दोघांनी लोकसभेत कधी शेतकऱ्यांच्या व सर्वसामान्यांच्या प्रश्नावर प्रश्न विचारले नाही एकमेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप करून ते लोकांची फसवणूक करत आहेत पाणीदार खासदार हा लोखंडेचा ढोंगीपणा आहे दोन्ही खासदार कोरोना काळात कोठे होते जेव्हा लोक अडचणीत होते त्यावेळी आपण जनतेच्या बरोबर होतो

असे सांगत आपण खासदार झालो तर शेतकरी विविध प्रश्न खते औषधे शेती अवजारांना सबसिडी बेरोजगारांना रोजगार या परिसरातील लोकांसाठी कारखानदारी असे विविध प्रश्न सोडवण्यासाठी आपण खासदारकीच्या माध्यमातून काम करणार असल्याचे सांगत जनता आता परिवर्तन करणार असल्याचे यावेळी सांगितले

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button